स्वातंत्र्यानंतर भारताविरुद्धची कोणतीही फुटीरतावादी चळवळ यशस्वी झालेली नाही. याचे श्रेय लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या साधनांबरोबरच आवश्यक परिस्थितीत राज्याने दिलेल्या ठाम प्रतिसादालाही जाते. ‘सतलज’ या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद याच संदर्भात पाहिला पाहिजे. कलात्मक स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र भारतातील सर्वाधिक रक्तरंजित दहशतवादी चळवळींपैकी एका चळवळीचा इतिहास अत्यंत निवडक स्वरूपात मांडण्याचाही अधिकार समाविष्ट आहे का? दुसरीकडे राज्याला त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा अधिकार आहे का? हे कठीण प्रश्न आहेत. कारण यात लोकशाहीच्या दोन उद्दिष्टांचा सामना होतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय अखंडता राखण्याची जबाबदारी. एखाद्या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय अनेकदा उलट परिणाम करणारा ठरतो. डिजिटल युगात सेन्सॉरशिप क्वचितच यशस्वी ठरते. उलट बंदीमुळे अनेकदा पीडित असल्याची प्रतिमाही तयार होते. सामान्य परिस्थितीत त्यास कदाचित मर्यादित प्रेक्षक मिळाले असते, अशा चित्रपटाला अचानक ‘बंदी घातलेले सत्य’ अशी प्रतिमा मिळते आणि त्याच्या चोरट्या प्रती मोठ्या प्रमाणात पसरतात. मात्र बंदी प्रभावी ठरत नाही याचा अर्थ चित्रपटातील इतिहासाच्या मांडणीवर प्रश्नच उपस्थित करता येणार नाहीत, असा होत नाही. पंजाबमधील दहशतवाद ही भारताचे विभाजन करण्याच्या उद्देशाने चालवलेली सशस्त्र फुटीरतावादी मोहीम होती. या संघर्षात 12 हजारांहून अधिक निरपराध नागरिक, सुमारे 1,800 सुरक्षा कर्मचारी, तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे बळी गेले, तर 8 हजार दहशतवादी ठार झाले. जून 1985 मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी दहशतवाद्यांनी अटलांटिक महासागरावर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या विमानातील सर्व 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. भारताविरुद्धच्या या कटात पाकिस्तानची भूमिका होती. आयएसआयने पंजाबमधील दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण, शस्त्रे आणि निधी पुरवला होता. रेडिओ प्रसारण आणि प्रचाराच्या माध्यमातून फुटीरतावादी भावना भडकवण्याचे प्रयत्न केले जात होते. काळाच्या ओघात अनेक दहशतवादी संघटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये परिवर्तित झाल्या. खंडणीसाठी अपहरणाच्या घटना सामान्य झाल्या. जबरदस्तीने खंडणी वसूल करणे ही संघटित व्यवस्था बनली होती. व्यापाऱ्यांना तथाकथित कर भरण्यास भाग पाडले जात होते. नकार देणाऱ्यांची हत्या केली जात होती. पोलिस कर्मचाऱ्यांचीही हत्या करण्यात आली. सरकारशी संगनमत असल्याच्या संशयावरून गावांतील नेत्यांनाही ठार मारले जात होते. पंजाबमध्ये भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले होते. देश एका असामान्य परिस्थितीला सामोरा जात होता. त्याचा सामना शांततापूर्ण राजकीय मतभेद किंवा घटनात्मक आंदोलनाशी नव्हता. तो अशा संघटित सशस्त्र गटांशी लढत होता, जे दहशतीच्या माध्यमातून घटनात्मक व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी कटिबद्ध होते. मात्र, राज्यसत्तेकडून अतिरेक झाला, तिथे तिची कोणतीही जबाबदारी नव्हती, असा निष्कर्ष निघत नाही. बनावट चकमकी, सक्तीने बेपत्ता करणे आणि न्यायबाह्य हत्यांचे विश्वासार्ह आरोप पत्रकार, नागरी हक्क संघटना व न्यायालयीन चौकशांत नोंदवले गेले आहेत. घटनात्मक लोकशाहीमध्ये कायद्याचे राज्य कायमस्वरूपी स्थगित ठेवता येत नाही. प्रत्येक हत्येची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. मात्र असामान्य दहशतवादी चळवळींना तोंड देण्यासाठी अनेकदा अत्यंत कठीण कार्यकारी निर्णय घ्यावे लागतात. ब्रिटनमध्ये आयआरएविरोधातील मोहीम, स्पेनमध्ये ईटीएविरोधातील संघर्ष व श्रीलंकेत एलटीटीईविरोधातील युद्ध या सर्व लोकशाही देशांनी अशा द्वंद्वांचा सामना केला आहे. एखादा चित्रपट राज्यसत्तेच्या कथित अत्याचारांवरच लक्ष केंद्रित करतो आणि सशस्त्र दहशतवाद्यांच्या नियोजनबद्ध दहशतवादी मोहिमेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो तर तो इतिहासाचे विकृत चित्र सादर करतो. त्याचा उद्देश वस्तुनिष्ठ मांडणी करणे नसून चिथावणी देणे हा असतो. सिनेमॅटोग्राफ अधिनियम, 1952 अंतर्गत केंद्र सरकारला चित्रपट सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.. त्यात देशाचे सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडता यांसह इतर बाबींचा समावेश आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीतील मूलभूत मूल्य असले, तरी अधिनियमाच्या कलम 5बी अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था तसेच भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी कारवाई करता येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) पंजाबच्या शोकांतिकेचे कोणतेही वर्णन खलिस्तानी दहशतवाद्यांनी ठार केलेल्या हजारो निरपराध भारतीयांच्या वेदना पुसू शकत नाही. इतिहास हा ना सेन्सॉरशिपचा विषय आहे, ना निवडक स्मृतींचा. त्याला सत्याचा अधिकार आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




