बोरिया मजुमदार यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎संघांच्या विजय-पराभवापेक्षाही ‎खेळाचा विजय जास्त महत्त्वाचा‎

फिफा विश्वचषकात पक्षपाताच्या आरोपांमुळे जगभरात‎तीव्र चर्चा सुरू आहे. अर्जेंटिनाच्या बाजूने फिफाचा कल‎आहे का, लिओनेल मेसीला विशेष सवलत दिली जात‎आहे का, मेसीची लोकप्रियता पंच आणि‎अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकते का, समान‎संधीच्या तत्त्वाला बाधा होत आहे का, कमी चर्चित‎खेळाडू असलेल्या संघांवर अन्याय होत आहे का,‎स्पर्धेच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम होत आहे का‎आणि या शंका दूर करण्यासाठी फिफाने पुरेशी पावले‎उचलली आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले‎जात आहेत.‎ फिफा विश्वचषकासारख्या स्पर्धेत निष्पक्ष खेळ ही‎मूलभूत गरज आहे. पंचांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित‎होणे नवीन नाही. मात्र या स्पर्धेतही निर्णयांतील चुका‎कमी नव्हत्या. व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) ‎‎प्रणाली अजूनही वादाचा विषय ठरत असून निर्णयांतील ‎‎सातत्याबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. ‎‎भारताचे माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया म्हणाले, ‎‎इजिप्तविरुद्धच्या सामन्यात इराणचा रद्द केलेला गोल ‎‎चुकीचा निर्णय होता. इराणला दिलेल्या वागणुकीमुळेही‎वाद अधिकच वाढला.‎ सामना संपल्यानंतर लगेच इराणच्या खेळाडूंना‎मेक्सिकोला पाठवले. पश्चिम आशियातील युद्धाच्या‎पार्श्वभूमीवर ही भू-राजकीय गरज असू शकते. मात्र,‎इराणचा मुद्दा हा अपवाद नव्हता. अर्जेंटिनाच्या सामन्यांत‎इजिप्त व स्वित्झर्लंडविरुद्ध झालेले काही निर्णयही‎वादग्रस्त ठरले. कोणत्याही मोठ्या स्पर्धेची विश्वासार्हता‎टिकवण्यासाठी निर्णयांवर संशयाची छाया नसणे‎आवश्यक असते.‎ याच बाबतीत हा विश्वचषक वादात सापडला आहे. ट्रम्प‎आणि फिफाचे अध्यक्ष यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील‎चर्चेनेही अनावश्यक वाद निर्माण केला. निर्णय प्रक्रियेत‎फिफा अध्यक्षांची भूमिका नसल्याचे फिफाने स्पष्ट केले‎असले, तरी या स्पष्टीकरणाने जनमानसातील शंका दूर‎झाल्या नाहीत.‎ खेळाशी संबंधित विषयावर एखाद्या देशाच्या प्रमुखाने व‎फिफा अध्यक्षांनी चर्चा करण्याची गरजच का भासावी?‎त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या शंका वाढत नाहीत का?‎खेळात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप‎स्वीकारार्ह नाही आणि ही घटना संशय निर्माण‎करण्यास पुरेशी होती. अशा प्रकारचा संशय एखाद्या‎जागतिक स्पर्धेच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने योग्य नाही.‎त्यामुळेच त्यावर उपाय योजना केली पाहिजे.‎ स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून बरेच‎काही पणाला लागले आहे. अंतिम काही सामन्यांसाठी‎फिफाने सर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी व प्रत्येक‎निर्णय पूर्णपणे निष्पक्ष असल्याची खात्री करावी.‎आपल्या प्रतिष्ठेवर कोणताही डाग लागू न देणे ही त्याची‎जबाबदारी आहे. या आरोपांना कटकारस्थानाचा भाग‎म्हणून नाकारले जाऊ शकते. मात्र प्रत्येक वेळी तसे‎करून चालणार नाही.‎ या विषयावरील प्रश्न अधिक तीव्र होत असून, आता‎अधिक सतर्कतेची गरज आहे. माझ्यादृष्टीने निर्णयांतील‎विसंगती ही सर्वात मोठी समस्या आहे. उदाहरणार्थ -‎इंग्लंड व हॅरी केनविरुद्ध मेक्सिकोच्या सामन्यात दिलेली‎पेनल्टी व इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाच्या बाजूने दिलेली‎पेनल्टी यांची तुलना केली तर निर्णयांतील स्पष्ट विसंगती‎दिसून येते. दोन्ही प्रसंगी निर्णय कोणत्याही बाजूने जाऊ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎शकला असता. मेक्सिकोच्या बाबतीत मात्र निर्णय‎अझ्टेका स्टेडियमवरील यजमान संघाच्या बाजूने गेला.‎मोठ्या खेळाडूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येत नाही‎आणि त्यांच्याशिवाय खेळाची लोकप्रियताही कमी होऊ‎शकते. या दोन्ही बाबींचा विचार व्हायला हवा. ही बाब‎येथे लक्षात घेतली पाहिजे.‎ मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांच्या मनातील‎धारणा. चाहत्यांच्या नजरेत स्पर्धेची प्रतिमा पूर्णपणे‎निष्पक्ष असली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या संशयाला‎जागा नसावी. 19 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी‎फिफाने याची खात्री करणे आवश्यक आहे.‎ फिफा हे साध्य करू शकेल का, याचे उत्तरच या‎विश्वचषकाचा वारसा ठरवेल.‎ अखेरीस कोण जिंकतो आणि कोण हरतो, यापेक्षा‎खेळाचा विजय अधिक महत्त्वाचा असतो. आणि‎स्पर्धेतील प्रत्येक निर्णय, प्रत्येक स्तर संशयापलीकडे‎असेल तेव्हाच हे शक्य होऊ शकेल.‎(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ फिफाने उर्वरित निर्णायक सामन्यांसाठी‎सर्वोत्तम पंचांची नियुक्ती करावी.प्रत्येक‎निर्णय संशया पलीकडचा असला‎पाहिजे. तिच गोष्ट आपल्या प्रतिष्ठेवर‎कोणताही डाग लागू देत नाही. खेळाच्या‎विश्वासार्हतेसाठी ते अत्यावश्यक आहे.‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *