आपण मान्य केले किंवा नाही, तरी जग सध्या एकाविशिष्ट परिवर्तनातून जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतरएवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल असून तो दोनशतकांऐवजी अवघ्या दोन दशकांत पूर्ण होण्याचीशक्यता आहे. स्टॅनफर्ड एआय इंडेक्सनुसार,जीपीटी-3.5 दर्जाच्या मॉडेलला प्रश्न विचारण्याचा खर्च2022 मध्ये दहा लाख टोकन्समागे 20 डॉलर होता. 2024मध्ये तो केवळ 0.07 डॉलरवर आला. ‘एसडब्ल्यूई-बेंच'' या सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षमतेचेमूल्यमापन करणाऱ्या निकषावर एआय प्रणालींचीकामगिरीही मोठ्या प्रमाणात सुधारली. 2023 मध्ये ही प्रणाली केवळ 4.4 टक्के समस्या सोडवत होती.. 2024 मध्ये हा आकडा 71.7 टक्क्यांवर पोहोचला.मॅककिन्सेच्या सर्वेक्षणानुसार 2025 पर्यंत 88 टक्केसंस्थांनी किमान एका व्यावसायिक कामात एआयचावापर सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी हे प्रमाण 55 टक्केहोते. जनरेटिव्ह एआय केवळ तीन वर्षांत जगातील 53 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहे. बुद्धिमत्ता आज पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त, सहज उपलब्ध व व्यापक वापरासाठी सक्षम झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सरकार, उद्योग , संस्थेला आपल्या धोरणांचा फेरविचार करावा लागेल. भारतासमोरचा खरा प्रश्न असा आहे की, याबदलातून आपण किती मूल्यनिर्मिती करू शकतो? सध्या भारत जागतिक एआय प्रणालींना डिजिटलमाहिती, भाषिक विविधता आणि मानवी संदर्भ पुरवत आहे. मात्र, अत्याधुनिक एआय मॉडेल्सची निर्मितीअजूनही मुख्यतः इतर देशांमध्ये होत आहे. स्टॅनफर्डच्या अहवालानुसार, 2024 मध्ये जगातील 90 टक्केआघाडीची एआय मॉडेल्स अमेरिकेत विकसित झाली.म्हणजेच, भारत भविष्यातील बुद्धिमान प्रणालींनाप्रशिक्षण देत असला, तरी स्वतःची संगणकीय क्षमता,डेटा संरचना आणि मॉडेल विकास पुरेशा प्रमाणातनसल्याने त्यातील मोठा आर्थिक लाभ परदेशात जातआहे. भारताची सुरुवात कमकुवत नाही. उलट जगातीलमोजक्याच देशांकडील चार महत्त्वाची बलस्थानेभारताकडे आहेत— प्रतिभा, धोरणात्मक मोकळेपणा,पायाभूत सुविधा आणि ऊर्जा. एआय कौशल्याच्याबाबतीत भारत जगात अव्वल आहे. देश आता केवळअभियंते निर्यात करणारा राहिलेला नाही. ग्लोबलकॅपेबिलिटी सेंटर्स, स्टार्टअप्स आणि मोठ्या कंपन्यादेशातच एआय संशोधन आणि विकासासाठी स्वतंत्रपथके उभारत आहेत. त्यामुळे भारत एआय युगातीलकेवळ ''बॅक-ऑफिस'' न राहता प्रमुख संचालन केंद्रबनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दुसरे बलस्थानम्हणजे भारताचे संतुलित नियामक धोरण. भारतीयरिझर्व्ह बँकेचे ‘रेग्युलेटरी सँडबॉक्स'', इंटरनॅशनलफायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर प्राधिकरणाची(आयएफएससीए) नवोन्मेष चौकट आणिइंडिया-एआय मिशनची तत्त्वाधारित मार्गदर्शक तत्त्वेयामागील भूमिका स्पष्ट आहे— प्रथम नवकल्पनाविकसित होऊ द्या, त्यानंतर आवश्यक ते नियमन करा. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय कठोरनियमांमुळे नवकल्पनांना अडथळा निर्माण होऊ शकतो.त्यामुळे भारताची ही भूमिका भविष्यात स्पर्धात्मक लाभदेऊ शकते. तिसरे बलस्थान म्हणजे वेगाने उभारलीजाणारी पायाभूत सुविधा. डेटा सेंटर, सेमिकंडक्टर,क्लाउड क्षमता आणि उच्च कार्यक्षम संगणकीय सुविधाया क्षेत्रांत भारत मोठी झेप घेत आहे. केवळ डेटा सेंटरक्षेत्रातच 70 अब्ज डॉलरची गुंतवणूक सुरू असून,आणखी 90 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाझाली आहे. विशाखापट्टणममध्ये गूगलचा 15 अब्जडॉलरचा एआय हब, मायक्रोसॉफ्टची क्लाउड आणिएआयसाठी 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणिजामनगरमध्ये रिलायन्सचा बहुगिगावॅट डेटा सेंटर प्रकल्पहे भारताच्या वाढत्या महत्त्वाचे द्योतक आहेत. चौथे आणि तितकेच महत्त्वाचे बलस्थान म्हणजे ऊर्जा.डेटा सेंटरला अखंड आणि विश्वासार्ह वीजपुरवठ्याचीगरज असते. 2025-26 मध्ये भारताने विक्रमी 55.3गिगावॅट अतिरिक्त जीवाश्ममुक्त ऊर्जा क्षमता निर्माणकेली आहे. गेल्या दशकात सौरऊर्जेची किंमतही मोठ्याप्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे स्वच्छ ऊर्जेच्याआधारे एआय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारतजगातील महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक बनत आहे. ( हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)कौशल्याची पातळी जागतिकसरासरीपेक्षा 2.8 पट अधिक आहे. याबाबतीत भारत अमेरिका व जर्मनीलाहीमागे टाकत आहे. गेल्या दशकातभारतातील एआय कौशल्यात झपाट्यानेवाढ झाली. त्याचा देशांतर्गत वापर केलाजात आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




