आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचे उपांत्य सामनेरंगत असताना भारत मात्र अंतिम चारमध्ये पोहोचूशकलेला नाही. चाहत्यांसाठी ही निश्चितचनिराशाजनक बाब आहे. गेल्या दोन आठवड्यांतीलभारतीय संघाच्या कामगिरीकडे पाहिले तर संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरला नाही, हे वास्तव स्वीकारावेलागेल. एखाद-दुसऱ्या खेळाडूने चांगली कामगिरीकेली, पण संघ म्हणून सातत्यपूर्ण खेळ दिसला नाही.ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांतयाची मोठी किंमत मोजावी लागली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्टखेळी केली.भारताला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र,इतर सामन्यांत ती गरजेपेक्षा अधिक सावध दिसली.दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अशीच खेळी झाली असती,तर भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. हीच सातत्याची कमतरता संघाला महागात पडली. स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिका आणिऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली, पण मोठीखेळी करण्यात अपयश आले. हे दोन्ही सामने निर्णायक होते. अशा वेळी संघातील प्रमुख फलंदाज अपेक्षितयोगदान देऊ शकला नाही, ही चिंतेची बाब ठरली.जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांचा संपूर्णस्पर्धेतील खेळ निराशाजनक राहिला. जेमिमानेस्वतःच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण करण्याची गरजआहे. तिच्याकडे गुणवत्ता असली तरी ती सातत्यानेमोठी खेळी करण्यात अपयशी ठरली आहे. 2025 च्याविश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्याशतकानंतर तिने अपेक्षित सातत्य राखलेले नाही. दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेतले. मात्रत्यानंतर विशेष प्रभाव पाडता आला नाही.ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 356 वाबळी मिळवूनही त्यांचा विश्वचषक समाधानकारकठरला नाही. ऋचा घोषनेही एका चांगल्या सामन्यानंतरसातत्य राखले नाही. गोलंदाजीत चारणी वगळता इतरकोणीही निर्णायक क्षणी पुढे आले नाही. क्षेत्ररक्षणहीसंपूर्ण स्पर्धेत सरासरीपेक्षा कमी दर्जाचे राहिले. उत्कृष्टक्षेत्ररक्षक मानल्या जाणाऱ्या राधा यादवकडूनहीमहत्त्वाचे झेल सुटले. आता पुढचा मार्ग कोणता, हामोठा प्रश्न आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतसुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असेल. मात्र खरे आव्हानफेब्रुवारी 2027 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहे. मुख्यप्रशिक्षक अमोल मजूमदार टी-20 क्रिकेटच्यागरजेनुसार संघात कठोर निर्णय घेण्यास तयार आहेतका, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. 2024 आणि 2026या दोन्ही विश्वचषकांत गट टप्प्यातच बाहेर पडणेभारतीय संघासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. दोनवर्षांनंतरच्या ऑलिम्पिकचा विचार करता संघाला नव्याकल्पना आणि नव्या दृष्टिकोनाची गरज आहे. अमोलमजूमदार यांच्यासाठी पुढील काही महिने अत्यंतमहत्त्वाचे असतील. दुखापतींचा फटका संघाला बसलाअसला, तरी सक्षम राखीव खेळाडू तयार ठेवणे आणिनव्या खेळाडूंना संधी देणे ही प्रशिक्षकांची जबाबदारीअसते. प्रतिभा आणि संसाधनांची कमतरता नसतानाभारताकडून अपेक्षाही मोठ्या असणार आहेत.रणनीतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाला ‘रिटायर्ड आऊट'' का केलेनाही? ऋचा घोषला वरच्या क्रमांकावर का पाठवलेनाही? तिसऱ्या क्रमांकावर सतत बदल का करण्यातआले? डावखुरा-उजव्या हाताचा फलंदाज हा एकमेवनिकष असू शकत नाही. तिसरा क्रमांक हा विशेषजबाबदारीचा असून त्या स्थानासाठी खेळाडूलासातत्याने संधी देणे आवश्यक असते. तसेच, गोलंदाजप्रेमा रावतला दोन षटकांनंतर पुन्हा गोलंदाजी का देण्यातआली नाही, याचाही उलगडा व्हायला हवा. या प्रश्नांसह भारताचा विश्वचषकातील प्रवास संपलाआहे. आता केवळ आत्मपरीक्षण नव्हे तर या प्रश्नांचीठोस उत्तरे शोधून त्यानुसार बदल अमलात आणण्याचीवेळ आली आहे. ( लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) आता भारतीय महिला संघाचे पुढीललक्ष्य आशियाई क्रीडा स्पर्धा असेल.आशियाई स्तरावर फारशी कडवी स्पर्धानसल्याने भारताला सुवर्णपदकजिंकण्याची चांगली संधी आहे. खरे लक्षफेब्रुवारी 2027 मध्ये श्रीलंकेत होणाऱ्यामहिला चॅम्पियन्स ट्रॉफीकडे असायलाहवे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




