स्वातंत्र्यानंतर भारताविरुद्धची कोणतीही फुटीरतावादी चळवळ यशस्वी झालेली नाही. याचे श्रेय लोकशाहीने उपलब्ध करून दिलेल्या साधनांबरोबरच आवश्यक परिस्थितीत राज्याने दिलेल्या ठाम प्रतिसादालाही जाते. ‘सतलज’ या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद याच संदर्भात पाहिला पाहिजे. कलात्मक स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र भारतातील सर्वाधिक रक्तरंजित दहशतवादी चळवळींपैकी एका चळवळीचा इतिहास अत्यंत निवडक स्वरूपात मांडण्याचाही अधिकार समाविष्ट आहे का? दुसरीकडे राज्याला त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा अधिकार आहे का? हे कठीण प्रश्न आहेत. कारण यात लोकशाहीच्या दोन उद्दिष्टांचा सामना होतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था तसेच राष्ट्रीय अखंडता राखण्याची जबाबदारी. एखाद्या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय अनेकदा उलट परिणाम करणारा ठरतो. डिजिटल युगात सेन्सॉरशिप क्वचितच यशस्वी ठरते. उलट बंदीमुळे अनेकदा पीडित असल्याची प्रतिमाही तयार होते. सामान्य परिस्थितीत त्यास कदाचित मर्यादित प्रेक्षक मिळाले असते, अशा चित्रपटाला अचानक ‘बंदी घातलेले सत्य’ अशी प्रतिमा मिळते आणि त्याच्या चोरट्या प्रती मोठ्या प्रमाणात पसरतात. मात्र बंदी प्रभावी ठरत नाही याचा अर्थ चित्रपटातील इतिहासाच्या मांडणीवर प्रश्नच उपस्थित करता येणार नाहीत, असा होत नाही. पंजाबमधील दहशतवाद ही भारताचे विभाजन करण्याच्या उद्देशाने चालवलेली सशस्त्र फुटीरतावादी मोहीम होती. या संघर्षात 12 हजारांहून अधिक निरपराध नागरिक, सुमारे 1,800 सुरक्षा कर्मचारी, तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे बळी गेले, तर 8 हजार दहशतवादी ठार झाले. जून 1985 मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी दहशतवाद्यांनी अटलांटिक महासागरावर बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या विमानातील सर्व 329 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. भारताविरुद्धच्या या कटात पाकिस्तानची भूमिका होती. आयएसआयने पंजाबमधील दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण, शस्त्रे आणि निधी पुरवला होता. रेडिओ प्रसारण आणि प्रचाराच्या माध्यमातून फुटीरतावादी भावना भडकवण्याचे प्रयत्न केले जात होते. काळाच्या ओघात अनेक दहशतवादी संघटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये परिवर्तित झाल्या. खंडणीसाठी अपहरणाच्या घटना सामान्य झाल्या. जबरदस्तीने खंडणी वसूल करणे ही संघटित व्यवस्था बनली होती. व्यापाऱ्यांना तथाकथित कर भरण्यास भाग पाडले जात होते. नकार देणाऱ्यांची हत्या केली जात होती. पोलिस कर्मचाऱ्यांचीही हत्या करण्यात आली. सरकारशी संगनमत असल्याच्या संशयावरून गावांतील नेत्यांनाही ठार मारले जात होते. पंजाबमध्ये भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले होते. देश एका असामान्य परिस्थितीला सामोरा जात होता. त्याचा सामना शांततापूर्ण राजकीय मतभेद किंवा घटनात्मक आंदोलनाशी नव्हता. तो अशा संघटित सशस्त्र गटांशी लढत होता, जे दहशतीच्या माध्यमातून घटनात्मक व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी कटिबद्ध होते. मात्र, राज्यसत्तेकडून अतिरेक झाला, तिथे तिची कोणतीही जबाबदारी नव्हती, असा निष्कर्ष निघत नाही. बनावट चकमकी, सक्तीने बेपत्ता करणे आणि न्यायबाह्य हत्यांचे विश्वासार्ह आरोप पत्रकार, नागरी हक्क संघटना व न्यायालयीन चौकशांत नोंदवले गेले आहेत. घटनात्मक लोकशाहीमध्ये कायद्याचे राज्य कायमस्वरूपी स्थगित ठेवता येत नाही. प्रत्येक हत्येची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. मात्र असामान्य दहशतवादी चळवळींना तोंड देण्यासाठी अनेकदा अत्यंत कठीण कार्यकारी निर्णय घ्यावे लागतात. ब्रिटनमध्ये आयआरएविरोधातील मोहीम, स्पेनमध्ये ईटीएविरोधातील संघर्ष व श्रीलंकेत एलटीटीईविरोधातील युद्ध या सर्व लोकशाही देशांनी अशा द्वंद्वांचा सामना केला आहे. एखादा चित्रपट राज्यसत्तेच्या कथित अत्याचारांवरच लक्ष केंद्रित करतो आणि सशस्त्र दहशतवाद्यांच्या नियोजनबद्ध दहशतवादी मोहिमेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो तर तो इतिहासाचे विकृत चित्र सादर करतो. त्याचा उद्देश वस्तुनिष्ठ मांडणी करणे नसून चिथावणी देणे हा असतो. सिनेमॅटोग्राफ अधिनियम, 1952 अंतर्गत केंद्र सरकारला चित्रपट सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणित करण्याचा अधिकार आहे.. त्यात देशाचे सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडता यांसह इतर बाबींचा समावेश आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीतील मूलभूत मूल्य असले, तरी अधिनियमाच्या कलम 5बी अंतर्गत सार्वजनिक सुव्यवस्था तसेच भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी कारवाई करता येते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) पंजाबच्या शोकांतिकेचे कोणतेही वर्णन खलिस्तानी दहशतवाद्यांनी ठार केलेल्या हजारो निरपराध भारतीयांच्या वेदना पुसू शकत नाही. इतिहास हा ना सेन्सॉरशिपचा विषय आहे, ना निवडक स्मृतींचा. त्याला सत्याचा अधिकार आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




