गरीबीवर खूप चर्चा होते. पण आपण एका नव्या‘एज्युकेशन ट्रॅप’मध्ये तर अडकत नाही ना? भारताची65 टक्के लोकसंख्या तरुण आहे. अशा वेळी या युवाशक्तीला देशाची ताकद बनवणे हे शासनाचे सर्वोच्चप्राधान्य असायला हवे. परंतु आपली धोरणे,शिक्षण-व्यवस्था व रोजगारनिर्मितीची प्रणाली तरुणांच्याक्षमतेचा पूर्ण विकास करत आहे का? येत्या दशकातभारताकडे उपलब्ध असणाऱ्या कार्यक्षम मनुष्यबळाचीक्षमता हळूहळू कमी होत चालली आहे. परवडणाऱ्या,दर्जेदार शिक्षणाच्या संधी कमी होणे, हे यामागचे मुख्यकारण आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी उत्तमजीवनशैलीचे स्वप्न हे शिक्षण आणि योग्य कौशल्यांशी जोडलेले असते. पूर्वी साईनबोर्ड आणि पोस्टर बनवणारा पेंटर आता संगणक डिझायनिंग शिकून फ्लेक्स बनवू लागला. आपण स्वतःमध्ये सतत बदल घडवतशारीरिक श्रमाकडून स्वयंचलित उत्पादनाकडे वळले पाहिजे. आपल्या मजबूत शिक्षण-व्यवस्थेच्या जोरावर आपण जगाला उत्तम गुणवत्ता दिली आहे. पण आपणती आघाडी कायम ठेवली आहे का? की नव्याप्रयोगांच्या शर्यतीत आपण आपली मूळ संस्थात्मकताकदच कमकुवत करून बसलो आहोत? आपल्याआधीच्या पिढीला स्वस्त व सुलभ सार्वजनिक शिक्षणसंस्था उपलब्ध होत्या. याउलट आजच्या तरुण पिढीलाफी आणि कोचिंगवर प्रचंड खर्च करावा लागतो. शेवटीही पिढी परीक्षा, निवड प्रक्रियेत अपयशी ठरणाऱ्याजाळ्यात अडकून पडते. गुणवत्ता टिकवणे आणिशिक्षण सुलभ करणे ही संस्थांची जबाबदारी होती.त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे तरुणांसमोर व्यावसायिकपर्याय निवडण्याच्या संधी कमी होत आहेत. हाच तो‘एज्युकेशन ट्रॅप’ आहे – एक दुष्टचक्र. यातून बाहेरपडणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. जुन्याआणि नामांकित व्यावसायिक संस्था प्रवेश परीक्षा योग्यउमेदवार निवडण्यात अपयशी ठरत आहेत. यामुळेविद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची या यंत्रणांची क्षमताखरोखरच उरली आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माणहोतो. भारत आपल्या कुशल, प्रशिक्षित व सुशिक्षित मनुष्यबळाला जगभरात पाठवण्यासाठी ओळखलाजातो. या लोकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरस्वतःच्या संस्थांचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केलेआहे. भारतातही त्यांनी सरकारी, सार्वजनिक आणिखाजगी क्षेत्रात मोलाचे योगदान देऊन देश एका नव्याउंचीवर नेला. यातल्या बहुतांश लोकांनी आपले शिक्षणसरकारी शाळा आणि कॉलेजांमधूनच पूर्ण केले होते.करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर करून अत्यंत दर्जेदारआणि स्वस्त शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवणे, हेसरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. वाढती लोकसंख्याआणि उत्तम व्यावसायिक शिक्षणासाठी वाढणारी स्पर्धापाहता, आज आपण खरोखरच स्वस्त शिक्षण देऊशकत आहोत का? हा एक मोठा प्रश्न आहे. 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 21-अ जोडूनशिक्षणाचा अधिकार हा मूलभूत हक्क बनवण्यातआला. 1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा लागू झाला.यामुळे सार्वजनिक शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळण्यावरभर दिला गेला. शाळांमधील पटसंख्या 98 टक्क्यांपर्यंतपोहोचली आणि लाखो मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली.परंतु ‘लर्निंग डेफिसिट’ म्हणजेच शिकण्याच्यागुणवत्तेतील तूट कायम राहिली. ही यंत्रणा मजबूतकरण्याऐवजी आपले लक्ष खाजगी शाळांमधीलप्रवेशांकडे वळले. परिणामी शिक्षण दिवसेंदिवस महागहोत गेले. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार, गेल्यादशकात 94,000 सरकारी शाळा एकतर बंद झाल्याकिंवा त्यांचे विलीनीकरण केले. यामुळे वंचितघटकांसाठी शिक्षणाची उपलब्धता हा प्रश्न अधिकगंभीर बनला. देशाच्या दुर्गम भागांपर्यंत शिक्षणपोहोचवण्याचे प्रयत्न मागे पडले. सरकारी शाळांमधीलप्रवेशांचे प्रमाण 6 टक्क्यांनी घटले . शाळा सोडणाऱ्यामुलांची संख्या वाढली. अशा प्रकारे,सामाजिक वआर्थिक दरी मिटवण्याचे शिक्षण मोठे माध्यम असायलाहवे होते. तेच शिक्षण आज ही दरी अधिक रुंदावतानादिसत आहे. (लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे.) सरकारी शाळांची संख्या 2014-15मधील 11.07 लाखांवरून घटून2024-25 मध्ये 10.13 लाखावर आली.ही घसरण देशात लाखो ‘गहाळविद्यार्थ्यां’ची स्थिती आहे. हा समूह एकावंचित लोकसंख्येच्या रूपात आव्हानबनून राहील .
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



