येत्या 28 ऑगस्टला माझ्या कुटुंबात एक लग्न आहे. ठिकाण आहे चेन्नईपासून 300 किमी दूर कुंभकोणम. रेल्वेचे तिकीट आरक्षित करता यावे यासाठी सर्व नातेवाइकांना दोन महिने आधीच सांगण्यात आले आहे. पण गोष्ट तेव्हा बिघडू लागली जेव्हा मोठा वेळ आणि बजेटचे गणित एकमेकांशी भिडू लागले. मुंबईपासून तिथपर्यंतचा ट्रेनचा प्रवास 35 तासांचा आहे. वृद्धांसाठी एवढा प्रवास कष्टापेक्षा कमी नाही. त्यामुळे, बहुतेकांनी जवळच्या विमानतळासाठी म्हणजेच तिरुचिरापल्लीसाठी फ्लाइट घेण्याचे ठरवले. पण खरा ड्रामा तेव्हा सुरू झाला जेव्हा फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपवर लग्नाची पत्रिका आली. पत्रिका येताच अभिनंदनाच्या संदेशांऐवजी ग्रुपवर या गोष्टीची डोकेदुखी सुरू झाली की मुंबई ते तिरुचिरापल्लीचे तिकीट ~16,000 रुपयांचे आहे. आता जरा पाहुण्यांचा पूर्ण खर्च समजून घ्या- सोळा हजारांची फ्लाइट, विमानतळापासून लग्नाच्या ठिकाणापर्यंत 2,500 ची टॅक्सी, एखाद्या बजेट हॉटेलमध्ये दोन दिवस राहण्याचे चार हजार व 2 हजार किरकोळ खर्च. यात आहेर वेगळा. परिणाम असा झाला की या खर्चाने लग्नाच्या आनंदाला दाबून टाकले. ग्रुपवर बहुतांश नातेवाइकांनी आतापर्यंत येण्यास होकार दिलेला नाही. आज मध्यमवर्गीयांसाठी लग्न अटेंड करण्याचा सरासरी खर्च एवढा वाढला आहे की तो त्यांना उपस्थित राहण्यापासून रोखत आहे. पाहिले तर भारतीय समाजात लग्ने ही सामाजिक जबाबदारीची मोठी करन्सी आहेत. जर तुम्ही कुटुंबातील लग्नाला जात नाही, तर तुम्ही वृद्धांच्या त्या ‘सोशल बॉयकॉट’ची जोखीम घेत असता जे 6-6 महिने तुमच्याशी बोलत नाहीत. नातेवाइकांच्या डोक्यात वहीखाते चालत असते, ज्यात कुणी कुणाच्या लग्नात हजेरी लावली व कुणी किती आहेर दिला, याचा हिशोब अनेक दशक ठेवला जातो. आज अडचण अशी की यजमान इन्स्टाग्रामवर परफेक्ट दिसणाऱ्या ‘फेयरीटेल वेडिंग’च्या मागे धावत आहेत, पण किंमत पाहुण्यांना मोजावी लागत आहे. बदनामीच्या याच भीतीने अनेक वृद्ध थकवणाऱ्या मार्गांनी प्रवास करण्यास भाग पडले आहेत, जेणेकरून ते गॉसिपचा विषय बनणार नाहीत. मॅनेजमेंट टिप: मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध, सोशल मीडियाच्या फोटोंचा भाग बनण्यासाठी बजेट बिघडवू नका. देखाव्याच्या काळात खिसा व मानसिक शांतता वाचवणे हेच मोठे ॲसेट मॅनेजमेंट आहे. लग्नात स्वतः जाण्याऐवजी भेटवस्तू पाठवून द्या, जी नवदाम्पत्याच्या उपयोगाला येईल व तुमचा स्वाभिमान सुरक्षित ठेवेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
- पुणे: अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण; बारामतीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल, शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ!
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
महाराष्ट्र
- पुणे: गणेशोत्सवाची विडंबना खपवून घेतली जाणार नाही पुण्यात भाजप नेते धीरज घाटे आणि हेमंत बिडकर यांचा सज्जड इशारा!
- कोल्हापूर: स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- जालना: माझ्यामधी वळवळ करू नका.. मराठा आरक्षण मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचे छगन भुजबळांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लबोल!
- मुंबई: स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नयेत; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: राजकारणात मोठा भूकंप होणार? संजय राऊतांचा मोठा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात देशाचे नवे 'उपपंतप्रधान'!
- नवी दिल्ली: 'काॅक्रोच जनता पार्टी'मध्ये उभी फूट! मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'CJP-डेमोक्रेटिक' पक्षाची केली घोषणा, अरविंद केजरीवाल आणि अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप!
- अयोध्या: राम मंदिरात ऐतिहासिक निर्णय; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या सीईओ पदी नियुक्ती
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड


























Subscribe to my channel




