भूतान जिथे मी राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. यादेशाला जीडीपीऐवजी ‘जीडीएच’ (ग्रॉस डोमेस्टिकहॅपिनेस) हा शब्द तयार करण्याचे श्रेय दिले जाते.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या सुंदर देशात जीडीएचखरोखरच उच्च आहे, पण भारतातही तो काही कमी नाही.हे एक असे वास्तव आहे, जे समाजशास्त्रज्ञ आणिअभ्यागत स्पष्टपणे पाहू शकतात. असे कसे शक्य आहेकी, ज्या देशात सामान्य जनता दररोज भयंकर आव्हानांशीझुंजते, तिथे इतकी अदम्य प्रसन्नता विखुरलेली असते?गरिबीने भरलेल्या गल्लीबोळांतही हास्य-विनोदाचेआवाज ऐकू येतात, मर्यादित साधने असलेल्या घरांतहीपाहुणचार कोणत्याही कंजुषीशिवाय होतो आणिअपयशांनंतरही निराशा क्वचितच वरचढ ठरते? भारताचा‘हॅपिनेस कोशंट’ (प्रसन्नत -सुचकांक) समजूनघेण्यासाठी आपल्याला उत्पन्न व पायाभूत सुविधांसारख्यामानकांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्य जाणिवेच्या ताण्याबाण्यामध्ये प्रवेश करावा लागेल. भारतीय समाधानाच्या केंद्रस्थानी कुटुंब नावाची संस्था आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था जरी शहरी भारतात क्षीण होत असली तरी ती अजूनही एक मध्यवर्ती संस्था म्हणून कायम आहे. एक मूल येथे कोणा एका वेगळ्या व्यक्तीच्या रूपात नाही, तर नात्यांच्या एका जिवंत तारामंडळाच्या आजी-आजोबा, चुलत-मामे भावंडे, काका-काकी, मामा-मामी इत्यादींच्या गोतावळ्यात मोठे होते. यातीलप्रत्येक जण त्याला स्नेह, शिस्त आणि सातत्य देतो.संकटाच्या वेळी नात्यांचे हेच जाळे भावनिक आधाराचेकाम करते. येथे व्यक्ती एकटी पडत नाही; तिला सावरूनधरले जाते. हाच भाव समुदायापर्यंत विस्तारतो, जिथेसामाजिक जीवन क्वचितच विखंडित होते. पश्चिमेकडेएकटेपणाला महामारी म्हटले गेले आहे. पण भारतातएकांत हा असा विलास आहे, जो खूप कमी लोकांनाउपलब्ध आहे आणि अनेकांना त्याची इच्छाही नसते. आपले कॅलेंडरही संस्थागत आनंदाचा एक उत्तमनमुनाच समजा. होळीच्या मुक्त रंगांपासून ते दिवाळीच्याप्रकाशमय रात्रींपर्यंत, पोंगलच्या सुगीच्या उत्सवापासून तेईद-उल-फित्रच्या सामुदायिक मेजवानीपर्यंत.संपूर्ण वर्ष याआठवणीने भरलेले असते की जीवन सर्वांनी मिळूनउत्सवाप्रमाणे जगायला हवे. जन्म, मुंज, विवाह इत्यादीसंस्कारही इथे सामूहिक सहभागाच्या संधी बनतात. लहान-लहान सुखांसाठी असलेली भारतीय प्रतिभापाहण्यासारखी असते. रस्त्यालगतच्या दुकानातीलसायंकाळचा चहा, सिनेमा, क्रिकेटवर होणाऱ्या जिवंतचर्चा; गर्दीच्या ट्रेनमध्ये किंवा चाळींमध्ये अचानकफुटणारे हास्याचे धबधबे, कुटुंबासोबत एखादी आवडतीटीव्ही मालिका पाहण्याचा उपक्रम, हे सर्व साधे,काटकसरीचे, पण खोल समाधान देणारे आत्मीयतेचेसंस्कार आहेत. आपल्या जीवनात असलेल्या आशेचे अस्तित्व.महामार्गांवर चालणाऱ्या ट्रक्सवरही अनेकदा अशा ओळीलिहिलेल्या दिसतात: ‘मिलेगा मुकद्दर’. अचानककुठूनतरी एखादा ईश्वरी वरदान मिळू शकेल, एखाद्यागुरूचा आशीर्वाद काम करेल, एखादे धार्मिक दान फळदेईल किंवा एखादा विधी चमत्कार करेल, ही भावनाभारतीय मनातून कधीही लोप पावत नाही. ‘नशिबाने कूसबदलणे’ किंवा ‘भाग्य बदलणे’ हे येथे केवळ प्रचलितवाक्प्रचार नाहीत, तर श्रद्धेचे विषय आहेत. हिंदूपुराणकथांमध्ये झोपड्यांचे महालात रूपांतर होण्याच्याआणि साध्या धातूंचे सोने बनण्याच्या कथा भरलेल्याआहेत. मला माझ्या वडिलाधाऱ्यांनी सांगितलेली गोष्टआठवते : ‘न जाणे कोणत्या रूपात देव भेटेल.’ आपली एक मोठी शक्ती आपला दार्शनिकस्वभावदेखील आहे. कर्माचा सिद्धांत, ज्याला अनेकदानशीबवाद म्हटले जाते-तो आपल्या जिवंत अनुभवातसमत्व जपण्याचे आवाहन आहे. हे सुचवते की जीवनएका वैश्विक नैतिक व्यवस्थेनुसार चालते. प्रयत्न करणेअनिवार्य आहे, परंतु परिणाम मनुष्याच्या नियंत्रणातनसतात. फळाची अपेक्षा सोडून आपल्या कर्तव्याचे पालनकरण्याचा गीतेचा उपदेश आपल्या सांस्कृतिकजाणिवेमध्ये खोलवर रुजला आहे. शतकानुशतकांचीआक्रमणे, वसाहतवादी शोषण, फाळणी आणिदीर्घकालीन आर्थिक अडचणींनी अस्तित्वाच्या रक्षणाचीएक सामूहिक स्मृती आपल्यामध्ये खोलवर रुजवलीआहे. सहन करत राहणे हे येथे काही असाधारण नाही; तीएक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याच सहनशीलतेतून एकस्थिरचित्त विनोदबुद्धी जन्मली आहे. स्वतःच्याच दुर्दशेवरहसण्याची क्षमता. संसार मुळात मायामय आहे. हाविश्वास भौतिक यशाचा आनंद कमी करत नाही, पणसंकटाच्या वेळी तो अपयशाला दार्शनिक स्वीकृतीचे एककवच नक्कीच प्रदान करतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लहान सुखांसाठी असलेली भारतीयप्रतिभा पाहण्यासारखी असते.रस्त्यालगतच्या दुकानातील चहा,क्रिकेटवर होणाऱ्या चर्चा, गर्दीच्या ट्रेनमध्येअचानक फुटणारे हास्य हे साधे,सखोलसमाधान देणारे आत्मीय संस्कार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



