या आठवड्यात संसदेने ट्रान्सजेंडर विधेयक घाईघाईने मंजूर केले. ‘घाई’ यासाठी कारण वीस वर्षांपूर्वीपर्यंत दहापैकी सहा विधेयके छाननीसाठी संसदीय समित्यांकडे पाठवली जात असत. आता दहापैकी फक्त दोनच विधेयके पाठवली जात आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे दोन्ही सभागृहांमधील भाजप नेत्यांनी त्यांना बोलण्यासाठी दिलेल्या वेळेपैकी केवळ दोन-तृतीयांश वेळेचाच वापर केला. त्यांच्याकडे पुरेसे वक्ते नव्हते का? की विधेयक लवकर मंजूर व्हावे यासाठी त्यांनी वक्त्यांना पुढे न आणण्याचा निर्णय घेतला? तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रत्येक मिनिटाचा वापर करून प्रभावी हस्तक्षेप केला. उदाहरणार्थ- काँग्रेस पक्षाच्या रेणुका चौधरी म्हणाल्या, आम्ही खासदार होतो. तेव्हा आम्हाला आमची लैंगिक ओळख जाहीर करावी लागते. आम्ही हे स्वतः करतो. त्याची पुष्टी वैद्यकीय मंडळाकडून केली जात नाही. द्रमुकचे तिरुची शिवा म्हणाले , ट्रान्सजेंडर लोकांचे सर्वत्र शोषण, छळ व अपमान होत आहे. आता सरकार त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. तृणमूलचे साकेत गोखले म्हणाले, “ट्रान्स पुरुष हा पुरुषच आहे. ट्रान्स महिला ही महिलाच आहे. हे तिसरे लिंग नाही. सरकारला ही मूलभूत तथ्येच समजत नाहीत. तेव्हा आपण कोणत्या कायदेशीर हक्काबद्दल बोलत आहोत? याउलट भाजपच्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत काय म्हटले ते ऐका : “ते ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागताना आणि पैसे गोळा करताना आढळतात... आणि घरी पोहोचल्यावर ते पैसे मोजताना, दारू पिताना आणि सिगारेट ओढताना दिसतात!’ यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकामुळे 2019 च्या कायद्यात व्यापक बदल करण्यात आले आहेत. ही दुरुस्ती त्याचा उद्देश आणि परिणाम या दोन्ही दृष्टीने धोकादायक आहे. कारण ती ट्रान्सजेंडर व्यक्तीची व्याख्या आणखी संकुचित करते. आता एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय मंडळ किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची आवश्यकता असेल. स्व-ओळख यापुढे पुरेशी ठरणार नाही. यामुळे लैंगिक ओळख ही वैयक्तिक स्वायत्ततेची बाब न राहता शासनाच्या मान्यतेची बाब बनते. यामुळे असमान वागणूक निर्माण होते (कलम 14 चे उल्लंघन) आणि स्वायत्तता व प्रतिष्ठा मर्यादित होते (कलम 21 चे उल्लंघन). नवीन विधेयकानुसार रुग्णालयांना लिंग-पुष्टीकरण शस्त्रक्रियांची माहिती अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे. ते वैद्यकीय गोपनीयतेचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती के. एस. पुट्टस्वामी विरुद्ध भारत सरकार या निकालात स्पष्ट केले आहे की गोपनीयतेमध्ये शारीरिक आणि निर्णयात्मक स्वायत्तता तसेच वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. एखाद्याच्या शरीरासंबंधीचे निर्णय वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कक्षेत येतात. तृतीयपंथी लोकांना आधीच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संमतीशिवाय त्यांना त्यांची ओळख उघड करण्यास भाग पाडणे धोकादायक ठरू शकते. यामुळे ते कुटुंब, कार्यस्थळ आणि सार्वजनिक जीवनात भेदभावाला अधिक बळी पडतात. तृतीयपंथी लोकांचे संरक्षण करण्याचा दावा करणारा कायदा, अशा संरक्षणाची गरज निर्माण करणाऱ्या परिस्थितीला अधिक मजबूत कसा करू शकतो? हे विधेयक अशा दंडात्मक तरतुदींचा लक्षणीय विस्तार करते. ते कागदोपत्री छळाला शिक्षा देण्यासाठी आहेत. मात्र प्रलोभन आणि अवाजवी प्रभाव यांसारख्या अस्पष्ट संज्ञांचा वापर, आणि अगदी संमतीने घेतलेल्या वैद्यकीय उपचारांनाही गुन्हेगारी ठरवणे हे एक पूर्णपणे वेगळेच चित्र उभे करते. शिक्षेच्या भीतीमुळे लोक लिंग-पुष्टीकरण उपचार घेण्यास कचरतील. गुन्ह्यांच्या अस्पष्ट व्याख्येमुळे ते छळाचे साधन बनण्याचा धोका आहे. त्यामुळे मित्र, कुटुंब आणि अगदी वैद्यकीय व्यावसायिकांनाही शिक्षा होऊ शकते. हिंदी चित्रपटांमधील ट्रान्सजेंडर प्रतिनिधित्वाचा विचार करा. ऋषी कपूरच्या ‘रफू चक्कर’ किंवा अमिताभ बच्चनच्या ‘लावारिस’मध्ये ते प्रामुख्याने विनोदाचा स्रोत म्हणून सादर केले गेले. कुकू (‘सेक्रेड गेम्स’) किंवा शिल्पा (‘सुपर डिलक्स’) यांसारखी पात्रे अधिक सूक्ष्म चित्रण सुचवतात. पण इथेही ट्रान्स भूमिका अनेकदा सिस-जेंडर कलाकारांद्वारे साकारल्या जातात. 1930 च्या दशकात नाझी जर्मनीमध्ये “ट्रान्सव्हेस्टाईट प्रमाणपत्रे’ (त्या वेळी ट्रान्सजेंडर लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा) जारी केली जात होती. अशी प्रमाणपत्रे होती त्यांना छळछावण्यांमध्ये पाठवले जात होते. आपण कोणत्या दिशेने जात आहोत? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. आयुष्मान डे व चाहत मंगतानी यांनी सह-लेखन केले आहे.)
आपल्या समाजात ट्रान्सजेंडर व्यक्तींना आधीच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संमतीशिवाय त्यांना त्यांचे जेंडर स्पष्ट करण्यास भाग पाडणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



