
Pune : कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मधील जलशुद्धीकरण यंत्रातून (आरओ) विजेचा तीव्र धक्का बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुरक्षा विषयक उपाययोजनांकडे काणाडोळा आणि गंभीर हलगर्जीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, आष्टी, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी महाविद्यालयात ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
चैतन्य १४ मार्चला मेसमधील कामकाज पाहत होता. जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करताना अचानक यंत्रात विद्युत प्रवाह उतरला. विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
सुरक्षा उपाययोजनांचा अभाव
मेसमधील उपकरणांची योग्य देखभाल न करणे, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरातील विद्युत सुरक्षेचे लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) तातडीने करावे, तसेच जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
ही अतिशय दुखःद घटना आहे. चैतन्य चव्हाण याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो बरा व्हावा याकरिता महाविद्यालय, विद्यार्थी अशा सर्वांनी प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यात यश आले नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी माझ्याशी चर्चा केली. या घटनेबाबत अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ती पाहणी करून सोयीसुविधा अद्ययावत करण्याबाबत अहवाल देईल. - डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.























Subscribe to my channel





Start earning instantly—become our affiliate and earn on every sale!