दिल्लीत एआय शिखर परिषदेदरम्यान यूथ काँग्रेसच्या‘शर्टलेस’ निषेधाने तशाच प्रतिक्रिया निर्माण केल्या,ज्याची अपेक्षा केली जाऊ शकत होती. काहीमिनिटांतच सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातीलवाहिन्यांनी त्या दृश्यावर आपला निकाल सुनावला की,हा निषेध भरकटलेला, अस्वस्थ करणारा आणि अगदीराष्ट्रीय शरमेचा विषय आहे. वैयक्तिकरीत्या, मीदेखीलएका मोठ्या जागतिक परिषदेच्या संदर्भात याला योग्यसमजत नाही. पण लोकशाहीतील चर्चा अशाचप्रकारच्या असहमतीवर आधारित असतात. प्रत्येकनिषेध विवेकपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येक घोषणाप्रभावी नसते. अनेकदा तर निषेधाचा उद्देश केवळ लक्षवेधून घेणे हा असतो. जसे की काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटलेदेखील की- जर आम्ही या शैलीत निषेध केला नसता तर कोणत्याही वाहिनीने आम्हाला प्रसिद्धी दिली नसती! यूथ काँग्रेसचे ते प्रदर्शन अनुचित, अगदीबेजबाबदारदेखील वाटू शकते. परंतु आपण हे लक्षातठेवले पाहिजे की एखादा निषेध नापसंत करणे म्हणजे शांततापूर्ण निषेधाचा अधिकारच अवैध ठरवण्यासारखे आहे. याच कारणामुळे जेव्हा दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अजामीनपात्र कलमांतर्गत अटक केलीआणि त्यांच्यावर देशाविरुद्ध कारस्थान रचल्याचाआरोप लावला. हा सर्व प्रकारच्या निषेधांना इशारादेण्यासारखे होते. दिल्ली पोलिस त्याच कार्यपद्धतीचाअवलंब करत आहेत. त्यानुसार कलम 144 चा वापरसार्वजनिक सभा रोखण्यासाठी केला जात आहे. सार्वजनिक जीवनातील लोकशाहीची जागा आधीचसंकोचू लागली आ हे. विरोधी पक्षाच्या नेत्याला संसदेतबोलू दिले जात नाही. स्वतः संसददेखील सरकारचीविधेयके रेटून मंजूर करण्याचे साधन बनत चाललीआहे. सत्तेत असलेल्या पक्षाला गैरसोयीचे प्रश्नविचारले जात नाहीत. विद्यापीठ परिसरांवर कडकपाळत आहे. पर्यायी दृष्टिकोनाची अभिव्यक्ती‘राष्ट्र-विरोधी’ ठरवली जाते. नागरी समाजही सत्तेलाआव्हान देण्यास कचरू लागला आहे. परंतु केवळविवेकबुद्धी असलेल्या लोकांनाच बोलण्याची परवानगीअसावी. अशी काही लोकशाही व्यवस्था नसते. तीआवाज उठवण्याच्या, गैरसोयीचे ठरण्याच्यास्वातंत्र्याचेही रक्षण करते. लोकशाही प्रगल्भतेची खरीकसोटी ही नाही की आपण ज्या निषेध-प्रदर्शनांशीसहमत असतो त्यांच्याशी कसे वागतो, तर ही आहे कीआपण त्या प्रदर्शनांवर कशी प्रतिक्रिया देतो, ज्यांनाआपण स्वतः त्रासदायक किंवा निरर्थक मानतो. पणशासनाची वृत्ती सहसा याच्या उलट असते. एखादानिषेध वाहतुकीस अडथळा आणत असेल, एखाद्याकार्यक्रमात व्यत्यय आणत असेल किंवा यंत्रणेलाअस्वस्थ करत असेल, तर त्यावर प्रशासकीय प्रतिक्रियातत्काळ उमटते. या कारवाईचा उद्देश सार्वजनिकव्यवस्थेपेक्षा जनमत व्यवस्थापनाचा अधिक असतो. .भारताचा स्वतःचा इतिहास पुरेसे इशारे देतो. 1970 च्यादशकातील जेपींचे आंदोलनदेखील अराजक आणिबेजबाबदार ठरवण्यात आले होते. परंतु त्यावरराज्यसत्तेच्या कठोर प्रतिक्रियेनेच (आणीबाणी) शेवटीत्याला परिभाषित केले. असहमतीला अव्यवस्थासमजून लोकशाही स्वतःला मजबूत करू शकत नाही.पण आपण हे कथानक नजीकच्या भूतकाळात वारंवारपाहिले आहे: भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, नागरिकत्वकायद्याच्या विरोधातील प्रदर्शने, शेतकऱ्यांचे आंदोलन-यापैकी प्रत्येकाला तिखट टीकेचा सामना करावालागला आहे. परंतु लोकशाहीच्या वैधतेसाठी हेआवश्यक आहे की असहमतीचा अधिकार कायमराहावा. तसेही लोकशाही हे नेहमीच प्रतीकात्मकतेचारंगमंच राहिला आहे. काळ्या फिती, उपोषण, मूकमोर्चा, पथनाट्य- निषेधाच्या अभिव्यक्ती सहसासुव्यवस्थित किंवा सौंदर्यपूर्ण नसतात. 2004 मध्येमणिपूरच्या 12 महिलांनी आसाम रायफल्समुख्यालयासमोर कशा प्रकारे विवस्त्र होऊन प्रदर्शन केलेहोते. त्या कृत्याने तेव्हा मणिपूरमधील संकटाच्यागांभीर्याबद्दल पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. ‘शर्टलेस’ प्रदर्शन बालिश नक्कीच म्हटले जाऊ शकते,पण त्याला राष्ट्रीय शरमेचा दर्जा देणे ही अतिशयोक्तीआहे. भारतीय गणराज्य इतके कमकुवत नाही की एकाप्रदर्शनानेच त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. शोकांतिकातर ही आहे की, सरकारे अनेकदा एखाद्या निषेधावरअतिरेकी प्रतिक्रिया देऊन त्याला अधिक प्रसिद्धीचमिळवून देतात.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एक आत्मविश्वासू लोकशाही जिथे यागोष्टीचा स्वीकार करते की सार्वजनिकव्यवस्था महत्त्वाची आहे, तिथेच तीसंयमाचे महत्त्वही जाणते. निषेधावरनजर ठेवणे ही एक गोष्ट आहे आणिअसहमतीला गुन्हा ठरवणे दुसरी.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



