गेल्या आठवड्यात सोमवार ते बुधवारदरम्यान हजारो किलोमीटर अंतरावरील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन घटना घडल्या. एक मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तर दुसरी जपानच्या क्यूशू बेटावर. भोपाळला मान्सूनचे दाट ढग जमले होते, ज्यात जपानमधील चिंताग्रस्त वातावरणाची झलक दिसत होती. “किसान क्रांती यात्रे’अंतर्गत शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भोपाळचा मुख्य रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. अचानक शाळा बंद झाल्या. पालक त्रस्त होते. गुदमरून टाकणाऱ्या उकाड्याने प्रत्येक कारचालक हैराण होता. होशंगाबादचा मुख्य रस्ता पूर्ण बंद होता. कुणाला बिझनेस प्रेझेंटेशन द्यायचे होते, तर कुणाला वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी घरी पोहोचायचे होते. पण कुणीही एक इंचही पुढे सरकू शकले नाही. अनेक जण फोनवर सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये अडकले होते. काही जण स्टिअरिंगवर हात आपटून सतत हॉर्न वाजवत होते. काहींसाठी ही परिस्थिती असह्य असल्याने ते खिडकीच्या काचा खाली करून ट्रॅफिक जामला शिव्याशाप देऊ लागले. काहींनी जवळच्या छोट्या गल्ल्यांत घुसून भोपाळ-जबलपूर महामार्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण या प्रक्रियेत त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत होऊ शकणारी वाहतूकही रोखली. मोठी वाहने त्या गल्ल्यांत वळू शकत नसल्याने दुचाकीही अडकल्या. मीही त्याच ट्रॅफिक जाममध्ये होतो. अनेकांनी कारचालकांना संयम राखण्याचे आवाहन केले. पण सर्वांनाच लवकर घरी पोहोचायचे होते. या गोंधळात कुणीही वेळेवर पोहोचले नाही. या अधीरतेचा परिणाम असा झाला की काही लोकांना मित्र किंवा नातेवाइकांच्या घरी रात्र काढावी लागली, वास्तविक पाहता भोपाळ हे दिल्लीपेक्षा खूपच लहान शहर आहे. गेल्या मंगळवारी नेमक्या याच वेळी जपानच्या दक्षिणेकडील बेटावर 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. 1500 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले, त्यापैकी 179 पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. अनेकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. सुमारे 80 हजार घरे पाणी आणि विजेशिवाय होती. अनेक जण 24 ते 48 तास झोपले नाहीत. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, ते चिंतेत होते. संकटावेळी माणसाची प्रवृत्ती असते की तो गोंधळून माहिती मिळवण्यासाठी ओरडतो, पुढे जाऊन समस्या कशी सोडवली जाऊ शकते, हे पाहतो. तो आपल्या कुटुंबासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण बेटावरील त्या उद्ध्वस्त भागातही अनेक लोक अन्न-पाण्यासाठी रांगेत उभे नव्हते, तर ज्यांची घरे पूर्णपणे तुटली होती किंवा जे भुकेले होते, त्यांच्यापर्यंत स्वयंसेवक म्हणून अन्न-पाणी पोहोचवण्यासाठी उभे होते. रांगेत उभ्या अनेकांच्या पायात वेदना होत होत्या. त्यांना त्यांच्या बुटांखाली अजूनही भूकंपाचे धक्के जाणवत होते, पण तरीही ते आपल्या जागी उभे राहिले. हेच त्याच्या सर्वात शुद्ध स्वरूपात “गामन’ होते. “गामन’ ही एक प्रमुख जपानी सांस्कृतिक संकल्पना आहे. याचा अर्थ - सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपल्या वैयक्तिक वेदना, राग किंवा तक्रारी लपवून ठेवणे. नैसर्गिक आपत्ती, अडचणी किंवा दुःखांचा शांततेने आणि धैर्याने सामना करणे. समाज आणि राष्ट्राच्या गरजांना आपल्या वैयक्तिक दुःखापेक्षा वर ठेवणे. कुठेतरी आपण सगळे असेच लहानाचे मोठे झालो आहोत की आपल्याला त्वरित समाधान हवे असते किंवा याला “टू मिनिट्स नूडल्स जनरेशन’ असेही म्हणता येईल. पण आपण आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना “गामन’चे हे धडे नक्की शिकवले पाहिजेत. यामुळे त्यांची चिंता कमी होण्यास मदत होईल आणि ते आणीबाणीच्या परिस्थितीतही शांत राहायला शिकतील.
फंडा असा की, जेव्हा पायाभूत सुविधा कोलमडतात किंवा समाज थांबतो, तेव्हा खरी ताकद यावरून मोजली जात नाही की तुम्ही आणि मी किती लवकर घरी पोहोचलो. ती त्या शांत क्षणांमध्ये दिसून येते, जेव्हा आपल्यासारखे सामान्य लोक घाबरून जाण्याऐवजी संयम आणि वैयक्तिक निराशेपलीकडे जाऊन सामूहिक जबाबदारी निवडतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



