नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ सबरीमाला प्रकरणाचीसुनावणी करत आहे. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेनिर्णय दिला होता की, सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्षेवयोगटातील महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदीअसंवैधानिक आहे आणि ती समानता व धर्मपालनाच्यास्वातंत्र्यासारख्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.आता घटनापीठासमोर सुनावणीचा उद्देश हा आहे की,इतर धर्मांमधील भेदभावपूर्ण प्रथांचेही पुनरावलोकनकेले जावे आणि या मुद्द्यांवर घटनात्मक तत्त्वे प्रस्थापितकेली जावीत. आतापर्यंत हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीधार्मिक संघटनांनी अशी भूमिका घेतली आहे की,न्यायालयांना मूळ धार्मिक प्रथा ठरवण्याचा अधिकारनाही, कारण हे श्रद्धेशी निगडित विषय आहेत. परंतु सबरीमाला प्रकरणात प्रश्न हा उद्भवतो की, धार्मिकप्रथा नक्की कुणाच्या? केरळमधील माला अरयन आदिवासी समुदाय सबरीमाला मंदिराचा पारंपरिक संरक्षक होता. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला मंदिराचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्यापूर्वी ब्राह्मण त्या विधींचे पालन करत नव्हते, ज्यांचेते आज संरक्षण करू इच्छितात. माला अरयनआदिवासी हे मासिक पाळीच्या वयोगटातील महिलांच्याप्रवेशावर कोणतेही निर्बंध घालत नसत. सध्या मंदिराच्या‘तंत्री’ (मुख्य पुजारी) द्वारे केल्या जाणाऱ्या शुद्धीकरणविधीवरही त्यांचा विश्वास नव्हता. आता सबरीमाला प्रकरण अशा एका चित्ररूपातसमोर येत आहे, जिथे एक समूह दुसऱ्याच्या क्षेत्रावरअतिक्रमण करत आहे, तर दुसरा समूह या मंदिराचापारंपरिक संरक्षक राहिला आहे. दोन्ही समूहांचेविधीदेखील वेगवेगळे आहेत : एक लैंगिकदृष्ट्या तटस्थआहे, तर दुसरा महिलांच्या विशेषतः मासिक पाळीच्यावयोगटातील महिलांच्या मंदिर प्रवेशाला मान्यता देतनाही. माला अरयन आदिवासी समुदायाचा दावा आहेकी, सबरीमाला मंदिरातील देवता अय्यप्पन हे त्यांच्यापूर्वजांचे आराध्य दैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की,इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्या जमिनीवरूनबेदखल करण्यात आले. तरीही, त्यांचे सदस्य मंदिरातपरतून आपल्या विधींचे पालन करत राहिले आहेतआणि आजही सबरीमालाला आपल्या पूर्वजांचे दैवतमानतात. 2013 पासून त्यांनी केरळ उच्च न्यायालय आणि राज्यसरकारकडे अनेकदा याचिका दाखल केल्या आहेत,जेणेकरून मंदिराच्या वार्षिक विधीचा भाग म्हणून‘मकरविलक्कू’ प्रज्वलित करण्याचा आपला अधिकारपुन्हा प्राप्त करता येईल. परंतु सरकारने आणिन्यायालयाने आतापर्यंत कोणताही स्पष्ट निर्णय दिलेलानाही. ऐतिहासिक पुरावे असे संकेत देतात की, मालाअरयन समुदायाचे दावे रास्त आहेत. 19 व्या शतकाच्यामध्यावर दक्षिण भारताची यात्रा करणाऱ्या सॅम्युअलमतीर यांनी त्यांच्या ‘नेटिव्ह लाइफ इन त्रावणकोर’(1883) या पुस्तकात या समुदाय आणि सबरीमालामंदिर यांच्यातील संबंधांचा उल्लेख केला आहे. असेदिसून येते की, 19 व्या शतकातही हे मंदिरदीर्घकाळापर्यंत लैंगिकदृष्ट्या तटस्थ राहिले होते आणि1950 च्या दशकापर्यंत तिथे महिलांना प्रवेशाची अनुमतीहोती. मंदिराच्या विधींमध्ये पुरुषी प्रवृत्ती 20 व्याशतकाच्या मध्याच्या सुमारास वाढू लागली आणि 1965मध्ये 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर बंदीघालण्यात आली. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचानिर्णय येऊनही, 10 ते 50 वर्षे वयोगटातील खूप कमीमहिलांनी सबरीमाला मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केलाआहे. म्हणजेच न्यायालयाचा निर्णयदेखील व्यावहारिकस्तरावर वस्तुस्थिती बदलण्यास सक्षम ठरलेला नाही.केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारनेसबरीमाला प्रकरणावरील आपल्या भूमिकेत ‘यू-टर्न’घेतला आहे. त्यांना या निर्णयाचा पश्चात्ताप होऊशकतो, कारण यामुळे महिला, उदारमतवादी पुरुष आणिआदिवासी मतदार या तिन्ही घटकांना दुरावण्याचा धोकाआहे. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) माला अरयन आदिवासी समुदायाचादावा आहे की, सबरीमालाची देवताअय्यप्पन हे त्यांच्या पूर्वजांचे आराध्यदैवत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इ.स.1800 च्या सुमारास त्यांना त्यांच्याजमिनीवरून बेदखल केले गेले होते.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




