परीक्षा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, शाळेचे दिवस असो किंवा वीकेंड, बाहेर पाऊस पडत असो किंवा अचानक वीज गेलेली असो, पण आमची संध्याकाळी ७.३० वाजेची जेवणाची वेळ निश्चित होती. या कौटुंबिक स्नेहभोजनात न येण्याचे आम्ही कोणतेही कारण देऊ शकत नव्हतो. हा नियम फक्त दोनच प्रसंगी मोडला जायचा - जेव्हा कुणाला खूप ताप असेल किंवा देश युद्ध लढत असेल. जसे १९७१ चे बांगलादेश युद्ध, जेव्हा रस्त्यांवरील दिवेही बंद केले जायचे आणि सायकलच्या डायनामोला अर्धा काळा रंग लावला जायचा. आम्ही सर्वजण स्वयंपाकघरात बसत असू, जिथे ना डायनिंग टेबल होते, ना गॅस स्टोव्ह असलेला किचन ओटा. या सोयीसुविधा माझ्या बहिणीच्या जन्मानंतर घरात आल्या.डायनिंग टेबलवरही आम्ही दोन्ही मुले एका दिशेला तोंड करून बसत असू आणि उरलेल्या दोन दिशांना आई-वडील बसत. दक्षिण दिशा रिकामी राहायची. पालकांच्या एका समजुतीमुळे आमच्या घरात दक्षिणेकडे तोंड करून जेवणे टाळले जायचे. ही समजूत वास्तुशास्त्र आणि ऊर्जेशी संबंधित पारंपरिक धारणांचे एक मिश्र रूप होते. रात्रीच्या जेवणादरम्यान वास्तुकला, ऊर्जा आणि मान्यतांसारख्या विषयांवर आईकडून मिळालेला हा माझा पहिला वादातीत धडा होता. म्हणूनच आज मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो. दिवसातील किमान एक जेवण तरी एकत्र बसून घ्या आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवा. काळाच्या ओघात तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक दिसून येईल. जेव्हा तुम्ही पालक बनता तेव्हा तुम्हाला केवळ भेटवस्तूच मिळत नाहीत, तर भरपूर सल्लाही मिळतो. पण माझा हा सल्ला तुमच्या मुलांना हमखास एक उत्तम माणूस बनवेल. अगदी माझ्या बहिणीच्या जन्माच्या वेळी जेव्हा माझी आई रुग्णालयात होती, तेव्हाही आम्ही पिता-पुत्र साध्याशा जेवणासाठी एकत्र बसलो होतो. आम्हा दोघांमधील चर्चा नेहमीच दीर्घ चालायची. १० मिनिटे असो किंवा अर्धा तास, सोबत जेवण्याचा नियम ‘तडजोड नसणारा’ होता. अर्थात, त्याचा फायदाही झाला. बालपणीच्या या गोष्टी मला तेव्हा आठवल्या, जेव्हा नुकतेच मी ‘फॅमिली डिनर प्रोजेक्ट’ (एफडीपी) च्या कार्यकारी संचालिका डॉ. एमी फिशेल यांच्याबद्दल वाचले. त्या म्हणतात की, नियमित एफडीपीचा संबंध नैराश्य, चिंता, नशा किंवा तंबाखूचे व्यसन, ईटिंग डिसऑर्डर, लठ्ठपणा आणि सध्या विकसित देशांमध्ये आढळणाऱ्या किशोरवयीन गर्भधारणेचे प्रमाण कमी करण्याशी आहे. यामुळे लवचिकता आणि आत्मसन्मान वाढतो. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. प्री-स्कूलमधील मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि मोठ्या मुलांच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होते. त्यांच्या सर्वेक्षणात एकत्र जेवणारी ८०% कुटुंबे ही परंपरा सुरू ठेवू इच्छितात, कारण किशोरवयीन मुलांना वाटते की त्या वेळी ते पालकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. जेवणाचा टेबल हे शिष्टाचार, संयम शिकण्याचे प्रशिक्षण केंद्र आणि डिजिटल उपकरणांच्या व्यत्ययाशिवाय एकत्र बसण्याची दुर्मिळ संधी असते. घरच्यांना हळू जेवणाऱ्यांची वाट पाहावी लागते आणि स्वयंपाक करणाऱ्या आईचे रोज आभार मानावे लागतात. मुले सहानुभूती शिकतात, चालू घडामोडींबद्दल जाणून घेतात आणि हळूहळू आपले मत मांडू लागतात. चित्रपट, पुस्तके, व्यवसाय आणि राजकारणावर चर्चा होते. मी सर्व तरुण पालकांना आग्रहाने सांगेन की त्यांनी अमांडा रिपली यांचे ‘द स्मार्टेस्ट किड्स इन द वर्ल्ड’ हे पुस्तक नक्की वाचावे. यात टेबलवर चर्चा सुरू करण्याचे उत्तम मार्ग सांगितले आहेत. फंडा असा की- कुटुंब म्हणून एकत्र जेवणे हे एखाद्या प्रकल्पापेक्षा कमी नाही. म्हणूनच याला ‘एफडीपी’ म्हटले गेले आहे. प्रत्येक जेवणाच्या वेळी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपली आई जी मेहनत घेते, त्याचे खूप कौतुक झाले पाहिजे, कारण ती भावी पिढीला एक उत्तम माणूस बनवण्याचे काम करत असते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel


