Pune : पुण्यातील ट्रॅव्हल एजन्सींसाठी महत्त्वाची अपडेट; ग्राहकांकडून पैसे घेताना आता ‘या’ नियमांचं काटेकोर पालन अनिवार्य

Pune : शहरातील ट्रॅव्हल एजन्सी आणि एजंटना आता प्रत्येक ग्राहकाची माहिती आणि त्यांच्या व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यटनाच्या आकर्षक जाहिरातींद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना टाळणे, पर्यटनस्थळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुणेकर प्रवाशांची माहिती सहज उपलब्ध होऊन मदत कार्य तातडीने सुरू करणे आणि दहशतवादी घटनांपासून पर्यटन क्षेत्राचे रक्षण करणे हा या मागील उद्देश आहे.

पहिल्यांदाच अशा प्रकारे ट्रॅव्हल एजन्सीसाठी पोलिसांनी नियमावली लागू केली आहे. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि दिल्ली येथे लाल किल्ल्याबाहेरील बॉम्बस्फोटाच्या पाश्र्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील ट्रॅव्हल एजन्सींसाठी खास सुरक्षा नियम आखून दिले आहेत. बुधवारी (१० डिसेंबर) यासंबंधी विश्रामबाग पोलिस ठाण्यात बैठक झाली.

Pune : 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; शेवटच्या चिठ्ठीत ‘बापामुळे…’ धक्कादायक उलगडा

पोलिसांनी ग्राहक नोंदी, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि CCTV व्यवस्थापन यावर विशेष लक्ष ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पोलिस ठाण्यात नोंदवावा. एजन्सी चालवण्यासाठी संबंधित विभागाचे परवाने छायांकित सादर करणे. एजन्सीतील सर्व कर्मचाऱ्यांची पात्रता व पार्श्वभूमी तपासून छायांकित प्रत पोलिस ठाण्याला सादर करावी. संशयास्पद ग्राहक किंवा हालचाली दिसल्यास त्वरित पोलिस ठाण्याला संपर्क साधावा, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

ट्रॅव्हल एजन्सी प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवतात. मात्र, काही जण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे आधार, पॅन, मतदार कार्ड इत्यादी ओळखपत्रे तपासून नोंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून येणारे पेमेंट पूर्णतः ऑनलाइन घेतले जावे; जेणेकरून बँक तपशिलांद्वारे आवश्यकतेनुसार तपास करता येऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि ६० दिवसांचा बॅकअप राखणे अनिवार्य करण्यात आले आहे.

नियमावलीचा उद्देश पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि दहशतवादी घटनांचा संभाव्य धोका टाळणे हा आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकतात, त्या वेळी पुण्यातील पर्यटक सुखरूप आहेत का, याबाबत पोलिसांना तातडीने माहिती मिळत नाही. पर्यटकांची माहिती नोंद असल्यास संबंधित एजन्सी पोलिसांना तातडीने त्याबाबत कळवू शकते, असं विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद कसबे यांनी म्हटलं आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *