11 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जर मी तुम्हाला विचारले की तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टींची कमतरता आहे तर तुमची यादी किती मोठी असेल? माझी तर खूप मोठी आहे. सर्वात आधी तर मला कावेरी नदीची उणीव भासते. 60 ते 90 च्या दशकादरम्यान ही बाराही महिने वाहणारी नदी असायची, पण आता ती कधी-कधी कोरडी पडते. मला वाटायचे की तामिळनाडूच्या कुंभकोणम येथील माझ्या मूळ गावी ती कायम अशीच दुथडी भरून वाहत राहील. मला तो पोंगलही खूप आठवतो, जो मला दररोज सकाळी 6 वाजता कावेरीच्या काठावर असलेल्या गणपती मंदिरात प्रसाद म्हणून मिळायचा. नदीत पोहून आल्यावर त्या गरम पोंगलची चव दोन कारणांमुळे नेहमीच अद्भुत लागायची- एक, पोहल्यामुळे भूक वाढते आणि दोन, देवाच्या आशीर्वादामुळे त्यांचा प्रसाद आणखी चविष्ट बनतो.
मला तो वडा-सांबारही आठवतो, जो लहानपणी रविवारी माझे आजोबा मला खाऊ घालायचे. ‘वेंकटा लॉज' नावाच्या हॉटेलमध्ये तो एका आण्याला (सहा पैसे) मिळायचा. तिथे वेटर ॲल्युमिनियमची बादली घेऊन उभा असायचा आणि तो कंटाळा न करता हवा तेवढा सांबार वाढायचा. ही माझ्या आयुष्यातील छोटी-छोटी आश्चर्ये होती. मी नेहमीच त्यांना हलक्यात घेतले, पण आज जेव्हा मी जास्तीच्या सांबारच्या छोट्या वाटीसाठी 5 रुपये देतो तेव्हा मला ती बादली व त्या वेटरचा चेहरा आठवतो. त्या हॉटेलने आतापर्यंत आपल्या मूळ मालकांनंतर तीन नवे मालक पाहिले आहेत आणि नव्या मालकाची मुले याचे रूपांतर दुसऱ्या एखाद्या व्यवसायात करू शकतात.
याहून मोठ्या पातळीवर मला अरबी समुद्र व किनाऱ्यांची उणीव भासते. समुद्र तिथेच आहे- पण माझे काम मला अनेकदा- अगदी रविवारीही- त्या किनाऱ्यालगतच्या मुंबईपासून दूर घेऊन जाते, जिथे मी राहणे पसंत केले आहे.
लोक आयुष्यातील आश्चर्यांना हलक्यात घेतात. पण ती प्रत्येक रूपात व आकारात आपल्यासमोर येतात. मोठी आश्चर्ये थक्क करणारी असू शकतात, पण छोट्या आश्चर्यांनी आपले आयुष्य बनते. जीवनप्रवासाची दु:खद बाजू ही आहे की या छोट्या-छोट्या आश्चर्यांना हरवण्याची वाईट सवय असते. गावातील छोट्या-छोट्या झोपड्यांचे रस्त्याच्या कडेला प्रवेशद्वार असलेल्या दोन-तीन मजली सिमेंटच्या इमारतींमध्ये रूपांतर झाल्याने ग्रामीण सौंदर्याला आपल्यापासून दूर नेले आहे- नगरपालिकेची बस वेगात गेल्यावर उडणाऱ्या कोंबड्या, सकाळी ताज्या अन्नाच्या प्रतीक्षेत घराबाहेर बसलेली गाय, इकडे-तिकडे सुस्तावलेला अन् पाय ओढत चालणारा व कधी-कधी आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी भुंकणारा एखादा कुत्रा, जाणाऱ्या सायकलींच्या घंटीचा आवाज व बाहेर उभ्या असलेल्या दशकं जुन्या झाडावर किलबिल करणारे पक्षी... नुकतीच जेव्हा माझी मुलगी आली तेव्हा मी तिला आवर्जून नागपुरातील माझ्या शाळेत घेऊन गेलो आणि तिला त्याच बाकावर बसवले, जिथे मी शिकायचो. मी तिला शाळेबाहेर टोपली घेऊन बसलेल्या वृद्ध महिलेकडून बोरे विकत घ्यायला लावली. एका छोट्याशा हनुमान मंदिरासमोर त्याचप्रमाणे उभे राहून प्रार्थना करायला लावली, जशी मी परीक्षा देण्यापूर्वी करायचो. तिला हे सर्व खूप आवडले.
भूतकाळातील आठवणी जागवणाऱ्या ठिकाणांबद्दल भावुक होणे आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर जतन करून ठेवणे स्वाभाविक आहे. वयानुसार माझ्यामध्ये ही प्रवृत्ती आणखी गडद होत गेली आहे. त्यामुळेच आयुष्यातील छोट्या-छोट्या आश्चर्यांना ओळखणे व शक्य होईल तितके त्यांना जपून ठेवणे गरजेचे आहे. उदासीन, निनावी जग व असे जग, ज्यामध्ये जीवन व नावीन्याची चमक असेल, जे जगण्याचा आनंद घेता येईल- या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी एकमेव गोष्ट ही की गावाकडच्या शाळांबाहेर बोरे विकणारी वृद्ध महिला केवळ रोख रक्कमच स्वीकारेल. कारण ती मर्यादित नफ्यावर काम करते व डिजिटल पेमेंट घेऊन कमिशन देऊ शकत नाही.

हा कॉलम ऐकण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



