आजच्या भू-राजकारणात जो खेळ सुरू आहे, त्याला ताकद वाढवण्याचा आणि वेळ साध्य करण्याचा खेळ म्हणता येईल. ही केवळ एकाविरुद्ध दुसऱ्याची स्पर्धा नाही.यात एकाची ताकद वाढली की दुसऱ्याची कमी होते असे नाही, तर उलट एकाची ताकद वाढली की दुसरा त्यापेक्षाही जास्त ताकद वाढवतो. तुमच्याकडे जेवढी शक्ती आणि फायदा उठवण्याची क्षमता असेल, तेवढाच वेळ तुमच्या हातात असतो. आता भारत या समीकरणात कुठे आहे, हे पुढे समजेलच. जरा लेसोथो या देशाबद्दल विचार करा. केवळ २३ लाख लोकसंख्या असलेला हा डोंगराळ देश चहूबाजूंनी दक्षिण आफ्रिकेने वेढलेला आहे. गरिबीशी झुंजणाऱ्या या देशात एड्सग्रस्तांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि तिथले दरडोई उत्पन्न पाकिस्तानच्या तुलनेत निम्मे आहे. पण त्यांच्याकडे एक विशेष औद्योगिक ताकद आहे. या देशाला जगाचे ‘जीन्स केंद्र’ म्हटले जाते. येथील गारमेंट उद्योग ५०,००० लोकांना रोजगार देतो आणि सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करतो. त्यांच्या निर्यातीचे मूल्य त्यांच्या जीडीपीच्या १०% इतके आहे. ही ताकद त्यांना ‘आफ्रिकन ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी ॲक्ट’ (एजीओए) अंतर्गत अमेरिकेत विनाशुल्क व्यापार करण्याच्या सुविधेमुळे मिळाली होती, पण २०२५ मध्ये ट्रम्प आले, तेव्हा हा कायदा हटवण्यात आला. उलट लेसोथोवर ५०% चा ‘लिबरेशन डे’ टॅरिफ (शुल्क) लादण्यात आला, ज्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली. नंतर हे शुल्क १५% पर्यंत कमी केले असले,तरी आता लेसोथो भारत, बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या उत्पादकांशी स्पर्धा करू शकत नाही.त्यांनी आता ‘आपत्ती काळ’ घोषित केला आहे. लेसोथो हे अशा देशांचे उदाहरण आहे ज्यांच्याकडे ना ताकद आहे ना वेळ. त्यांची अर्थव्यवस्था ट्रम्प पायउतार होण्याची तीन वर्षे वाट पाहू शकत नाही. याउलट चीनकडे सर्वाधिक ताकद आणि वेळ आहे. व्यापारात चीन विक्रेता (अत्यंत आवश्यक खनिजे आणि चुंबक) आणि खरेदीदार (सोयाबीन, मका) अशा दोन्ही रूपांत मजबूत आहे. लष्करी ताकदीत ते अमेरिकेच्या बरोबरीला पोहोचत आहे. अमेरिकेचे लक्ष इतरत्र असताना आणि रणनीतिक दबाव कमी असताना, चीन आपली ताकद एवढी वाढवू शकतो की, ट्रम्प यांच्यानंतर येणारा कोणताही नेता त्यांची बरोबरी करू शकणार नाही. जर या मोजमापात लेसोथो सर्वात खाली आणि चीनसर्वात वर असेल, तर बाकी देशांचे काय? युरोपचे संकट आणि लेसोथोचे संकट यांची तुलना करणे कदाचित विचित्र वाटेल, पण तसे नाही. युरोपला याची जाणीव म्युनिख सुरक्षा परिषदेत झाली, जेव्हा त्यांना समजले की त्यांची ताकद कमी आहे आणि ते सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून आहेत. आता ते संरक्षणावरील खर्च वाढवतील, पण स्वतःला सुरक्षित वाटण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागतील. लढाऊ विमाने, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे आणि १५५-मिमी तोफा तुम्ही सहज ऑर्डर करून मागवू शकत नाही. शिवाय लढण्यासाठी नागरिकही तयार करावे लागतात. जेव्हा पुतीन तुमच्या दारात उभे असतात, तेव्हा तुमच्याकडे वेळ उरत नाही. चीनच्या तुलनेत अमेरिकेची ताकद आजही जास्त आहे, पण त्यांच्याकडे वेळ फक्त ट्रम्प यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळापर्यंत आहे. अमेरिका ही जगातील निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ आहे आणि त्यांच्याकडे टॅरिफची शक्ती आहे. त्यांचे सैन्य सर्वात प्रबळ आहे आणि मित्रराष्ट्र ८० वर्षांपासून त्यांच्या सोबत आहेत. युरोप, ब्रिटन, जपान,दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि तैवान त्यांच्यावर अवलंबून आहेत. भारतासारख्या मित्रदेशांनाही चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेची गरज आहे. मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या, एआयमधील आघाडी आणि जगाचे राखीव चलन असलेला डॉलर अमेरिकेकडे आहे,पण ट्रम्प यात गुंतवणूक करण्याऐवजी ही ताकद खर्च करत आहेत. यामुळे अमेरिकेची शक्ती घटत आहे आणि वेळ हाताबाहेर जात आहे. तीन वर्षांनंतर अमेरिका कदाचित एक वेगळीच महासत्ता असेल. तेव्हा ते चीनच्या मागेपडतील का? मित्रराष्ट्र त्यांच्यावर विश्वास ठेवतील का?