राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. या मिळवलेल्या मोठ्या यशानंतर आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबाबत मोठे विधान केले आहे. संख्याबळाअभावी ठाकरे पुन्हा सभागृहात पोहोचू शकतील का, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.
जनतेने विरोधकांना नाकारले
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकज भोयर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या निकालात महायुतीला मिळालेले यश हे सरकारने केलेल्या कामाची पावती आहे. जनतेने विरोधकांना नाकारले असून, विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्यांची त्रेधा तिरपट उडाली आहे. याच कारणामुळे काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असावा, असे पंकज भोयर म्हणाले.
यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. असं वाटतंय की उद्धव ठाकरे पुन्हा कोणत्याही सभागृहात पोहोचू शकणार नाहीत, असे विधान पंकज भोयर यांनी केले.
ठाकरे गटाकडे केवळ २० आमदार
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत मे २०२६ मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भोयर यांनी ठाकरेंच्या अडचणींकडे लक्ष वेधले. विधानसभेतील सध्याच्या गणितानुसार, ठाकरे गटाकडे केवळ २० आमदार आहेत. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा (साधारण २९-३० मते) गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे. ठाकरेंना पुन्हा निवडून येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या जादा मतांची गरज भासणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत सध्या राज्यसभेच्या जागांवरूनही ओढाताण सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुनच पंकज भोयर यांनी टीका केली.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या राजकीय प्रवेशावरही पंकज भोयर यांनी टोला लगावला. ते अभिनेते आहेत, पण ते सक्रिय राजकारणात राजकीय चर्चा कधीपासून करायला लागले? यावर विश्वास बसत नाही, असे पंकज भोयर यांनी म्हटले.
शहर
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- पुणे: इंद्रायणीच्या महापुरात वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय! शाळा, महाविद्यालयांसह १० इमारती तात्पुरत्या अधिग्रहित
महाराष्ट्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

