भारत आणि इटली यांचे संबंध आता निर्णायक टप्प्यावरआले आहेत. गेल्या काही वर्षांत उभय देशांतीलसंबंधांचा अभूतपूर्व वेगाने विस्तार झाला आहे. हे संबंधआता केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नसून स्वातंत्र्य,लोकशाही मूल्ये आणि भविष्यासंदर्भातील समानदृष्टिकोनावर आधारित विशेष रणनीतिक भागीदारीतरूपांतरित झाले आहेत. जगभरात मोठे बदल होतअसताना भारत आणि इटलीमधील भागीदारी उच्चराजकीय आणि संस्थात्मक संवादातून अधिक मजबूतहोत आहे. या संबंधांना आता अधिक व्यापक स्वरूपमिळत असून त्यात दोन्ही देशांची आर्थिक शक्ती,सामाजिक सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसायांचाही समावेश आहे. आमचे सहकार्य हे दर्शवते की, 21 व्या शतकातील समृद्धीआणि सुरक्षा या देशांच्या नवोन्मेष क्षमतेवर, ऊर्जासंक्रमणाच्या व्यवस्थापनावर आणि रणनीतिकआत्मनिर्भरतेवर अवलंबून असतील. याच उद्देशाने आम्हीद्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि विविध करण्याचानिर्धार केला आहे, जेणेकरून दोन्ही देशांच्या पूरकताकदींचा अधिक चांगला उपयोग करता येईल. इटलीची डिझाइन क्षमता, उत्कृष्ट उत्पादन कौशल्यआणि जागतिक दर्जाची सुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान क्षमताभारताच्या वेगवान आर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता आणि 100 हून अधिकयुनिकॉर्न तसेच 2 लाख स्टार्टअप्स असलेल्या उद्योजकीयपरिसंस्थेशी जोडून मजबूत समन्वय निर्माण करण्याचेआमचे उद्दिष्ट आहे. हे केवळ दोन व्यवस्थांचे साधे एकत्रीकरण नाही, तरदोन्ही देशांच्या औद्योगिक क्षमतांना अधिक बळकटीदेणारी सामायिक मूल्यनिर्मिती आहे. युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापारकरारामुळे (एफटीए) दोन्ही दिशांनी व्यापार आणि गुंतवणुकीस नवे मार्ग खुले होत आहेत. 2029 पर्यंत भारत आणि इटलीमधील व्यापार 20 अब्ज युरोपेक्षा अधिक नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. संरक्षण, एअरोस्पेस, स्वच्छ तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, ऑटोमोबाईल सुटे भाग, रसायने, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, कृषी-खाद्य क्षेत्र आणि पर्यटनया क्षेत्रांवर विशेष भर राहणार आहे. ‘मेड इन इटली’ हे नेहमीच जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे प्रतीक राहिले आहे आणि आता त्याचा ‘मेक इनइंडिया’च्या उच्च गुणवत्तेच्या उद्दिष्टांशी नैसर्गिक मेळदिसून येतो. भारतात उत्पादनासाठी इटालियन कंपन्यांची वाढती रुची आणि इटलीमध्ये भारतीय उद्योगांची वाढती उपस्थिती — ती आता दोन्ही बाजूंनी मिळून एकहजारांहून अधिक झाली आहे — हे सकारात्मक संकेत आहेत. यामुळे पुरवठा साखळीचे एकत्रीकरण अधिक मजबूत होईल. तांत्रिक नवोन्मेष हा आमच्या भागीदारीचा महत्त्वाचा पाया आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग,प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे आणिडिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये जग मोठ्यातांत्रिक बदलाच्या उंबरठ्यावर आहे. भारताची नवोन्मेषक्षमता आणि कुशल मनुष्यबळ तसेच इटलीची प्रगतऔद्योगिक शक्ती या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक नैसर्गिकआणि रणनीतिक बनवते. दोन्ही देशांतील विद्यापीठे आणिसंशोधन संस्थांमधील वाढते सहकार्यही याला बळ देणारआहे. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) आधीच ग्लोबल साउथमधील अनेकदेशांसाठी आकर्षणाचा विषय बनली आहे. विशेषतःएआयचा समाज आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठाप्रभाव पडत आहे. एआयचा विकास जबाबदार आणिमानवकेंद्रित पद्धतीने व्हावा, यासाठी भारत आणि इटलीदीर्घकाळापासून सहकार्य करत आहेत. दोन्ही देशएआयला सर्वसमावेशक विकासाचे प्रभावी साधनमानतात, विशेषतः ग्लोबल साउथ देशांसाठी. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि बहुभाषिकतंत्रज्ञानाच्या मदतीने एआय सामाजिक व डिजिटल दरीकमी करू शकतो. भारताची ‘मानवकेंद्रित तंत्रज्ञान’संकल्पना आणि इटलीची ‘एल्गोर-एथिक्स’ संकल्पनायांवर आधारित भागीदारीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता सामाजिकसक्षमीकरणाचे साधन ठरेल, याची खात्री केली जाईल.सुरक्षित डिजिटल सहकार्य, क्षमता विकास आणि मजबूतसायबर पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वोत्तमकार्यपद्धतींच्या आदानप्रदानातून आम्ही खुले, विश्वासार्हआणि समान डिजिटल वातावरण निर्माण करू इच्छितो.तंत्रज्ञानाने मानवाची जागा घेऊ नये किंवा त्याचे मूलभूतअधिकार कमकुवत करू नयेत, हा आमचा स्पष्टदृष्टिकोन आहे. तसेच, एआयचा वापर जनमत प्रभावितकरण्यासाठी किंवा लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेपकरण्यासाठी होऊ नये. राष्ट्रांच्या समृद्धीसाठी सुरक्षा आणि स्थैर्य अत्यावश्यकआहेत. त्यामुळे भारत आणि इटली संरक्षण, सुरक्षा आणिरणनीतिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूतकरू इच्छितात. महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेसोबतचदहशतवाद, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळे, अंमलीपदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि मानवी तस्करीयांसारख्या आव्हानांविरोधात लढण्यासाठी हे सहकार्यमहत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ ही संकल्पना आपल्याकृतींना दिशा देणाऱ्या जबाबदारीची भावना दर्शवते. तसेच‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आजच्या परस्परांशीजोडलेल्या डिजिटल युगात अधिक महत्त्वाची वाटते. हेमूल्य इटलीच्या पुनर्जागरणकालीन मानवतावादीपरंपरेशीही सुसंगत आहेत. यामुळे लोककेंद्रित दृष्टिकोनठेवत भारत-इटली भागीदारीला अधिक मजबूत,आधुनिक आणि भविष्याभिमुख आधार देणे हेच आमचेसामायिक उद्दिष्ट आहे. इटलीची डिझाइन क्षमता, उत्पादनकौशल्य आणि जागतिक दर्जाचेसुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान भारताच्या वेगवानआर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता,नवकल्पना तसेच 100 हून अधिकयुनिकॉर्न आणि 2 लाख स्टार्ट-अप्सच्याउद्योजकीय परिसंस्थेशी जोडून प्रभावीसमन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



