अनेक दशकांपासून इस्रो हे देशाच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचा आधार राहिले आहे. मंगळ यानाच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचा ऐतिहासिक विक्रमही भारताने प्रस्थापित केला. हे सर्व इतक्या कमी बजेटमध्ये साध्य करण्यात आले, जेवढ्या खर्चात हॉलीवूडच्या एखाद्या अंतराळपटाच्या प्रसिद्धीचा खर्चही निघणे कठीण असते.मात्र, गेल्या एका वर्षात इस्रोच्या गौरवशाली कामगिरीवर तीन प्रमुख मोहिमांच्या अपयशाची सावली पडली आहे, ज्यामध्ये पीएसएलव्हीच्या सलग दोन अयशस्वी प्रक्षेपणांचा समावेश आहे. ‘किफायती नवोन्मेष’ आणि ‘अढळ विश्वासार्हता’ या दोन स्तंभांवर उभ्या असलेल्या कार्यक्रमासाठी हा केवळ तांत्रिक धक्का नाही, तर तो प्रतिमेचाही प्रश्न आहे. पीएसएलव्ही गेल्या ३० वर्षांपासून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा मुख्य आधार राहिले आहे. याच रॉकेटने भारताला चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचवले आणि जवळपास ४०० परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून जागतिक स्तरावर भारताला एक ओळख मिळवून दिली. पण अलीकडेच पीएसएलव्ही-सी ६१ (मे २०२५) आणि पीएसएलव्ही-सी ६२ (जानेवारी२०२६) या मोहिमांदरम्यान तिसऱ्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वी निरीक्षण आणि सामरिक महत्त्वाच्या उपग्रहांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटना इस्रो आणि त्यांच्या मूळ उद्देशांमधील वाढते अंतर दर्शवतात. सुरुवातीच्या काळात भारताचा अंतराळ कार्यक्रम जनतेच्या गरजांवर आधारित होता. उपग्रह तंत्रज्ञानाला विकासाचे साधन बनवले, तर ते लोकांचे जीवन बदलू शकते, अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकते आणि जगात भारताची स्थिती नव्याने परिभाषित करू शकते, असात्यामागील विचार होता. इस्रोने हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी उपग्रहांची एक भक्कम यंत्रणा विकसित केली, जी लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी ठरली. भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली आणि त्यानंतरच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट मालिकेमुळे दुर्गम गावांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचली. यामुळे वंचित लोकांसाठी टेलिमेडिसिन शक्य झाले आणि त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, जे एरवी मागे राहिले असते.पंजाब आणि तामिळनाडूच्या शेतात शेतकरी‘रिसोर्ससॅट’सारख्या उपग्रहांच्या माहितीचा वापरपिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जलव्यवस्थापनासाठी करतात. चक्रीवादळाच्या काळात इस्रोच्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या पूर्वसूचनांमुळे संवेदनशील भागातील लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवणे शक्य होते आणि लोकांचे प्राण वाचतात. मात्र, अलीकडील घटना असे संकेत देतात की, इस्रोची वाढती महत्त्वाकांक्षा आता गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठासाखळीवर ताण निर्माण करत आहे. समस्या संसाधनांचीही आहे. ज्या मर्यादित बजेटमध्ये भारताने आपली मागील यशाची शिखरे गाठली, तोच आता भारतासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. आज भारत अंतराळ क्षेत्रावर दरवर्षी सुमारे २ अब्ज डॉलर्स खर्च करतो, तर चीनचा खर्च १६ अब्ज डॉलर्स आणि अमेरिकेचा खर्च २५ अब्ज डॉलर्स आहे. सध्या भारत २१ सक्रिय निरीक्षण उपग्रह चालवत आहे, तर चीन १,००० हून अधिक उपग्रहांचे संचालन करत आहे, ज्यापैकी २५० उपग्रह केवळ संरक्षणासाठी समर्पित आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारताचा अंतराळ कार्यक्रम ही चैनीची गोष्ट नाही तर ते आपल्या विकासाचे एक महत्त्वाचे साधन, नवोन्मेषाचा केंद्रबिंदू, सुरक्षेचा स्तंभ आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत आहे. सुदैवाने इस्रोनेयापूर्वीही अनेक आव्हानांवर मात केली आहे आणि त्यांच्या तांत्रिक क्षमतांबद्दल कोणतीही शंका नाही.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) अंतराळ क्षेत्र केवळ वैज्ञानिक कुतूहलाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेचे एक धोरणात्मक क्षेत्र बनत आहे. संसाधनांच्या टंचाईकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. यादिशेने आपल्याला धोरणात्मक पुनर्रचनाकरणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




