पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी लोकसभेत इशारा दिला की पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेले जागतिक अडथळे यापुढेही सुरू राहू शकतात. कोविड काळाप्रमाणेच आताही देशवासीयांनी तयार व एकजूट राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्यसभेतही याचीच पुनरावृत्ती केली आणि गरीब, मजूर, स्थलांतरित तसेच इतर गरजूंना मदत व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांकडे सहकार्य मागितले. कोविडच्या संकटात देशाने कशा प्रकारे एकजुटीने आव्हानाचा सामना केला होता, याची त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की, आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. आणि बुधवारी सरकारने हळूहळू नियम कठोर करण्यास सुरुवात केली, ज्यापैकी एक आपल्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित होता. सरकारने घोषणा केली की, जर तुमच्या घरापर्यंत पीएनजीची (पाइप्ड नॅचरल गॅस) लाइन असेल आणि तरीही तुम्ही कनेक्शन घेतले नाही, तर तीन महिन्यांनंतर सरकार तुमचा एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठा खंडित करू शकते. युद्धाच्या परिणामी आयात प्रभावित झाल्याने एलपीजीचा तुटवडा निर्माण होत असताना सरकारचे हे पाऊल समोर आले आहे. भारत आपला 6०% एलपीजी आयात करतो, ज्यातील 9०% पश्चिम आशियातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो, जे सध्या संघर्षाचे केंद्र बनले आहे. असे करून सरकारने संकेत दिले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे. ‘नेहमीप्रमाणे काम सुरू राहील’ हा दृष्टिकोन चालणार नाही. उद्योजक व आर्थिक घडामोडी चालवणाऱ्या शीर्ष लोकांनी हा संकेत सर्वात आधी ओळखला आहे. गेल्या 3 दिवसांत मी उद्योजकांसोबत काही बैठकांमध्ये सहभागी झालो, जिथे सर्वांचे म्हणणे होते की, ‘येणारे काही महिने खूप उलथापालथीचे राहतील.’ त्यांनी आधीच त्यांच्या एचआर प्रमुखांना कंबर कसण्याचे संकेत दिले आहेत. काही काळ भरती संथ करा किंवा थांबवा. नवीन आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये होणाऱ्या वेतनवाढीच्या पार्श्वभूमीवर एचआरला निर्देश दिले गेले आहेत की, पगारवाढीसाठी नावे पाठवण्यापूर्वी कामगिरीचे मूल्यमापन करावे आणि ‘नॉन-परफॉर्मिंग’ तसेच ‘अनावश्यक’ पदे काढून टाकावीत. सध्याचे वातावरण कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देत आहे. आपल्यासारख्या बहुतांश मिड-लेव्हल कर्मचाऱ्यांसाठी हा केवळ आणखी एक व्यग्र सीझन नाही, तर स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आणि संस्थेत आपले स्थान बळकट करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. यासाठी काही सूचना खालीलप्रमाणे आहेत: 1. तुमचा आउटपुट आणि फोकस दुप्पट करा: अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारून आणि उच्च दर्जाचे निकाल देऊन, एखादा कर्मचारी केवळ ‘दहापैकी एक’ राहण्याऐवजी त्या दहांपैकी सर्वात महत्त्वाचा बनून संस्थेसाठी एक आवश्यक ‘अॅसेट’ बनू शकतो.
2. ’वर्क फ्रॉम होम’ला नकार द्या: जरी ‘वर्क फ्रॉम होम’ आता सामान्य व्यवस्था असली तरी सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मकदृष्ट्या ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याची गरज आहे. जिथे निर्णय घेतले जातात आणि आव्हानांचा सामना केला जातो, तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे तुमची बांधिलकी आणि एकजूट दर्शवते. व्हिडिओ कॉलवर हे दाखवणे कठीण असते. कठीण काळात तुम्ही कंपनीत टिकून राहण्यासाठी आणि वाढीसाठी समर्पित आहात, हे यातून नेतृत्वाला समजते.
3. तुम्ही त्याग करू शकता हे दाखवून द्या: तुम्ही लाँग वीकेंड जोडून कुटुंबासोबत ब्रेक प्लॅन करू शकता, जसे की रामनवमी, नंतर चौथा शनिवार-रविवार आणि लगोलग महावीर जयंतीची ऐच्छिक सुट्टी. अनेक लोक असा लांबचा ब्रेक घेऊ शकतात. परंतु यात आणखी एक कॅज्युअल किंवा मेडिकल रजा जोडल्याने केवळ तुमच्या बॉसलाच नव्हे, तर टॉप मॅनेजमेंटलाही चुकीचा संदेश जाऊ शकतो.
4. तुमची उत्पादकता दाखवा: गरजेपेक्षा जास्त गाजावाजा न करता अतिशय कुशलतेने तुमचे वास्तविक काम संस्थेतील योग्य लोकांपर्यंत पोहोचवा. फंडा हा आहे की, जेव्हा आपण एका ‘कठीण काळातून’ जात आहोत, तेव्हा आपल्या ‘जॉब डिस्क्रिप्शन’च्या पुढे जा आणि कंपनीसाठी हे अशक्य करून दाखवा की ते तुमच्याशिवाय कामाचा विचारही करू शकतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



