अनेक दशकांपासून इस्रो हे देशाच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचा आधार राहिले आहे. मंगळ यानाच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचा ऐतिहासिक विक्रमही भारताने प्रस्थापित केला. हे सर्व इतक्या कमी बजेटमध्ये साध्य करण्यात आले, जेवढ्या खर्चात हॉलीवूडच्या एखाद्या अंतराळपटाच्या प्रसिद्धीचा खर्चही निघणे कठीण असते.मात्र, गेल्या एका वर्षात इस्रोच्या गौरवशाली कामगिरीवर तीन प्रमुख मोहिमांच्या अपयशाची सावली पडली आहे, ज्यामध्ये पीएसएलव्हीच्या सलग दोन अयशस्वी प्रक्षेपणांचा समावेश आहे. ‘किफायती नवोन्मेष’ आणि ‘अढळ विश्वासार्हता’ या दोन स्तंभांवर उभ्या असलेल्या कार्यक्रमासाठी हा केवळ तांत्रिक धक्का नाही, तर तो प्रतिमेचाही प्रश्न आहे. पीएसएलव्ही गेल्या ३० वर्षांपासून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा मुख्य आधार राहिले आहे. याच रॉकेटने भारताला चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचवले आणि जवळपास ४०० परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून जागतिक स्तरावर भारताला एक ओळख मिळवून दिली. पण अलीकडेच पीएसएलव्ही-सी ६१ (मे २०२५) आणि पीएसएलव्ही-सी ६२ (जानेवारी२०२६) या मोहिमांदरम्यान तिसऱ्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वी निरीक्षण आणि सामरिक महत्त्वाच्या उपग्रहांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटना इस्रो आणि त्यांच्या मूळ उद्देशांमधील वाढते अंतर दर्शवतात. सुरुवातीच्या काळात भारताचा अंतराळ कार्यक्रम जनतेच्या गरजांवर आधारित होता. उपग्रह तंत्रज्ञानाला विकासाचे साधन बनवले, तर ते लोकांचे जीवन बदलू शकते, अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकते आणि जगात भारताची स्थिती नव्याने परिभाषित करू शकते, असात्यामागील विचार होता. इस्रोने हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी उपग्रहांची एक भक्कम यंत्रणा विकसित केली, जी लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी ठरली. भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली आणि त्यानंतरच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट मालिकेमुळे दुर्गम गावांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचली. यामुळे वंचित लोकांसाठी टेलिमेडिसिन शक्य झाले आणि त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, जे एरवी मागे राहिले असते.पंजाब आणि तामिळनाडूच्या शेतात शेतकरी‘रिसोर्ससॅट’सारख्या उपग्रहांच्या माहितीचा वापरपिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जलव्यवस्थापनासाठी करतात. चक्रीवादळाच्या काळात इस्रोच्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या पूर्वसूचनांमुळे संवेदनशील भागातील लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवणे शक्य होते आणि लोकांचे प्राण वाचतात. मात्र, अलीकडील घटना असे संकेत देतात की, इस्रोची वाढती महत्त्वाकांक्षा आता गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठासाखळीवर ताण निर्माण करत आहे. समस्या संसाधनांचीही आहे. ज्या मर्यादित बजेटमध्ये भारताने आपली मागील यशाची शिखरे गाठली, तोच आता भारतासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. आज भारत अंतराळ क्षेत्रावर दरवर्षी सुमारे २ अब्ज डॉलर्स खर्च करतो, तर चीनचा खर्च १६ अब्ज डॉलर्स आणि अमेरिकेचा खर्च २५ अब्ज डॉलर्स आहे. सध्या भारत २१ सक्रिय निरीक्षण उपग्रह चालवत आहे, तर चीन १,००० हून अधिक उपग्रहांचे संचालन करत आहे, ज्यापैकी २५० उपग्रह केवळ संरक्षणासाठी समर्पित आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारताचा अंतराळ कार्यक्रम ही चैनीची गोष्ट नाही तर ते आपल्या विकासाचे एक महत्त्वाचे साधन, नवोन्मेषाचा केंद्रबिंदू, सुरक्षेचा स्तंभ आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत आहे. सुदैवाने इस्रोनेयापूर्वीही अनेक आव्हानांवर मात केली आहे आणि त्यांच्या तांत्रिक क्षमतांबद्दल कोणतीही शंका नाही.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) अंतराळ क्षेत्र केवळ वैज्ञानिक कुतूहलाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेचे एक धोरणात्मक क्षेत्र बनत आहे. संसाधनांच्या टंचाईकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. यादिशेने आपल्याला धोरणात्मक पुनर्रचनाकरणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पायजमा शर्ट आणि डोक्यावर टोपी, आमदार अक्षय कर्डिले यांचा शपथविधी.
सरकारी कार्यालयात व्हिडिओ काढलात तर गुन्हा
मंदिराची दानपेटी फोडून लाखोंची चोरी; धक्कादायक कृत्य CCTV मध्ये कैद.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

