बांगलादेश भारतासाठी एक अडचण बनत चाललाआहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे आता कठीण होतआहे. सध्या सर्वात मोठा मुद्दा बांगलादेशचे पंतप्रधानतारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याचा आहे.भारताने त्यांना अधिकृत निमंत्रण दिले आहे. खरे तर दोननिमंत्रणे आहेत—एक द्विपक्षीय दौऱ्याचे आणि दुसरेब्रिक्स परिषदेचे. तरीही रहमान भारतात येणार का,याबद्दलचा गोंधळ रोज वाढत चालला आहे. ऑगस्टच्या शेवटी ते येतील अशी अपेक्षा होती. पण नंतरशेख हसीना यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नव्यासरकारवर बांगलादेश उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला.दुसरीकडे, रहमान यांच्या मंत्र्यांनी भारतावर हसीना यांनापाठिंबा दिल्याचा आरोप केला. यामुळे हा दौरालांबणीवर पडला. आता रहमान यांच्या सल्लागारांचेम्हणणे आहे की, त्यांचा पहिला भारत दौरा हा द्विपक्षीयच असावा. यामुळे ब्रिक्स परिषदेतील त्यांच्या सहभागाची शक्यता संपल्यासारखीच आहे. तर दुसरीकडे द्विपक्षीयदौरा अजूनही अनिश्चित आहे. रहमान यांच्यादौऱ्याबाबतचा हा गोंधळ दोन्ही देशांतील अनिश्चित संबंधाचाच पुरावा आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे आता हसीना यांच्या काळातील जुन्या दिवसांतपरत जाणे शक्य नाही. हसीना यांचा कार्यकाळ दोन्ही देशांतील अत्यंत जवळीक, विश्वास आणि सहकार्याचाहोता. ढाका हा भारताचा विश्वासू भागीदार होता. आतामात्र गणिते बदलली आहेत. आज तिथे उदारमतवादीआणि धर्मनिरपेक्ष पक्षासाठी फारशी जागा उरलेली नाही.तसेच मतदारांच्या एका वर्गात भारताविषयी संशयवाढला आहे. हसीना आजही पुनरागमनाच्या गप्पामारतात, पण सध्या तरी ते अशक्य दिसते. सुरवातीलारहमान यांची भूमिका भारताबाबत तर्कसंगत व संतुलितवाटत होती. पण अलीकडचे संकेत चिंताजनक आहेत.पाकिस्तानसोबत काम करण्याची बांगलादेशची वाढतीउत्सुकता चिंतेची बाब आहे. याचे सर्वात मोठे उदाहरणम्हणजे ‘इस्लामिक नाटो'' म्हटले जाणाऱ्या आघाडीतीलढाकाचे स्वारस्य. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणितुर्किये यांनी एका परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केलीआहे. या करारानुसार, या तिन्हींपैकी एका देशावरझालेला हल्ला सर्वांवर झालेला हल्ला मानला जाईल.बांगलादेशने आता म्हटले आहे की, या तीन देशांशीजोडलेल्या कोणत्याही आर्थिक किंवा लष्करी चौकटीतसामील होण्याबाबत त्यांची भूमिका सकारात्मक आहे.असे झाले तर 1971 चा इतिहास व मुक्तीसंग्राम काळातपाकिस्तानी सैन्याने केलेला नरसंहार यानंतरही हे दोन्हीदेश एकाच लष्करी आघाडीत येऊ शकतात. हीपरिस्थिती रणनीतिकदृष्ट्या भारतासाठी अस्वस्थकरणारी आहे. सध्या हा कथित ‘इस्लामिक नाटो'' गटप्रामुख्याने पश्चिम आशियापुरता मर्यादित आहे. ते थेटभारताच्या विरोधात दिसत नाही. पण बांगलादेश त्याचासदस्य होताच संपूर्ण परिस्थिती बदलेल. मग हा गटदक्षिण आशियात आणि पर्यायाने भारताच्या पूर्वसीमेपर्यंत येऊन पोहोचेल. बांगलादेश परराष्ट्र धोरणाचाविस्तार करत आहे. हे पुढेही सुरू राहील. या दुसऱ्यावास्तवासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल.बांगलादेश हा महत्त्वाचा किनारपट्टीचा 17.8 कोटीलोकसंख्येचा देश आहे. गेल्या दोन दशकांतील त्याचीआर्थिक प्रगतीही प्रभावी राहिली. अमेरिका , चीन तिथेआपला प्रभाव पाडू पाहतोय. युरोपलाही तिथे आपलाहिस्सा हवा आहे. आता पश्चिम आशियातील शक्तीहीया समीकरणात सहभागी होत आहेत. हसीना यांच्याकाळातही बांगलादेश आपले परराष्ट्र धोरण व्यापक करतहोता. रहमान यांच्या काळात ही प्रक्रिया आणखी वेगवानहोण्याची शक्यता आहे. भारत हे रोखू शकत नाही.बांगलादेशने इतर देशांना दूर ठेवून फक्त भारताचीचनिवड करावी, अशी अपेक्षा भारत करू शकत नाही.परंतु, स्वतःचे हितसंबंध जपणे आणि थेट भारताच्यासुरक्षेवर परिणाम करणारा रणनीतिक पर्याय निवडणे यातफरक आहे. पाकिस्तानशी जोडलेला आणि भारताच्यापूर्व शेजारापर्यंत पोहोचणारा कोणताही लष्करी करार हादुसऱ्याच श्रेणीत येईल. आपल्याला सावधगिरीचासमतोल साधावा लागेल—शत्रुत्वाशिवाय सतर्कता ,संवाद ठेवावा लागेल. काही दिवसांपूर्वी भारतीयउच्चायुक्तांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदींना रहमानयांचा भारत दौरा ‘संस्मरणीय'' करायचा आहे. कदाचितभारत व्यक्तिगत मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवत आहे. हीवाईट कल्पना नाही. कारण राजकीय उलथापालथअसूनही या नात्याचा पाया अजूनही मजबूत आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. ) भारताचे ध्येय जुना बांगलादेश परतमिळवणे हे नाही. भारताला आता नव्याबांगलादेशसोबत काम करण्याचा नवामार्ग शोधावा लागेल. बांगलादेश जास्तस्वतंत्र आहे. तेथे जास्त विविधता आहे.तो आपल्याशी पूर्णपणे मैत्रीपूर्ण नसला,तरीही एक महत्त्वाचा शेजारी देश आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



