१९ व्या शतकात वसाहतवादाने लष्करी शक्तीच्या जोरावर देशांना लुटले. त्यानंतर नव वसाहतवादाने लष्करी बळासोबतच आर्थिक ताकदीचा वापर करून देशांना गुलामगिरीत ढकलले. आज ट्रम्प यांचे ‘टॅरिफ साम्राज्यवाद’ आपल्यासमोर आहे. साहजिकच,भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये काही गोष्टींची देवाणघेवाण होणे अपेक्षितच होते, त्यामुळे घाईघाईने कोणताही उत्साह दाखवणे किंवा टीका करणे योग्य नाही.मात्र, या कराराचे जे तपशील समोर आले आहेत, त्यामध्ये एक चिंतेचा विषय आहे की, अमेरिका आपल्या तेल खरेदीवर नियंत्रण ठेवत आहे का? अमेरिकन सरकारने एका ‘मॉनिटरिंग कमिटी’च्या स्थापनेसाठी अध्यक्षीय आदेश ही जारी केला आहे. ही समिती भारत रशियाकडून ‘थेट किंवा अप्रत्यक्षपणे’ तेल खरेदी करणार नाही, यावर लक्ष ठेवेल. अशी कोणतीही व्यवस्था आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखीआहे. परराष्ट्रमंत्र्यांनी यावर इतकेच म्हटले आहे की,‘आमच्या पर्यायांमध्ये राष्ट्रीय हितच केंद्रस्थानी राहील, जे पुरेसा पुरवठा, रास्त दर आणि पुरवठ्याची विश्वासार्हतायावर अवलंबून असेल.’ भूतकाळातही भारताने नेहमीच आपल्या राष्ट्रीय हिताची व्याख्या ‘रणनीतिकस्वायत्ततेच्या’ संदर्भात केली आहे. याचा अर्थ जगापासून अलिप्त राहणे किंवा केवळ आदर्शवाद पाळणे असा नव्हता. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडलेल्या एका महान राष्ट्राला हा अधिकार असलाच पाहिजे की, त्याने कुणाशी व्यापार करावा, कुणाशी मैत्री ठेवावी आणि आपल्या लोकांच्या कल्याणाचे रक्षण कसे करावे. हा सिद्धांत भारताने कधीही सोडलेला नाही. प्रश्न असा आहे की, एखादा तिसरा देश एका सार्वभौमराष्ट्राला अशा सूचना देऊ शकतो का की त्याने काय खरेदीकरावे, कुणाकडून करावे, किती प्रमाणात करावे आणि कोणत्या दराने करावे? सवलतीच्या दरात तेल उपलब्ध असतानाही भारताने आपले ऊर्जा-पर्याय मर्यादित ठेवावेत असे सुचवणे, म्हणजे भारताने आपल्या सार्वभौम अधिकारांकडे दुर्लक्ष करावे अशी अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. जर सवलतीच्या दरात तेल मिळत असेल, तर ते खरेदी करण्याचा निर्णय सर्वस्वी आपला असायला हवा. जेव्हा निर्बंध एकतर्फी लादले जातात आणि तेस्वतःच्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्यावर लादले जातात, तेव्हा ते देशांच्या ‘समान सार्वभौमत्वाच्या’संकल्पनेला तडा देतात. अशा दबावापुढे झुकणे म्हणजे त्यासत्तेचा स्वीकार करणे होय, जिथे काही देश केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही कायदे बनवतात. जे या कराराचे समर्थन करत आहेत, त्यांचा असा युक्तिवाद आहे की अमेरिकेसोबतची धोरणात्मक भागीदारी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आपण ती धोक्यात आणू शकत नाही. हे निःसंशयपणे खरे आहे, परंतु भागीदारी टिकवण्यासाठी परस्पर आदर असणे आवश्यक आहे. भारताने वारंवार दाखवून दिले आहे की,तो कुणाचेही अनुकरण न करताही मजबूत संबंध ठेवू शकतो. ही स्वायत्तताच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवते, केवळ आज्ञा पाळणारा भागीदार नाही. जर आज भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबतचे निर्बंध स्वीकारले, तर उद्या संरक्षण खरेदी, तंत्रज्ञान भागीदारी किंवा अमेरिकेला न पटणाऱ्या देशांशी संबंध ठेवण्याबाबतही दबाव आणला जाऊ शकतो. एकदा का अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर बाह्य ‘व्हेटो’चा सिद्धांत स्वीकारला, तर तो मार्ग अत्यंत धोकादायक ठरेल. हा युक्तिवाद अमेरिकेसोबतच्या भागीदारीच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही विशिष्ट पुरवठादाराचा बचाव करण्यासाठीही नाही. ही मूलभूत तत्त्वांची गोष्ट आहे.भारताचे राष्ट्रीय हित तेव्हाच सुरक्षित राहते जेव्हा पर्यायांची निवड नवी दिल्लीत होते. एका स्वतंत्र देशाला आपल्या इच्छेनुसार खरेदी करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारताने वारंवार हे सिद्ध केले आहे की,कुणाच्याही दबावाखाली न येता तो जगातील विविध महासत्तांशी भक्कम संबंध ठेवू शकतो. खरं तर, ही स्वायत्तता आणि स्वतंत्र बाणाच भारताला एक मौल्यवान जोडीदार बनवतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



