
Pune : शहरातील ट्रॅव्हल एजन्सी आणि एजंटना आता प्रत्येक ग्राहकाची माहिती आणि त्यांच्या व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यटनाच्या आकर्षक जाहिरातींद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना टाळणे, पर्यटनस्थळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुणेकर प्रवाशांची माहिती सहज उपलब्ध होऊन मदत कार्य तातडीने सुरू करणे आणि दहशतवादी घटनांपासून पर्यटन क्षेत्राचे रक्षण करणे हा या मागील उद्देश आहे.
पहिल्यांदाच अशा प्रकारे ट्रॅव्हल एजन्सीसाठी पोलिसांनी नियमावली लागू केली आहे. पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि दिल्ली येथे लाल किल्ल्याबाहेरील बॉम्बस्फोटाच्या पाश्र्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील ट्रॅव्हल एजन्सींसाठी खास सुरक्षा नियम आखून दिले आहेत. बुधवारी (१० डिसेंबर) यासंबंधी विश्रामबाग पोलिस ठाण्यात बैठक झाली.
|
Pune : 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; शेवटच्या चिठ्ठीत ‘बापामुळे…’ धक्कादायक उलगडा |
पोलिसांनी ग्राहक नोंदी, कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि CCTV व्यवस्थापन यावर विशेष लक्ष ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पोलिस ठाण्यात नोंदवावा. एजन्सी चालवण्यासाठी संबंधित विभागाचे परवाने छायांकित सादर करणे. एजन्सीतील सर्व कर्मचाऱ्यांची पात्रता व पार्श्वभूमी तपासून छायांकित प्रत पोलिस ठाण्याला सादर करावी. संशयास्पद ग्राहक किंवा हालचाली दिसल्यास त्वरित पोलिस ठाण्याला संपर्क साधावा, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
ट्रॅव्हल एजन्सी प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवतात. मात्र, काही जण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे ग्राहकांचे आधार, पॅन, मतदार कार्ड इत्यादी ओळखपत्रे तपासून नोंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून येणारे पेमेंट पूर्णतः ऑनलाइन घेतले जावे; जेणेकरून बँक तपशिलांद्वारे आवश्यकतेनुसार तपास करता येऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. ट्रॅव्हल एजन्सीच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि ६० दिवसांचा बॅकअप राखणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नियमावलीचा उद्देश पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि दहशतवादी घटनांचा संभाव्य धोका टाळणे हा आहे. अनेक ठिकाणी पर्यटक अडकतात, त्या वेळी पुण्यातील पर्यटक सुखरूप आहेत का, याबाबत पोलिसांना तातडीने माहिती मिळत नाही. पर्यटकांची माहिती नोंद असल्यास संबंधित एजन्सी पोलिसांना तातडीने त्याबाबत कळवू शकते, असं विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद कसबे यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




