अनेक दशकांपासून इस्रो हे देशाच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचा आधार राहिले आहे. मंगळ यानाच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचा ऐतिहासिक विक्रमही भारताने प्रस्थापित केला. हे सर्व इतक्या कमी बजेटमध्ये साध्य करण्यात आले, जेवढ्या खर्चात हॉलीवूडच्या एखाद्या अंतराळपटाच्या प्रसिद्धीचा खर्चही निघणे कठीण असते.मात्र, गेल्या एका वर्षात इस्रोच्या गौरवशाली कामगिरीवर तीन प्रमुख मोहिमांच्या अपयशाची सावली पडली आहे, ज्यामध्ये पीएसएलव्हीच्या सलग दोन अयशस्वी प्रक्षेपणांचा समावेश आहे. ‘किफायती नवोन्मेष’ आणि ‘अढळ विश्वासार्हता’ या दोन स्तंभांवर उभ्या असलेल्या कार्यक्रमासाठी हा केवळ तांत्रिक धक्का नाही, तर तो प्रतिमेचाही प्रश्न आहे. पीएसएलव्ही गेल्या ३० वर्षांपासून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा मुख्य आधार राहिले आहे. याच रॉकेटने भारताला चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचवले आणि जवळपास ४०० परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून जागतिक स्तरावर भारताला एक ओळख मिळवून दिली. पण अलीकडेच पीएसएलव्ही-सी ६१ (मे २०२५) आणि पीएसएलव्ही-सी ६२ (जानेवारी२०२६) या मोहिमांदरम्यान तिसऱ्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वी निरीक्षण आणि सामरिक महत्त्वाच्या उपग्रहांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटना इस्रो आणि त्यांच्या मूळ उद्देशांमधील वाढते अंतर दर्शवतात. सुरुवातीच्या काळात भारताचा अंतराळ कार्यक्रम जनतेच्या गरजांवर आधारित होता. उपग्रह तंत्रज्ञानाला विकासाचे साधन बनवले, तर ते लोकांचे जीवन बदलू शकते, अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकते आणि जगात भारताची स्थिती नव्याने परिभाषित करू शकते, असात्यामागील विचार होता. इस्रोने हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी उपग्रहांची एक भक्कम यंत्रणा विकसित केली, जी लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी ठरली. भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली आणि त्यानंतरच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट मालिकेमुळे दुर्गम गावांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचली. यामुळे वंचित लोकांसाठी टेलिमेडिसिन शक्य झाले आणि त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, जे एरवी मागे राहिले असते.पंजाब आणि तामिळनाडूच्या शेतात शेतकरी‘रिसोर्ससॅट’सारख्या उपग्रहांच्या माहितीचा वापरपिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जलव्यवस्थापनासाठी करतात. चक्रीवादळाच्या काळात इस्रोच्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या पूर्वसूचनांमुळे संवेदनशील भागातील लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवणे शक्य होते आणि लोकांचे प्राण वाचतात. मात्र, अलीकडील घटना असे संकेत देतात की, इस्रोची वाढती महत्त्वाकांक्षा आता गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठासाखळीवर ताण निर्माण करत आहे. समस्या संसाधनांचीही आहे. ज्या मर्यादित बजेटमध्ये भारताने आपली मागील यशाची शिखरे गाठली, तोच आता भारतासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. आज भारत अंतराळ क्षेत्रावर दरवर्षी सुमारे २ अब्ज डॉलर्स खर्च करतो, तर चीनचा खर्च १६ अब्ज डॉलर्स आणि अमेरिकेचा खर्च २५ अब्ज डॉलर्स आहे. सध्या भारत २१ सक्रिय निरीक्षण उपग्रह चालवत आहे, तर चीन १,००० हून अधिक उपग्रहांचे संचालन करत आहे, ज्यापैकी २५० उपग्रह केवळ संरक्षणासाठी समर्पित आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारताचा अंतराळ कार्यक्रम ही चैनीची गोष्ट नाही तर ते आपल्या विकासाचे एक महत्त्वाचे साधन, नवोन्मेषाचा केंद्रबिंदू, सुरक्षेचा स्तंभ आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत आहे. सुदैवाने इस्रोनेयापूर्वीही अनेक आव्हानांवर मात केली आहे आणि त्यांच्या तांत्रिक क्षमतांबद्दल कोणतीही शंका नाही.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) अंतराळ क्षेत्र केवळ वैज्ञानिक कुतूहलाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेचे एक धोरणात्मक क्षेत्र बनत आहे. संसाधनांच्या टंचाईकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. यादिशेने आपल्याला धोरणात्मक पुनर्रचनाकरणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
























Subscribe to my channel




