भूतान जिथे मी राजदूत म्हणून सेवा बजावली आहे. यादेशाला जीडीपीऐवजी ‘जीडीएच’ (ग्रॉस डोमेस्टिकहॅपिनेस) हा शब्द तयार करण्याचे श्रेय दिले जाते.हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या सुंदर देशात जीडीएचखरोखरच उच्च आहे, पण भारतातही तो काही कमी नाही.हे एक असे वास्तव आहे, जे समाजशास्त्रज्ञ आणिअभ्यागत स्पष्टपणे पाहू शकतात. असे कसे शक्य आहेकी, ज्या देशात सामान्य जनता दररोज भयंकर आव्हानांशीझुंजते, तिथे इतकी अदम्य प्रसन्नता विखुरलेली असते?गरिबीने भरलेल्या गल्लीबोळांतही हास्य-विनोदाचेआवाज ऐकू येतात, मर्यादित साधने असलेल्या घरांतहीपाहुणचार कोणत्याही कंजुषीशिवाय होतो आणिअपयशांनंतरही निराशा क्वचितच वरचढ ठरते? भारताचा‘हॅपिनेस कोशंट’ (प्रसन्नत -सुचकांक) समजूनघेण्यासाठी आपल्याला उत्पन्न व पायाभूत सुविधांसारख्यामानकांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्य जाणिवेच्या ताण्याबाण्यामध्ये प्रवेश करावा लागेल. भारतीय समाधानाच्या केंद्रस्थानी कुटुंब नावाची संस्था आहे. संयुक्त कुटुंब व्यवस्था जरी शहरी भारतात क्षीण होत असली तरी ती अजूनही एक मध्यवर्ती संस्था म्हणून कायम आहे. एक मूल येथे कोणा एका वेगळ्या व्यक्तीच्या रूपात नाही, तर नात्यांच्या एका जिवंत तारामंडळाच्या आजी-आजोबा, चुलत-मामे भावंडे, काका-काकी, मामा-मामी इत्यादींच्या गोतावळ्यात मोठे होते. यातीलप्रत्येक जण त्याला स्नेह, शिस्त आणि सातत्य देतो.संकटाच्या वेळी नात्यांचे हेच जाळे भावनिक आधाराचेकाम करते. येथे व्यक्ती एकटी पडत नाही; तिला सावरूनधरले जाते. हाच भाव समुदायापर्यंत विस्तारतो, जिथेसामाजिक जीवन क्वचितच विखंडित होते. पश्चिमेकडेएकटेपणाला महामारी म्हटले गेले आहे. पण भारतातएकांत हा असा विलास आहे, जो खूप कमी लोकांनाउपलब्ध आहे आणि अनेकांना त्याची इच्छाही नसते. आपले कॅलेंडरही संस्थागत आनंदाचा एक उत्तमनमुनाच समजा. होळीच्या मुक्त रंगांपासून ते दिवाळीच्याप्रकाशमय रात्रींपर्यंत, पोंगलच्या सुगीच्या उत्सवापासून तेईद-उल-फित्रच्या सामुदायिक मेजवानीपर्यंत.संपूर्ण वर्ष याआठवणीने भरलेले असते की जीवन सर्वांनी मिळूनउत्सवाप्रमाणे जगायला हवे. जन्म, मुंज, विवाह इत्यादीसंस्कारही इथे सामूहिक सहभागाच्या संधी बनतात. लहान-लहान सुखांसाठी असलेली भारतीय प्रतिभापाहण्यासारखी असते. रस्त्यालगतच्या दुकानातीलसायंकाळचा चहा, सिनेमा, क्रिकेटवर होणाऱ्या जिवंतचर्चा; गर्दीच्या ट्रेनमध्ये किंवा चाळींमध्ये अचानकफुटणारे हास्याचे धबधबे, कुटुंबासोबत एखादी आवडतीटीव्ही मालिका पाहण्याचा उपक्रम, हे सर्व साधे,काटकसरीचे, पण खोल समाधान देणारे आत्मीयतेचेसंस्कार आहेत. आपल्या जीवनात असलेल्या आशेचे अस्तित्व.महामार्गांवर चालणाऱ्या ट्रक्सवरही अनेकदा अशा ओळीलिहिलेल्या दिसतात: ‘मिलेगा मुकद्दर’. अचानककुठूनतरी एखादा ईश्वरी वरदान मिळू शकेल, एखाद्यागुरूचा आशीर्वाद काम करेल, एखादे धार्मिक दान फळदेईल किंवा एखादा विधी चमत्कार करेल, ही भावनाभारतीय मनातून कधीही लोप पावत नाही. ‘नशिबाने कूसबदलणे’ किंवा ‘भाग्य बदलणे’ हे येथे केवळ प्रचलितवाक्प्रचार नाहीत, तर श्रद्धेचे विषय आहेत. हिंदूपुराणकथांमध्ये झोपड्यांचे महालात रूपांतर होण्याच्याआणि साध्या धातूंचे सोने बनण्याच्या कथा भरलेल्याआहेत. मला माझ्या वडिलाधाऱ्यांनी सांगितलेली गोष्टआठवते : ‘न जाणे कोणत्या रूपात देव भेटेल.’ आपली एक मोठी शक्ती आपला दार्शनिकस्वभावदेखील आहे. कर्माचा सिद्धांत, ज्याला अनेकदानशीबवाद म्हटले जाते-तो आपल्या जिवंत अनुभवातसमत्व जपण्याचे आवाहन आहे. हे सुचवते की जीवनएका वैश्विक नैतिक व्यवस्थेनुसार चालते. प्रयत्न करणेअनिवार्य आहे, परंतु परिणाम मनुष्याच्या नियंत्रणातनसतात. फळाची अपेक्षा सोडून आपल्या कर्तव्याचे पालनकरण्याचा गीतेचा उपदेश आपल्या सांस्कृतिकजाणिवेमध्ये खोलवर रुजला आहे. शतकानुशतकांचीआक्रमणे, वसाहतवादी शोषण, फाळणी आणिदीर्घकालीन आर्थिक अडचणींनी अस्तित्वाच्या रक्षणाचीएक सामूहिक स्मृती आपल्यामध्ये खोलवर रुजवलीआहे. सहन करत राहणे हे येथे काही असाधारण नाही; तीएक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. याच सहनशीलतेतून एकस्थिरचित्त विनोदबुद्धी जन्मली आहे. स्वतःच्याच दुर्दशेवरहसण्याची क्षमता. संसार मुळात मायामय आहे. हाविश्वास भौतिक यशाचा आनंद कमी करत नाही, पणसंकटाच्या वेळी तो अपयशाला दार्शनिक स्वीकृतीचे एककवच नक्कीच प्रदान करतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लहान सुखांसाठी असलेली भारतीयप्रतिभा पाहण्यासारखी असते.रस्त्यालगतच्या दुकानातील चहा,क्रिकेटवर होणाऱ्या चर्चा, गर्दीच्या ट्रेनमध्येअचानक फुटणारे हास्य हे साधे,सखोलसमाधान देणारे आत्मीय संस्कार आहेत.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिककरांवर पाणीबाणीचे संकट! जून-जुलैत दर शनिवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, तर ऑगस्टमध्ये एक दिवसाआड पाणी
- परीक्षेच्या तणावातून पुन्हा एक बळी! NEET पुनर्रिक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
- कोकण रेल्वेचा कायापालट! गाड्या वेळेवर धावणार, गर्दी संपणार; 'कवच'सह २६३ किमी मार्गाचे दुहेरीकरण आणि वंदे भारतचे डबे होणार दुप्पट
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
महाराष्ट्र
- नाशिककरांवर पाणीबाणीचे संकट! जून-जुलैत दर शनिवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, तर ऑगस्टमध्ये एक दिवसाआड पाणी
- परीक्षेच्या तणावातून पुन्हा एक बळी! NEET पुनर्रिक्षेच्या अवघ्या ३ दिवसांआधी अहमदाबादमध्ये विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
- मान्सून खोळंबल्याने भाजीपाला महागला! बाजार समित्यांमध्ये आवक ४० टक्क्यांनी घटली; गृहिणींचे बजेट कोलमडले
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
गुन्हा
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
- विजापूरहून पुण्याला चाललेला गुटख्याचा मोठा साठा जप्त; आटपाडी पोलिसांची धडक कारवाई, तब्बल २०० पोती पकडली!
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!


























Subscribe to my channel


