दिल्लीत एआय शिखर परिषदेदरम्यान यूथ काँग्रेसच्या‘शर्टलेस’ निषेधाने तशाच प्रतिक्रिया निर्माण केल्या,ज्याची अपेक्षा केली जाऊ शकत होती. काहीमिनिटांतच सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातीलवाहिन्यांनी त्या दृश्यावर आपला निकाल सुनावला की,हा निषेध भरकटलेला, अस्वस्थ करणारा आणि अगदीराष्ट्रीय शरमेचा विषय आहे. वैयक्तिकरीत्या, मीदेखीलएका मोठ्या जागतिक परिषदेच्या संदर्भात याला योग्यसमजत नाही. पण लोकशाहीतील चर्चा अशाचप्रकारच्या असहमतीवर आधारित असतात. प्रत्येकनिषेध विवेकपूर्ण असतोच असे नाही. प्रत्येक घोषणाप्रभावी नसते. अनेकदा तर निषेधाचा उद्देश केवळ लक्षवेधून घेणे हा असतो. जसे की काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटलेदेखील की- जर आम्ही या शैलीत निषेध केला नसता तर कोणत्याही वाहिनीने आम्हाला प्रसिद्धी दिली नसती! यूथ काँग्रेसचे ते प्रदर्शन अनुचित, अगदीबेजबाबदारदेखील वाटू शकते. परंतु आपण हे लक्षातठेवले पाहिजे की एखादा निषेध नापसंत करणे म्हणजे शांततापूर्ण निषेधाचा अधिकारच अवैध ठरवण्यासारखे आहे. याच कारणामुळे जेव्हा दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अजामीनपात्र कलमांतर्गत अटक केलीआणि त्यांच्यावर देशाविरुद्ध कारस्थान रचल्याचाआरोप लावला. हा सर्व प्रकारच्या निषेधांना इशारादेण्यासारखे होते. दिल्ली पोलिस त्याच कार्यपद्धतीचाअवलंब करत आहेत. त्यानुसार कलम 144 चा वापरसार्वजनिक सभा रोखण्यासाठी केला जात आहे. सार्वजनिक जीवनातील लोकशाहीची जागा आधीचसंकोचू लागली आ हे. विरोधी पक्षाच्या नेत्याला संसदेतबोलू दिले जात नाही. स्वतः संसददेखील सरकारचीविधेयके रेटून मंजूर करण्याचे साधन बनत चाललीआहे. सत्तेत असलेल्या पक्षाला गैरसोयीचे प्रश्नविचारले जात नाहीत. विद्यापीठ परिसरांवर कडकपाळत आहे. पर्यायी दृष्टिकोनाची अभिव्यक्ती‘राष्ट्र-विरोधी’ ठरवली जाते. नागरी समाजही सत्तेलाआव्हान देण्यास कचरू लागला आहे. परंतु केवळविवेकबुद्धी असलेल्या लोकांनाच बोलण्याची परवानगीअसावी. अशी काही लोकशाही व्यवस्था नसते. तीआवाज उठवण्याच्या, गैरसोयीचे ठरण्याच्यास्वातंत्र्याचेही रक्षण करते. लोकशाही प्रगल्भतेची खरीकसोटी ही नाही की आपण ज्या निषेध-प्रदर्शनांशीसहमत असतो त्यांच्याशी कसे वागतो, तर ही आहे कीआपण त्या प्रदर्शनांवर कशी प्रतिक्रिया देतो, ज्यांनाआपण स्वतः त्रासदायक किंवा निरर्थक मानतो. पणशासनाची वृत्ती सहसा याच्या उलट असते. एखादानिषेध वाहतुकीस अडथळा आणत असेल, एखाद्याकार्यक्रमात व्यत्यय आणत असेल किंवा यंत्रणेलाअस्वस्थ करत असेल, तर त्यावर प्रशासकीय प्रतिक्रियातत्काळ उमटते. या कारवाईचा उद्देश सार्वजनिकव्यवस्थेपेक्षा जनमत व्यवस्थापनाचा अधिक असतो. .भारताचा स्वतःचा इतिहास पुरेसे इशारे देतो. 1970 च्यादशकातील जेपींचे आंदोलनदेखील अराजक आणिबेजबाबदार ठरवण्यात आले होते. परंतु त्यावरराज्यसत्तेच्या कठोर प्रतिक्रियेनेच (आणीबाणी) शेवटीत्याला परिभाषित केले. असहमतीला अव्यवस्थासमजून लोकशाही स्वतःला मजबूत करू शकत नाही.पण आपण हे कथानक नजीकच्या भूतकाळात वारंवारपाहिले आहे: भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, नागरिकत्वकायद्याच्या विरोधातील प्रदर्शने, शेतकऱ्यांचे आंदोलन-यापैकी प्रत्येकाला तिखट टीकेचा सामना करावालागला आहे. परंतु लोकशाहीच्या वैधतेसाठी हेआवश्यक आहे की असहमतीचा अधिकार कायमराहावा. तसेही लोकशाही हे नेहमीच प्रतीकात्मकतेचारंगमंच राहिला आहे. काळ्या फिती, उपोषण, मूकमोर्चा, पथनाट्य- निषेधाच्या अभिव्यक्ती सहसासुव्यवस्थित किंवा सौंदर्यपूर्ण नसतात. 2004 मध्येमणिपूरच्या 12 महिलांनी आसाम रायफल्समुख्यालयासमोर कशा प्रकारे विवस्त्र होऊन प्रदर्शन केलेहोते. त्या कृत्याने तेव्हा मणिपूरमधील संकटाच्यागांभीर्याबद्दल पूर्ण देशाला हादरवून सोडले होते. ‘शर्टलेस’ प्रदर्शन बालिश नक्कीच म्हटले जाऊ शकते,पण त्याला राष्ट्रीय शरमेचा दर्जा देणे ही अतिशयोक्तीआहे. भारतीय गणराज्य इतके कमकुवत नाही की एकाप्रदर्शनानेच त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. शोकांतिकातर ही आहे की, सरकारे अनेकदा एखाद्या निषेधावरअतिरेकी प्रतिक्रिया देऊन त्याला अधिक प्रसिद्धीचमिळवून देतात.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एक आत्मविश्वासू लोकशाही जिथे यागोष्टीचा स्वीकार करते की सार्वजनिकव्यवस्था महत्त्वाची आहे, तिथेच तीसंयमाचे महत्त्वही जाणते. निषेधावरनजर ठेवणे ही एक गोष्ट आहे आणिअसहमतीला गुन्हा ठरवणे दुसरी.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




