भूतान जिथे मी राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. यादेशाला जीडीपीऐवजी ‘जीडीएच’ (ग्रॉस डोमेस्टिकहॅपिनेस) हा शब्द तयार करण्याचे श्रेय दिले जाते.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या सुंदर देशात जीडीएचखरोखरच उच्च आहे, पण भारतातही तो काही कमी नाही.हे एक असे वास्तव आहे, जे समाजशास्त्रज्ञ आणिअभ्यागत स्पष्टपणे पाहू शकतात. असे कसे शक्य आहेकी, ज्या देशात सामान्य जनता दररोज भयंकर आव्हानांशीझुंजते, तिथे इतकी अदम्य प्रसन्नता विखुरलेली असते?गरिबीने भरलेल्या गल्लीबोळांतही हास्य-विनोदाचेआवाज ऐकू येतात, मर्यादित साधने असलेल्या घरांतहीपाहुणचार कोणत्याही कंजुषीशिवाय होतो आणिअपयशांनंतरही निराशा क्वचितच वरचढ ठरते? भारताचा‘हॅपिनेस कोशंट’ (प्रसन्नत -सुचकांक) समजूनघेण्यासाठी आपल्याला उत्पन्न व पायाभूत सुविधांसारख्यामानकांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्य जाणिवेच्या ताण्याबाण्यामध्ये प्रवेश करावा लागेल. भारतीय समाधानाच्या केंद्रस्थानी कुटुंब नावाची संस्था आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था जरी शहरी भारतात क्षीण होत असली तरी ती अजूनही एक मध्यवर्ती संस्था म्हणून कायम आहे. एक मूल येथे कोणा एका वेगळ्या व्यक्तीच्या रूपात नाही, तर नात्यांच्या एका जिवंत तारामंडळाच्या आजी-आजोबा, चुलत-मामे भावंडे, काका-काकी, मामा-मामी इत्यादींच्या गोतावळ्यात मोठे होते. यातीलप्रत्येक जण त्याला स्नेह, शिस्त आणि सातत्य देतो.संकटाच्या वेळी नात्यांचे हेच जाळे भावनिक आधाराचेकाम करते. येथे व्यक्ती एकटी पडत नाही; तिला सावरूनधरले जाते. हाच भाव समुदायापर्यंत विस्तारतो, जिथेसामाजिक जीवन क्वचितच विखंडित होते. पश्चिमेकडेएकटेपणाला महामारी म्हटले गेले आहे. पण भारतातएकांत हा असा विलास आहे, जो खूप कमी लोकांनाउपलब्ध आहे आणि अनेकांना त्याची इच्छाही नसते. आपले कॅलेंडरही संस्थागत आनंदाचा एक उत्तमनमुनाच समजा. होळीच्या मुक्त रंगांपासून ते दिवाळीच्याप्रकाशमय रात्रींपर्यंत, पोंगलच्या सुगीच्या उत्सवापासून तेईद-उल-फित्रच्या सामुदायिक मेजवानीपर्यंत.संपूर्ण वर्ष याआठवणीने भरलेले असते की जीवन सर्वांनी मिळूनउत्सवाप्रमाणे जगायला हवे. जन्म, मुंज, विवाह इत्यादीसंस्कारही इथे सामूहिक सहभागाच्या संधी बनतात. लहान-लहान सुखांसाठी असलेली भारतीय प्रतिभापाहण्यासारखी असते. रस्त्यालगतच्या दुकानातीलसायंकाळचा चहा, सिनेमा, क्रिकेटवर होणाऱ्या जिवंतचर्चा; गर्दीच्या ट्रेनमध्ये किंवा चाळींमध्ये अचानकफुटणारे हास्याचे धबधबे, कुटुंबासोबत एखादी आवडतीटीव्ही मालिका पाहण्याचा उपक्रम, हे सर्व साधे,काटकसरीचे, पण खोल समाधान देणारे आत्मीयतेचेसंस्कार आहेत. आपल्या जीवनात असलेल्या आशेचे अस्तित्व.महामार्गांवर चालणाऱ्या ट्रक्सवरही अनेकदा अशा ओळीलिहिलेल्या दिसतात: ‘मिलेगा मुकद्दर’. अचानककुठूनतरी एखादा ईश्वरी वरदान मिळू शकेल, एखाद्यागुरूचा आशीर्वाद काम करेल, एखादे धार्मिक दान फळदेईल किंवा एखादा विधी चमत्कार करेल, ही भावनाभारतीय मनातून कधीही लोप पावत नाही. ‘नशिबाने कूसबदलणे’ किंवा ‘भाग्य बदलणे’ हे येथे केवळ प्रचलितवाक्प्रचार नाहीत, तर श्रद्धेचे विषय आहेत. हिंदूपुराणकथांमध्ये झोपड्यांचे महालात रूपांतर होण्याच्याआणि साध्या धातूंचे सोने बनण्याच्या कथा भरलेल्याआहेत. मला माझ्या वडिलाधाऱ्यांनी सांगितलेली गोष्टआठवते : ‘न जाणे कोणत्या रूपात देव भेटेल.’ आपली एक मोठी शक्ती आपला दार्शनिकस्वभावदेखील आहे. कर्माचा सिद्धांत, ज्याला अनेकदानशीबवाद म्हटले जाते-तो आपल्या जिवंत अनुभवातसमत्व जपण्याचे आवाहन आहे. हे सुचवते की जीवनएका वैश्विक नैतिक व्यवस्थेनुसार चालते. प्रयत्न करणेअनिवार्य आहे, परंतु परिणाम मनुष्याच्या नियंत्रणातनसतात. फळाची अपेक्षा सोडून आपल्या कर्तव्याचे पालनकरण्याचा गीतेचा उपदेश आपल्या सांस्कृतिकजाणिवेमध्ये खोलवर रुजला आहे. शतकानुशतकांचीआक्रमणे, वसाहतवादी शोषण, फाळणी आणिदीर्घकालीन आर्थिक अडचणींनी अस्तित्वाच्या रक्षणाचीएक सामूहिक स्मृती आपल्यामध्ये खोलवर रुजवलीआहे. सहन करत राहणे हे येथे काही असाधारण नाही; तीएक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याच सहनशीलतेतून एकस्थिरचित्त विनोदबुद्धी जन्मली आहे. स्वतःच्याच दुर्दशेवरहसण्याची क्षमता. संसार मुळात मायामय आहे. हाविश्वास भौतिक यशाचा आनंद कमी करत नाही, पणसंकटाच्या वेळी तो अपयशाला दार्शनिक स्वीकृतीचे एककवच नक्कीच प्रदान करतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लहान सुखांसाठी असलेली भारतीयप्रतिभा पाहण्यासारखी असते.रस्त्यालगतच्या दुकानातील चहा,क्रिकेटवर होणाऱ्या चर्चा, गर्दीच्या ट्रेनमध्येअचानक फुटणारे हास्य हे साधे,सखोलसमाधान देणारे आत्मीय संस्कार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- सिंधुदुर्ग: श्रीराम मंदिर दानपेटी प्रकरणी दोडामार्गात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; काँग्रेसकडून निषेध
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: लग्नानंतर नववधूचे जुने फोटो व्हायरल, कुटुंबाला धमक्या; सायबर छळ प्रकरणाची चौकशी सुरू
- रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल, आता 'पीईटी स्कॅन' होणार मोफत
- ऐतिहासिक साटवली गढीचे बदलणार भाग्य! राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा
- पुणे: गोठ्यातील दूध काढण्याचे मशीन ठरलं जीवघेणं! विजेच्या धक्क्याने आंबेगावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
गुन्हा
- कोल्हापूर: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आईसह तिघे अटकेत; हतकणंगलेतील संतापजनक घटना
- मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची धडक कारवाई; दहिसरमध्ये एक जण अटकेत
- मुंबई: "आता ती कुठे गेली?" पावसाळ्यातील दुर्दैवी घटनांवरून राज ठाकरेंचा आरजे मलिष्कावर सवाल!
- पुणे: बारामती पोलीस भरतीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आजचे राशिभविष्य १० जुलै २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार कमाई; या ४ राशींसाठी दिवस अत्यंत भाग्याचा!
- आर्थिक राशिभविष्य ९ जुलै २०२६: सुनफा, सुकर्मा आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशींवर बरसणार धन, कामात मिळणार यश!
- हाय ब्लड प्रेशरचे ५ गंभीर संकेत! शरीरात ही लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष.
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
मनोरंजन
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- नवी दिल्ली: प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेला तरुण सकाळी मृतावस्थेत! गूढ मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू
- पालघरमध्ये रात्रीची धावपळ! दुर्वेस गावात घरात शिरला १५ किलो वजनाचा १० फुटांचा अजगर; वनविभागाकडून सुखरूप सुटका
- रायसेनमध्ये भीषण थरार! तरुणाने केली तरुणीची हत्या आणि त्यानंतर स्वतः संपवले आयुष्य; पोलीस तपास सुरू
- कर्नाटक: ₹20 च्या दंडाची मोठी किंमत! गृहपाठ न केल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न


























Subscribe to my channel


