पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी लोकसभेत इशारा दिला की पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेले जागतिक अडथळे यापुढेही सुरू राहू शकतात. कोविड काळाप्रमाणेच आताही देशवासीयांनी तयार व एकजूट राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्यसभेतही याचीच पुनरावृत्ती केली आणि गरीब, मजूर, स्थलांतरित तसेच इतर गरजूंना मदत व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांकडे सहकार्य मागितले. कोविडच्या संकटात देशाने कशा प्रकारे एकजुटीने आव्हानाचा सामना केला होता, याची त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की, आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. आणि बुधवारी सरकारने हळूहळू नियम कठोर करण्यास सुरुवात केली, ज्यापैकी एक आपल्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित होता. सरकारने घोषणा केली की, जर तुमच्या घरापर्यंत पीएनजीची (पाइप्ड नॅचरल गॅस) लाइन असेल आणि तरीही तुम्ही कनेक्शन घेतले नाही, तर तीन महिन्यांनंतर सरकार तुमचा एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठा खंडित करू शकते. युद्धाच्या परिणामी आयात प्रभावित झाल्याने एलपीजीचा तुटवडा निर्माण होत असताना सरकारचे हे पाऊल समोर आले आहे. भारत आपला 6०% एलपीजी आयात करतो, ज्यातील 9०% पश्चिम आशियातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो, जे सध्या संघर्षाचे केंद्र बनले आहे. असे करून सरकारने संकेत दिले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे. ‘नेहमीप्रमाणे काम सुरू राहील’ हा दृष्टिकोन चालणार नाही. उद्योजक व आर्थिक घडामोडी चालवणाऱ्या शीर्ष लोकांनी हा संकेत सर्वात आधी ओळखला आहे. गेल्या 3 दिवसांत मी उद्योजकांसोबत काही बैठकांमध्ये सहभागी झालो, जिथे सर्वांचे म्हणणे होते की, ‘येणारे काही महिने खूप उलथापालथीचे राहतील.’ त्यांनी आधीच त्यांच्या एचआर प्रमुखांना कंबर कसण्याचे संकेत दिले आहेत. काही काळ भरती संथ करा किंवा थांबवा. नवीन आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये होणाऱ्या वेतनवाढीच्या पार्श्वभूमीवर एचआरला निर्देश दिले गेले आहेत की, पगारवाढीसाठी नावे पाठवण्यापूर्वी कामगिरीचे मूल्यमापन करावे आणि ‘नॉन-परफॉर्मिंग’ तसेच ‘अनावश्यक’ पदे काढून टाकावीत. सध्याचे वातावरण कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देत आहे. आपल्यासारख्या बहुतांश मिड-लेव्हल कर्मचाऱ्यांसाठी हा केवळ आणखी एक व्यग्र सीझन नाही, तर स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आणि संस्थेत आपले स्थान बळकट करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. यासाठी काही सूचना खालीलप्रमाणे आहेत: 1. तुमचा आउटपुट आणि फोकस दुप्पट करा: अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारून आणि उच्च दर्जाचे निकाल देऊन, एखादा कर्मचारी केवळ ‘दहापैकी एक’ राहण्याऐवजी त्या दहांपैकी सर्वात महत्त्वाचा बनून संस्थेसाठी एक आवश्यक ‘अॅसेट’ बनू शकतो.
2. ’वर्क फ्रॉम होम’ला नकार द्या: जरी ‘वर्क फ्रॉम होम’ आता सामान्य व्यवस्था असली तरी सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मकदृष्ट्या ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याची गरज आहे. जिथे निर्णय घेतले जातात आणि आव्हानांचा सामना केला जातो, तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे तुमची बांधिलकी आणि एकजूट दर्शवते. व्हिडिओ कॉलवर हे दाखवणे कठीण असते. कठीण काळात तुम्ही कंपनीत टिकून राहण्यासाठी आणि वाढीसाठी समर्पित आहात, हे यातून नेतृत्वाला समजते.
3. तुम्ही त्याग करू शकता हे दाखवून द्या: तुम्ही लाँग वीकेंड जोडून कुटुंबासोबत ब्रेक प्लॅन करू शकता, जसे की रामनवमी, नंतर चौथा शनिवार-रविवार आणि लगोलग महावीर जयंतीची ऐच्छिक सुट्टी. अनेक लोक असा लांबचा ब्रेक घेऊ शकतात. परंतु यात आणखी एक कॅज्युअल किंवा मेडिकल रजा जोडल्याने केवळ तुमच्या बॉसलाच नव्हे, तर टॉप मॅनेजमेंटलाही चुकीचा संदेश जाऊ शकतो.
4. तुमची उत्पादकता दाखवा: गरजेपेक्षा जास्त गाजावाजा न करता अतिशय कुशलतेने तुमचे वास्तविक काम संस्थेतील योग्य लोकांपर्यंत पोहोचवा. फंडा हा आहे की, जेव्हा आपण एका ‘कठीण काळातून’ जात आहोत, तेव्हा आपल्या ‘जॉब डिस्क्रिप्शन’च्या पुढे जा आणि कंपनीसाठी हे अशक्य करून दाखवा की ते तुमच्याशिवाय कामाचा विचारही करू शकतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




