एन. रघुरामन यांचा कॉलम:दुप्पट क्षमतेने काम करण्याची आणि बॉसला सिद्ध करून दाखवण्याची हीच वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी लोकसभेत इशारा दिला की पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेले जागतिक अडथळे यापुढेही सुरू राहू शकतात. कोविड काळाप्रमाणेच आताही देशवासीयांनी तयार व एकजूट राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्यसभेतही याचीच पुनरावृत्ती केली आणि गरीब, मजूर, स्थलांतरित तसेच इतर गरजूंना मदत व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांकडे सहकार्य मागितले. कोविडच्या संकटात देशाने कशा प्रकारे एकजुटीने आव्हानाचा सामना केला होता, याची त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की, आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. आणि बुधवारी सरकारने हळूहळू नियम कठोर करण्यास सुरुवात केली, ज्यापैकी एक आपल्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित होता. सरकारने घोषणा केली की, जर तुमच्या घरापर्यंत पीएनजीची (पाइप्ड नॅचरल गॅस) लाइन असेल आणि तरीही तुम्ही कनेक्शन घेतले नाही, तर तीन महिन्यांनंतर सरकार तुमचा एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठा खंडित करू शकते. युद्धाच्या परिणामी आयात प्रभावित झाल्याने एलपीजीचा तुटवडा निर्माण होत असताना सरकारचे हे पाऊल समोर आले आहे. भारत आपला 6०% एलपीजी आयात करतो, ज्यातील 9०% पश्चिम आशियातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो, जे सध्या संघर्षाचे केंद्र बनले आहे. असे करून सरकारने संकेत दिले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे. ‘नेहमीप्रमाणे काम सुरू राहील’ हा दृष्टिकोन चालणार नाही. उद्योजक व आर्थिक घडामोडी चालवणाऱ्या शीर्ष लोकांनी हा संकेत सर्वात आधी ओळखला आहे. गेल्या 3 दिवसांत मी उद्योजकांसोबत काही बैठकांमध्ये सहभागी झालो, जिथे सर्वांचे म्हणणे होते की, ‘येणारे काही महिने खूप उलथापालथीचे राहतील.’ त्यांनी आधीच त्यांच्या एचआर प्रमुखांना कंबर कसण्याचे संकेत दिले आहेत. काही काळ भरती संथ करा किंवा थांबवा. नवीन आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये होणाऱ्या वेतनवाढीच्या पार्श्वभूमीवर एचआरला निर्देश दिले गेले आहेत की, पगारवाढीसाठी नावे पाठवण्यापूर्वी कामगिरीचे मूल्यमापन करावे आणि ‘नॉन-परफॉर्मिंग’ तसेच ‘अनावश्यक’ पदे काढून टाकावीत. सध्याचे वातावरण कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देत आहे. आपल्यासारख्या बहुतांश मिड-लेव्हल कर्मचाऱ्यांसाठी हा केवळ आणखी एक व्यग्र सीझन नाही, तर स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आणि संस्थेत आपले स्थान बळकट करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. यासाठी काही सूचना खालीलप्रमाणे आहेत: 1. तुमचा आउटपुट आणि फोकस दुप्पट करा: अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारून आणि उच्च दर्जाचे निकाल देऊन, एखादा कर्मचारी केवळ ‘दहापैकी एक’ राहण्याऐवजी त्या दहांपैकी सर्वात महत्त्वाचा बनून संस्थेसाठी एक आवश्यक ‘अॅसेट’ बनू शकतो. 2. ’वर्क फ्रॉम होम’ला नकार द्या: जरी ‘वर्क फ्रॉम होम’ आता सामान्य व्यवस्था असली तरी सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मकदृष्ट्या ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याची गरज आहे. जिथे निर्णय घेतले जातात आणि आव्हानांचा सामना केला जातो, तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे तुमची बांधिलकी आणि एकजूट दर्शवते. व्हिडिओ कॉलवर हे दाखवणे कठीण असते. कठीण काळात तुम्ही कंपनीत टिकून राहण्यासाठी आणि वाढीसाठी समर्पित आहात, हे यातून नेतृत्वाला समजते. 3. तुम्ही त्याग करू शकता हे दाखवून द्या: तुम्ही लाँग वीकेंड जोडून कुटुंबासोबत ब्रेक प्लॅन करू शकता, जसे की रामनवमी, नंतर चौथा शनिवार-रविवार आणि लगोलग महावीर जयंतीची ऐच्छिक सुट्टी. अनेक लोक असा लांबचा ब्रेक घेऊ शकतात. परंतु यात आणखी एक कॅज्युअल किंवा मेडिकल रजा जोडल्याने केवळ तुमच्या बॉसलाच नव्हे, तर टॉप मॅनेजमेंटलाही चुकीचा संदेश जाऊ शकतो. 4. तुमची उत्पादकता दाखवा: गरजेपेक्षा जास्त गाजावाजा न करता अतिशय कुशलतेने तुमचे वास्तविक काम संस्थेतील योग्य लोकांपर्यंत पोहोचवा. फंडा हा आहे की, जेव्हा आपण एका ‘कठीण काळातून’ जात आहोत, तेव्हा आपल्या ‘जॉब डिस्क्रिप्शन’च्या पुढे जा आणि कंपनीसाठी हे अशक्य करून दाखवा की ते तुमच्याशिवाय कामाचा विचारही करू शकतील.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *