मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्या बातम्यांचे रिपोर्टिंग कसे केले असते, अशी मांडणी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिव्य मराठीच्या या प्रयोगात केली आहे. पुलंनी मराठी माणसाला खळखळून हसवले. त्यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील अंतू बर्वा नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे वृत्तांकन करत आहे. संमेलने साहित्य संस्थांना घेऊ द्या, ते काम सरकारचे नाही अंतू बर्वा | नाशिक काय म्हणतोस... नाशिकक ‘इश्व’ मराठी संमेलन भरला हा? अरं, नाशिकक् काय आणि मेल्या कैलासाक् काय... आमचा काय संबंध? पण तिथे त्या व्यासपीठावर श्रीपाद भालचंद्र जोशींनी जे काय ‘तासल्यान’ ना, ते ऐकून अनेकांची तोंडं वाकडी झाली आसतली! जोशी म्हणताहेत, ‘अरे बाबांनो, ही संमेलनं भरवचा काय सरकारचं काम आहे? सरकारनं आपली लोकांची कामं करावीत, हे साहित्याचा लचांड कशाक गळ्यात मारून घेतास?’ बरोबरच की! सरकारक कामं कमी की काय? त्यांना साहित्यात नाक खुपसल्याशिवाय जेवण पचत नाही तेच खरे! ते जोशी म्हणताहेत, ‘सरकारला संमेलनं भरवायला 70 कोटी लागतात, आणि आम्ही साध्या साहित्य संस्था 7-8 कोटीत तोच उजेड पाडतो.’ म्हजे विचार करा, वरचे 60-62 कोटी गेले कुठे? ‘भुर्रर्र’ करून उडाले की काय? की कोणाच्या खिशातल्या भगदाडात पडले? आणि साहित्य संमेलनास मात्र फक्त २ कोटींची तावडी फेकून मारता. म्हणजे आमचाच माल अन् आमचेच हाल असेच झाले की हे. आमचे सामंत साहेब आणि प्रशासन जागरूक आहेत असे प्रमाणपत्रही दिलंय हो जोशींनी. पण जोशींचा मूळ मुद्दा काय, आम्ही जे मागितच नाही तेच सरकार आमच्या ताटात वाढतं हा! उद्या सरकार म्हणेल, ‘आम्ही तुमची अंत्ययात्रासुद्धा काढून देऊ’, अरे पण आम्हाला मरायचेच नसेल तर? कुसुमाग्रजांच्या ‘नवलाख तळपती दीप विजेचे’ या कवितेप्रमाणेच नाशिकच्या साहित्यपीठावर अ. भा. साहित्य संमेलनाचे ३ माजी अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, उत्तम कांबळे, डॉ. सदानंद मोरे यांनी विश्व मराठी संमेलनाच्या प्रारंभाची ज्योत प्रज्वलित केली. अशा दुर्मिळ प्रसंगाला नाशिककरांनी उभे राहून दाद दिली. मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा त्या बोलीभाषांचा काय? तर जोशी साहेब म्हणताहेत, मराठीतले सगळे शब्द मुळात बोलीतूनच आलेत. जोपर्यंत तुम्ही बोलीभाषांना प्रतिष्ठा देत नाही, तोवर 90 टक्के व्यवहार साहित्याच्या बाहेरच राहील. तो मराठीत येईलच कसा? अभिजात दर्जा मिळाला तो प्राकृताला, सरकाराने काय केले? फक्त सह्या? पण दर्जा मिळाला हे महत्त्वाचे. यामुळे प्रत्येक मराठी माणसाला आपल्याला सगळ्यांनाच कायतरी मिळाल्यासारखा वाटते हो... पण मराठी ‘ज्ञानभाषा’ झाल्याशिवाय गत्यंतर नाही याचे भान ठेवा म्हणजे झाले!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel





Become our partner and turn referrals into revenue—join now!