दिल्लीत एआय शिखर परिषदेदरम्यान यूथ काँग्रेसच्या‘शर्टलेस’ निषेधाने तशाच प्रतिक्रिया निर्माण केल्या,ज्याची अपेक्षा केली जाऊ शकत होती. काहीमिनिटांतच सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातीलवाहिन्यांनी त्या दृश्यावर आपला निकाल सुनावला की,हा निषेध भरकटलेला, अस्वस्थ करणारा आणि अगदीराष्ट्रीय शरमेचा विषय आहे. वैयक्तिकरीत्या, मीदेखीलएका मोठ्या जागतिक परिषदेच्या संदर्भात याला योग्यसमजत नाही. पण लोकशाहीतील चर्चा अशाचप्रकारच्या असहमतीवर आधारित असतात. प्रत्येकनिषेध विवेकपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येक घोषणाप्रभावी नसते. अनेकदा तर निषेधाचा उद्देश केवळ लक्षवेधून घेणे हा असतो. जसे की काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटलेदेखील की- जर आम्ही या शैलीत निषेध केला नसता तर कोणत्याही वाहिनीने आम्हाला प्रसिद्धी दिली नसती! यूथ काँग्रेसचे ते प्रदर्शन अनुचित, अगदीबेजबाबदारदेखील वाटू शकते. परंतु आपण हे लक्षातठेवले पाहिजे की एखादा निषेध नापसंत करणे म्हणजे शांततापूर्ण निषेधाचा अधिकारच अवैध ठरवण्यासारखे आहे. याच कारणामुळे जेव्हा दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अजामीनपात्र कलमांतर्गत अटक केलीआणि त्यांच्यावर देशाविरुद्ध कारस्थान रचल्याचाआरोप लावला. हा सर्व प्रकारच्या निषेधांना इशारादेण्यासारखे होते. दिल्ली पोलिस त्याच कार्यपद्धतीचाअवलंब करत आहेत. त्यानुसार कलम 144 चा वापरसार्वजनिक सभा रोखण्यासाठी केला जात आहे. सार्वजनिक जीवनातील लोकशाहीची जागा आधीचसंकोचू लागली आ हे. विरोधी पक्षाच्या नेत्याला संसदेतबोलू दिले जात नाही. स्वतः संसददेखील सरकारचीविधेयके रेटून मंजूर करण्याचे साधन बनत चाललीआहे. सत्तेत असलेल्या पक्षाला गैरसोयीचे प्रश्नविचारले जात नाहीत. विद्यापीठ परिसरांवर कडकपाळत आहे. पर्यायी दृष्टिकोनाची अभिव्यक्ती‘राष्ट्र-विरोधी’ ठरवली जाते. नागरी समाजही सत्तेलाआव्हान देण्यास कचरू लागला आहे. परंतु केवळविवेकबुद्धी असलेल्या लोकांनाच बोलण्याची परवानगीअसावी. अशी काही लोकशाही व्यवस्था नसते. तीआवाज उठवण्याच्या, गैरसोयीचे ठरण्याच्यास्वातंत्र्याचेही रक्षण करते. लोकशाही प्रगल्भतेची खरीकसोटी ही नाही की आपण ज्या निषेध-प्रदर्शनांशीसहमत असतो त्यांच्याशी कसे वागतो, तर ही आहे कीआपण त्या प्रदर्शनांवर कशी प्रतिक्रिया देतो, ज्यांनाआपण स्वतः त्रासदायक किंवा निरर्थक मानतो. पणशासनाची वृत्ती सहसा याच्या उलट असते. एखादानिषेध वाहतुकीस अडथळा आणत असेल, एखाद्याकार्यक्रमात व्यत्यय आणत असेल किंवा यंत्रणेलाअस्वस्थ करत असेल, तर त्यावर प्रशासकीय प्रतिक्रियातत्काळ उमटते. या कारवाईचा उद्देश सार्वजनिकव्यवस्थेपेक्षा जनमत व्यवस्थापनाचा अधिक असतो. .भारताचा स्वतःचा इतिहास पुरेसे इशारे देतो. 1970 च्यादशकातील जेपींचे आंदोलनदेखील अराजक आणिबेजबाबदार ठरवण्यात आले होते. परंतु त्यावरराज्यसत्तेच्या कठोर प्रतिक्रियेनेच (आणीबाणी) शेवटीत्याला परिभाषित केले. असहमतीला अव्यवस्थासमजून लोकशाही स्वतःला मजबूत करू शकत नाही.पण आपण हे कथानक नजीकच्या भूतकाळात वारंवारपाहिले आहे: भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, नागरिकत्वकायद्याच्या विरोधातील प्रदर्शने, शेतकऱ्यांचे आंदोलन-यापैकी प्रत्येकाला तिखट टीकेचा सामना करावालागला आहे. परंतु लोकशाहीच्या वैधतेसाठी हेआवश्यक आहे की असहमतीचा अधिकार कायमराहावा. तसेही लोकशाही हे नेहमीच प्रतीकात्मकतेचारंगमंच राहिला आहे. काळ्या फिती, उपोषण, मूकमोर्चा, पथनाट्य- निषेधाच्या अभिव्यक्ती सहसासुव्यवस्थित किंवा सौंदर्यपूर्ण नसतात. 2004 मध्येमणिपूरच्या 12 महिलांनी आसाम रायफल्समुख्यालयासमोर कशा प्रकारे विवस्त्र होऊन प्रदर्शन केलेहोते. त्या कृत्याने तेव्हा मणिपूरमधील संकटाच्यागांभीर्याबद्दल पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. ‘शर्टलेस’ प्रदर्शन बालिश नक्कीच म्हटले जाऊ शकते,पण त्याला राष्ट्रीय शरमेचा दर्जा देणे ही अतिशयोक्तीआहे. भारतीय गणराज्य इतके कमकुवत नाही की एकाप्रदर्शनानेच त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. शोकांतिकातर ही आहे की, सरकारे अनेकदा एखाद्या निषेधावरअतिरेकी प्रतिक्रिया देऊन त्याला अधिक प्रसिद्धीचमिळवून देतात.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एक आत्मविश्वासू लोकशाही जिथे यागोष्टीचा स्वीकार करते की सार्वजनिकव्यवस्था महत्त्वाची आहे, तिथेच तीसंयमाचे महत्त्वही जाणते. निषेधावरनजर ठेवणे ही एक गोष्ट आहे आणिअसहमतीला गुन्हा ठरवणे दुसरी.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