‘ग्रीनलँड’ हे नाव लक्षात ठेवा. भविष्यात असाच एखादा अनपेक्षित नेता आला तर काय होईल, याची चिंता मित्रराष्ट्रांना असेलच. तसे पाहता अमेरिकेकडे वेळ फक्त तीन वर्षांचाच नाही,तर पुढच्या निवडणुकीपर्यंत किंवा फक्त १० महिन्यांचाही असू शकतो, जर मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प कमकुवत झाले तर हे एक महत्त्वाचे तथ्य दर्शवते—लोकशाही देशांकडे वेळेची मर्यादा असते. पुढच्या १ ते ५ वर्षांत या सर्वदेशांत निवडणुका होतील. इस्रायलकडे सध्या आघाडी आहे. आशिया आणि आफ्रिकेच्या सीमेवर असलेली ही एक पाश्चात्य लोकशाही असून अमेरिका, युरोप आणि भारताचा महत्त्वाचा मित्र आहे, पण निवडणूक किंवा न्यायालयाच्या निर्णयामुळे नेतन्याहू यांना पायउतार व्हावे लागू शकते. त्यांच्यानंतर एक वेगळाच इस्रायलसमोर येऊ शकतो. वेळेची मर्यादा हे लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, पण हे जिनपिंग, पुतीन किंवा मुनीर यांना लागू होत नाही. उत्तर कोरियासारखी हुकूमशाही असो किंवा पाकिस्तानसारखी मिश्र हुकूमशाही, तिथे वेळेचे बंधन नसते. मात्र, अशा देशांत अचानक मोठे बदल घडू शकतात. आता प्रत्येक देश हा खेळ शिकत आहे. काही देशनवीन मित्र शोधत आहेत, तर काही पूर्वी दुर्लक्षित असलेल्या देशांना महत्त्व देत आहेत. भारत आणि युरोप हे याचे मोठे उदाहरण आहेत. या बदलत्या जगाने भारताला अधिक खुल्या आणि स्पर्धात्मक बाजारपेठेचे फायदे पाहण्यास भाग पाडले आहे. रशिया, इराण,तुर्की, सौदी अरेबिया आणि यूएई सारखे देशही स्वतःलाया स्पर्धेसाठी तयार करत आहेत. ताकद आणि वेळेच्या मोजमापात आपण कुठे आहोत? आपली ताकद सध्या मर्यादित आहे, ज्याचा प्रत्यय ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आला, जेव्हा आपले ३२ धोरणात्मक भागीदार असूनही फार कमी जण पाठीशी उभे राहिले. भारताची ताकद वाढवण्याचा मार्ग म्हणजे जीडीपी वाढवणे,आर्थिक सुधारणा करणे आणि बाजारपेठ खुली करणे हाच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) आम्ही रणनीती बदलली;
करारांची तयारी दर्शवली
ट्रम्प यांचा कार्यकाळ आपल्या संयमाची आणि निर्णयक्षमतेची परीक्षा घेणारा असेल.भारताने आपली रणनीती बदलली आहे,व्यापार करार केले आहेत, आर्थिक सुधारणा केल्या आहेत आणि संरक्षण बजेटमध्ये वाढ केली आहे. दीर्घकाळापासून रखडलेली खरेदीही सुरू झाली आहे. यालाच ताकद वाढवणे आणि वेळ मिळवणे असे म्हणतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- पुणे: कात्रजमध्ये थरारक खून! डोके, चेहरा आणि हातावर कोयत्याने अनेक वार करत १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
महाराष्ट्र
- मुंबई: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई-पुणे ते पंढरपूर विशेष रेल्वे जाहीर, कधी सुटणार आणि कुठे थांबणार
- मुंबई: कल्याणमध्ये खळबळजनक हत्याकांड; मिंडा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची २ सहकाऱ्यांनी केली निर्घृण हत्या, हत्येमागचे धक्कादायक कारण समोर
- नवी मुंबई: सोनम डोंगरे मृत्यू प्रकरण: ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीनचिट; अहवालात निष्काळजीपणा नसल्याचा दावा
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
गुन्हा
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
- छत्रपती संभाजीनगर: छळाला कंटाळून महिलेनं संपवलं जीवन; तीन चिमुकले आईच्या मायेला पारखे, उपस्थितांचे पाणावले डोळे
- वाघोली: सायबर गुन्ह्यांच्या फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी वापर झालेल्या वाघोली व लोणीकंद येथील बँकेच्या संशयित खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलण्याच्या संशयातून संताप; पतीनेच ओशिवऱ्यात केला पत्नीचा काटा काढत आवळला गळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल
- उत्तर प्रदेश: युट्यूबवर शोधली हत्येची आयडिया! विवाहित प्रियकराने औषधाच्या नावाखाली नर्स प्रेयसीला दिली विषारी ड्रिप
- दिल्लीत हायअलर्ट! संसदेच्या सुरक्षेसाठी वॉटर गनचे बंब अन् हजारो जवान तैनात; सीजेपीच्या आंदोलनामुळे छावणीचे स्वरूप"
























Subscribe to my channel




