चेन्नई: देशात २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला अजून काही काळ बाकी असला, तरी आतापासूनच राजकीय वर्तुळात पंतप्रधानपदाच्या दावेदारावरून चुरस पाहायला मिळत आहे. एकीकडे राजकीय आघाड्या आणि विविध सर्वेक्षणे समोर येत असताना, दुसरीकडे तामिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधानपदावरून आता तामिळनाडूतील काँग्रेस पक्ष आणि 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) पक्ष यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली असून, काँग्रेसने थेट मंत्रिमंडळातील राजीनाम्याचा इशारा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका वाद?
काही दिवसांपूर्वी 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) चे प्रमुख तथा तामिळनाडूचे नेते सी. जोसेफ विजय यांना देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. टीव्हीके पक्षाच्या गोटातून आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री एम. शरतकुमार यांनी, विजय हेच देशाचे पुढील पंतप्रधान असतील असा जोरदार दावा केला होता. अभिनेते-राजकारणी विजय यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या दाव्यामुळे मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
काँग्रेस नेते राजेश कुमार यांचा कडक इशारा:
तमिळनाडू सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेते राजेश कुमार यांनी यावर उघडपणे प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, २०२९ मध्ये देशाचे पंतप्रधान केवळ आणि केवळ राहुल गांधी हेच असतील. जर 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) किंवा त्यांचे नेते या भूमिकेशी सहमत नसतील आणि त्यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला किंवा दाव्याला समर्थन दिले नाही, तर तामिळनाडू मंत्रिमंडळात सहभागी असलेले काँग्रेसचे मंत्री क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे देतील, असा सज्जड दम आणि इशारा काँग्रेस नेते राजेश कुमार यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे.
देशभरातील सर्वेक्षणातील आकडेवारी:
नुकत्याच समोर आलेल्या एका राष्ट्रीय सर्वेक्षणात देशात जर आज निवडणुका झाल्या तर कोणाला पसंती मिळेल, याचे चित्र समोर आले होते. या सर्वेक्षणात देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच लोकांची पहिली पसंती असल्याचे दिसून आले, तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जनतेने कौल दिला आहे. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणात तामिळनाडूचे नेते सी. जोसेफ विजय हे तब्बल ९ टक्के मते मिळवून थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत विजय यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या स्थानी येणे हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का मानला जात आहे. याच राजकीय घडामोडींमुळे तामिळनाडूतील आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत असल्याचे दिसत आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




