शालेय विद्यार्थ्यांसाठी बारावीपर्यंतचे बहुतांश उच्च शिक्षण संस्थांचे जग जवळपास अनोळखीच राहते. सामान्यपणे प्रवेशाच्या वेळीच ते प्रथमच महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या परिसरात जातात. कल्पना करा- हेच विद्यार्थी पाचवीपासून किंवा त्याही आधी महाविद्यालयांच्या परिसरात जाऊ लागले तर? तुम्ही विचाराल त्यांनी तिथे का जावे? माझे उत्तर असेल – संग्रहालय पाहण्यासाठी. महाविद्यालय किंवा विद्यापीठाचा संग्रहालयाशी काय संबंध, असा प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर पुढे आहे. तुम्ही काही शहरी मुलांना विचारले की भाज्या कुठून येतात? तर ती निरागसपणे फ्रिजकडे बोट दाखवतील किंवा सुपरमार्केटमधून अथवा विविध ॲपच्या वितरण कर्मचाऱ्यांमार्फत त्या मिळतात असे सांगतील. पण तुम्ही बेंगळुरू येथील गांधी कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या महाविद्यालयाने उभारलेले पीक संग्रहालय पाहिले तर उत्तर वेगळे असेल. हा अनुभव विद्यार्थ्यांना असे बरेच काही शिकवू शकतो. ते पाठ्यपुस्तकांनाही अजून पूर्णपणे साध्य झालेले नाही. झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे मुलांमध्ये अन्न उत्पादन व त्याच्या वापराबाबतची समज कमी होत चालली आहे हे तुम्हालाही मान्य करावे लागेल. जेवणाच्या ताटातच भाज्या पाहण्याऐवजी या संग्रहालयात मुले त्यांच्यामध्ये फिरू शकतात. ती टोमॅटोच्या रोपाला स्पर्श करू शकतात, पालेभाज्या तोडू शकतात आणि अन्न त्यांना वाटते तिथे नव्हे, तर दुसरीकडे तयार होते हे समजू शकतात. हळूहळू त्यांना कळते की अन्नाची सुरुवात माती, बियाणे, सूर्यप्रकाश, पाणी आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमातून होते. येथे विद्यार्थी अन्नाचा संपूर्ण प्रवास समजू शकतात – बियाण्यांची निवड आणि पेरणीपासून सिंचन, परागीकरण, कापणी, साठवणूक, वाहतूक आणि अखेरीस स्वयंपाकघरापर्यंत. या प्रवासात त्यांची गांडुळे, मधमाशा, कंपोस्ट खड्डे, औषधी वनस्पती आणि देशी पिकांच्या जातींशीही ओळख होते. कोणत्याही परीक्षेशिवाय हा अनुभव जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, पोषणशास्त्र आणि अर्थशास्त्र शिकवतो. आता प्रश्न असा आहे की विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी केवळ पीक संग्रहालयापुरतेच का थांबावे? एखादे अभियांत्रिकी महाविद्यालय नवोपक्रम उद्यान तयार करू शकते. तेथे विद्यार्थी सायकल चालवून वीज निर्माण करतील. छोटे पूल बांधतील, पाण्याचे पंप चालवतील, विविध उपकरणांवर प्रयोग करतील आणि प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या प्रदर्शनांमधून रोबोटिक्स समजून घेतील. तेव्हा भौतिकशास्त्र हा भीतीदायक नव्हे, तर आनंददायी विषय बनेल. एखादे वैद्यकीय महाविद्यालय हृदय, फुप्फुसे आणि मेंदू यांच्या विशाल चालत पाहता येणाऱ्या प्रतिकृती असलेले मानवी शरीर शोध केंद्र उभारू शकते. परस्परसंवादी प्रदर्शनांच्या माध्यमातून हातांची स्वच्छता, पोषण, लसीकरण, प्रथमोपचार आणि अवयवदान यांसारख्या गोष्टी शिकवता येतील. त्यामुळे रुग्णालयांची भीती वाटण्याऐवजी विद्यार्थ्यांना स्वतःचे शरीर कसे कार्य करते हे समजेल. विधी विद्यापीठे संविधान संग्रहालय उभारू शकतात. तेथे तरुण अभिरूप न्यायालय, बालसंसद आणि हक्क व कर्तव्यांवरील चर्चांमध्ये सहभागी होतील. लोकशाहीची खरी समज प्रत्यक्ष सहभागातूनच अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते. व्यवस्थापन शिक्षण संस्था उद्योजकता संग्रहालय उभारू शकतात, जे असामान्य उद्योग उभे करणाऱ्या सामान्य भारतीयांच्या कथा सांगेल. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कडेला असलेले छोटे खाद्यपदार्थांचे दुकान मोठ्या उपाहारगृह साखळीत कसे रूपांतरित झाले किंवा ग्रामीण महिलांनी यशस्वी सहकारी संस्था कशा उभारल्या. येथे विद्यार्थी छोट्या उद्योगांचे व्यवस्थापन, अर्थसंकल्प तयार करणे आणि कल्पना कंपनीत कशा रूपांतरित होतात हेही शिकू शकतील. ही कल्पना नवीन नाही. अशी अनेक उदाहरणे आधीपासूनच आहेत. उदाहरणार्थ- अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एक्सप्लोरेटोरियममध्ये प्रकाश, ध्वनी, गती, मानवी वर्तन व अभियांत्रिकीशी संबंधित शेकडो परस्परसंवादी प्रदर्शने आहेत. त्यामुळे विद्यार्थी पाठांतर करण्याऐवजी प्रश्न विचारू शिकतात. ब्रिटनमधील हॅलिफॅक्स येथील राष्ट्रीय बाल संग्रहालयात अभ्यागत चौकोनी चाकांची सायकल चालवतात, भूमितीय रचना तयार करतात. विशाल कोडी सोडवतात आणि निसर्ग तसेच स्थापत्यशास्त्रात दडलेले नमुने शोधतात. गणिताला केवळ सूत्रांचा संग्रह न मानता हे संग्रहालय दाखवते की संख्या खेळ, संगीत, अभियांत्रिकी, वित्तव्यवस्था आणि दैनंदिन जीवनावर कशा परिणाम करतात. आणखी एक प्रभावी उदाहरण म्हणजे टोकियो येथील पासोना समूह. या संस्थेने जगातील सर्वांत वेगळ्या कार्यस्थळांपैकी एक उभारले आहे. त्यांच्या कार्यालयीन इमारतीत भातशेती, भाजीपाल्याच्या बागा, फळझाडे व मातीविरहित शेतीची केंद्रे उभारण्यात आली आहेत. फंडा असा की महाविद्यालयांनी असे अनुभवात्मक संग्रहालय उभारले. तेथे शालेय विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी विविध व्यावसायिकांच्या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल तर शालेय विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये ही सर्वांत आवडती ठिकाणे बनतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



