परीक्षा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळेचे दिवस असो किंवा वीकेंड, बाहेर पाऊस पडत असो किंवा अचानक वीज गेलेली असो, पण आमची संध्याकाळी ७.३० वाजेची जेवणाची वेळ निश्चित होती. या कौटुंबिक स्नेहभोजनात न येण्याचे आम्ही कोणतेही कारण देऊ शकत नव्हतो. हा नियम फक्त दोनच प्रसंगी मोडला जायचा - जेव्हा कुणाला खूप ताप असेल किंवा देश युद्ध लढत असेल. जसे १९७१ चे बांगलादेश युद्ध, जेव्हा रस्त्यांवरील दिवेही बंद केले जायचे आणि सायकलच्या डायनामोला अर्धा काळा रंग लावला जायचा. आम्ही सर्वजण स्वयंपाकघरात बसत असू, जिथे ना डायनिंग टेबल होते, ना गॅस स्टोव्ह असलेला किचन ओटा. या सोयीसुविधा माझ्या बहिणीच्या जन्मानंतर घरात आल्या.डायनिंग टेबलवरही आम्ही दोन्ही मुले एका दिशेला तोंड करून बसत असू आणि उरलेल्या दोन दिशांना आई-वडील बसत. दक्षिण दिशा रिकामी राहायची. पालकांच्या एका समजुतीमुळे आमच्या घरात दक्षिणेकडे तोंड करून जेवणे टाळले जायचे. ही समजूत वास्तुशास्त्र आणि ऊर्जेशी संबंधित पारंपरिक धारणांचे एक मिश्र रूप होते. रात्रीच्या जेवणादरम्यान वास्तुकला, ऊर्जा आणि मान्यतांसारख्या विषयांवर आईकडून मिळालेला हा माझा पहिला वादातीत धडा होता. म्हणूनच आज मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. दिवसातील किमान एक जेवण तरी एकत्र बसून घ्या आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवा. काळाच्या ओघात तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक दिसून येईल. जेव्हा तुम्ही पालक बनता तेव्हा तुम्हाला केवळ भेटवस्तूच मिळत नाहीत, तर भरपूर सल्लाही मिळतो. पण माझा हा सल्ला तुमच्या मुलांना हमखास एक उत्तम माणूस बनवेल. अगदी माझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळी जेव्हा माझी आई रुग्णालयात होती, तेव्हाही आम्ही पिता-पुत्र साध्याशा जेवणासाठी एकत्र बसलो होतो. आम्हा दोघांमधील चर्चा नेहमीच दीर्घ चालायची. १० मिनिटे असो किंवा अर्धा तास, सोबत जेवण्याचा नियम ‘तडजोड नसणारा’ होता. अर्थात, त्याचा फायदाही झाला. बालपणीच्या या गोष्टी मला तेव्हा आठवल्या, जेव्हा नुकतेच मी ‘फॅमिली डिनर प्रोजेक्ट’ (एफडीपी) च्या कार्यकारी संचालिका डॉ. एमी फिशेल यांच्याबद्दल वाचले. त्या म्हणतात की, नियमित एफडीपीचा संबंध नैराश्य, चिंता, नशा किंवा तंबाखूचे व्यसन, ईटिंग डिसऑर्डर, लठ्ठपणा आणि सध्या विकसित देशांमध्ये आढळणाऱ्या किशोरवयीन गर्भधारणेचे प्रमाण कमी करण्याशी आहे. यामुळे लवचिकता आणि आत्मसन्मान वाढतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. प्री-स्कूलमधील मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि मोठ्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होते. त्यांच्या सर्वेक्षणात एकत्र जेवणारी ८०% कुटुंबे ही परंपरा सुरू ठेवू इच्छितात, कारण किशोरवयीन मुलांना वाटते की त्या वेळी ते पालकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. जेवणाचा टेबल हे शिष्टाचार, संयम शिकण्याचे प्रशिक्षण केंद्र आणि डिजिटल उपकरणांच्या व्यत्ययाशिवाय एकत्र बसण्याची दुर्मिळ संधी असते. घरच्यांना हळू जेवणाऱ्यांची वाट पाहावी लागते आणि स्वयंपाक करणाऱ्या आईचे रोज आभार मानावे लागतात. मुले सहानुभूती शिकतात, चालू घडामोडींबद्दल जाणून घेतात आणि हळूहळू आपले मत मांडू लागतात. चित्रपट, पुस्तके, व्यवसाय आणि राजकारणावर चर्चा होते. मी सर्व तरुण पालकांना आग्रहाने सांगेन की त्यांनी अमांडा रिपली यांचे ‘द स्मार्टेस्ट किड्स इन द वर्ल्ड’ हे पुस्तक नक्की वाचावे. यात टेबलवर चर्चा सुरू करण्याचे उत्तम मार्ग सांगितले आहेत. फंडा असा की- कुटुंब म्हणून एकत्र जेवणे हे एखाद्या प्रकल्पापेक्षा कमी नाही. म्हणूनच याला ‘एफडीपी’ म्हटले गेले आहे. प्रत्येक जेवणाच्या वेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपली आई जी मेहनत घेते, त्याचे खूप कौतुक झाले पाहिजे, कारण ती भावी पिढीला एक उत्तम माणूस बनवण्याचे काम करत असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




