पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी लोकसभेत इशारा दिला की पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेले जागतिक अडथळे यापुढेही सुरू राहू शकतात. कोविड काळाप्रमाणेच आताही देशवासीयांनी तयार व एकजूट राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्यसभेतही याचीच पुनरावृत्ती केली आणि गरीब, मजूर, स्थलांतरित तसेच इतर गरजूंना मदत व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांकडे सहकार्य मागितले. कोविडच्या संकटात देशाने कशा प्रकारे एकजुटीने आव्हानाचा सामना केला होता, याची त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की, आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. आणि बुधवारी सरकारने हळूहळू नियम कठोर करण्यास सुरुवात केली, ज्यापैकी एक आपल्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित होता. सरकारने घोषणा केली की, जर तुमच्या घरापर्यंत पीएनजीची (पाइप्ड नॅचरल गॅस) लाइन असेल आणि तरीही तुम्ही कनेक्शन घेतले नाही, तर तीन महिन्यांनंतर सरकार तुमचा एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठा खंडित करू शकते. युद्धाच्या परिणामी आयात प्रभावित झाल्याने एलपीजीचा तुटवडा निर्माण होत असताना सरकारचे हे पाऊल समोर आले आहे. भारत आपला 6०% एलपीजी आयात करतो, ज्यातील 9०% पश्चिम आशियातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो, जे सध्या संघर्षाचे केंद्र बनले आहे. असे करून सरकारने संकेत दिले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे. ‘नेहमीप्रमाणे काम सुरू राहील’ हा दृष्टिकोन चालणार नाही. उद्योजक व आर्थिक घडामोडी चालवणाऱ्या शीर्ष लोकांनी हा संकेत सर्वात आधी ओळखला आहे. गेल्या 3 दिवसांत मी उद्योजकांसोबत काही बैठकांमध्ये सहभागी झालो, जिथे सर्वांचे म्हणणे होते की, ‘येणारे काही महिने खूप उलथापालथीचे राहतील.’ त्यांनी आधीच त्यांच्या एचआर प्रमुखांना कंबर कसण्याचे संकेत दिले आहेत. काही काळ भरती संथ करा किंवा थांबवा. नवीन आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये होणाऱ्या वेतनवाढीच्या पार्श्वभूमीवर एचआरला निर्देश दिले गेले आहेत की, पगारवाढीसाठी नावे पाठवण्यापूर्वी कामगिरीचे मूल्यमापन करावे आणि ‘नॉन-परफॉर्मिंग’ तसेच ‘अनावश्यक’ पदे काढून टाकावीत. सध्याचे वातावरण कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देत आहे. आपल्यासारख्या बहुतांश मिड-लेव्हल कर्मचाऱ्यांसाठी हा केवळ आणखी एक व्यग्र सीझन नाही, तर स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आणि संस्थेत आपले स्थान बळकट करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. यासाठी काही सूचना खालीलप्रमाणे आहेत: 1. तुमचा आउटपुट आणि फोकस दुप्पट करा: अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारून आणि उच्च दर्जाचे निकाल देऊन, एखादा कर्मचारी केवळ ‘दहापैकी एक’ राहण्याऐवजी त्या दहांपैकी सर्वात महत्त्वाचा बनून संस्थेसाठी एक आवश्यक ‘अॅसेट’ बनू शकतो.
2. ’वर्क फ्रॉम होम’ला नकार द्या: जरी ‘वर्क फ्रॉम होम’ आता सामान्य व्यवस्था असली तरी सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मकदृष्ट्या ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याची गरज आहे. जिथे निर्णय घेतले जातात आणि आव्हानांचा सामना केला जातो, तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे तुमची बांधिलकी आणि एकजूट दर्शवते. व्हिडिओ कॉलवर हे दाखवणे कठीण असते. कठीण काळात तुम्ही कंपनीत टिकून राहण्यासाठी आणि वाढीसाठी समर्पित आहात, हे यातून नेतृत्वाला समजते.
3. तुम्ही त्याग करू शकता हे दाखवून द्या: तुम्ही लाँग वीकेंड जोडून कुटुंबासोबत ब्रेक प्लॅन करू शकता, जसे की रामनवमी, नंतर चौथा शनिवार-रविवार आणि लगोलग महावीर जयंतीची ऐच्छिक सुट्टी. अनेक लोक असा लांबचा ब्रेक घेऊ शकतात. परंतु यात आणखी एक कॅज्युअल किंवा मेडिकल रजा जोडल्याने केवळ तुमच्या बॉसलाच नव्हे, तर टॉप मॅनेजमेंटलाही चुकीचा संदेश जाऊ शकतो.
4. तुमची उत्पादकता दाखवा: गरजेपेक्षा जास्त गाजावाजा न करता अतिशय कुशलतेने तुमचे वास्तविक काम संस्थेतील योग्य लोकांपर्यंत पोहोचवा. फंडा हा आहे की, जेव्हा आपण एका ‘कठीण काळातून’ जात आहोत, तेव्हा आपल्या ‘जॉब डिस्क्रिप्शन’च्या पुढे जा आणि कंपनीसाठी हे अशक्य करून दाखवा की ते तुमच्याशिवाय कामाचा विचारही करू शकतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




