नरेंद्र मोदी अन् जॉर्जिया मेलोनी यांचा कॉलम:भारत-इटली भागीदारीचा आता नवा टप्पा‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎भारत आणि इटली यांचे संबंध आता निर्णायक टप्प्यावर‎आले आहेत. गेल्या काही वर्षांत उभय देशांतील‎संबंधांचा अभूतपूर्व वेगाने विस्तार झाला आहे. हे संबंध‎आता केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नसून स्वातंत्र्य,‎लोकशाही मूल्ये आणि भविष्यासंदर्भातील समान‎दृष्टिकोनावर आधारित विशेष रणनीतिक भागीदारीत‎रूपांतरित झाले आहेत. जगभरात मोठे बदल होत‎असताना भारत आणि इटलीमधील भागीदारी उच्च‎राजकीय आणि संस्थात्मक संवादातून अधिक मजबूत‎होत आहे. या संबंधांना आता अधिक व्यापक स्वरूप‎मिळत असून त्यात दोन्ही देशांची आर्थिक शक्ती,‎सामाजिक सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा‎यांचाही समावेश आहे.‎ आमचे सहकार्य हे दर्शवते की, 21 व्या शतकातील समृद्धी‎आणि सुरक्षा या देशांच्या नवोन्मेष क्षमतेवर, ऊर्जा‎संक्रमणाच्या व्यवस्थापनावर आणि रणनीतिक‎आत्मनिर्भरतेवर अवलंबून असतील. याच उद्देशाने आम्ही‎द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि विविध करण्याचा‎निर्धार केला आहे, जेणेकरून दोन्ही देशांच्या पूरक‎ताकदींचा अधिक चांगला उपयोग करता येईल.‎ इटलीची डिझाइन क्षमता, उत्कृष्ट उत्पादन कौशल्य‎आणि जागतिक दर्जाची सुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान क्षमता‎भारताच्या वेगवान आर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,‎मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता आणि 100 हून अधिक‎युनिकॉर्न तसेच 2 लाख स्टार्टअप्स असलेल्या उद्योजकीय‎परिसंस्थेशी जोडून मजबूत समन्वय निर्माण करण्याचे‎आमचे उद्दिष्ट आहे.‎ हे केवळ दोन व्यवस्थांचे साधे एकत्रीकरण नाही, तर‎दोन्ही देशांच्या औद्योगिक क्षमतांना अधिक बळकटी‎देणारी सामायिक मूल्यनिर्मिती आहे.‎ युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापार‎करारामुळे (एफटीए) दोन्ही दिशांनी व्यापार आणि ‎‎गुंतवणुकीस नवे मार्ग खुले होत आहेत. 2029 पर्यंत भारत ‎‎आणि इटलीमधील व्यापार 20 अब्ज युरोपेक्षा अधिक ‎‎नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. संरक्षण, एअरोस्पेस, स्वच्छ ‎‎तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, ऑटोमोबाईल सुटे भाग, रसायने, ‎‎औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, कृषी-खाद्य क्षेत्र आणि पर्यटन‎या क्षेत्रांवर विशेष भर राहणार आहे.‎ ‘मेड इन इटली’ हे नेहमीच जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे ‎‎प्रतीक राहिले आहे आणि आता त्याचा ‘मेक इन‎इंडिया’च्या उच्च गुणवत्तेच्या उद्दिष्टांशी नैसर्गिक मेळ‎दिसून येतो. भारतात उत्पादनासाठी इटालियन कंपन्यांची ‎‎वाढती रुची आणि इटलीमध्ये भारतीय उद्योगांची वाढती ‎‎उपस्थिती — ती आता दोन्ही बाजूंनी मिळून एक‎हजारांहून अधिक झाली आहे — हे सकारात्मक संकेत ‎‎आहेत. यामुळे पुरवठा साखळीचे एकत्रीकरण अधिक ‎‎मजबूत होईल.‎ तांत्रिक नवोन्मेष हा आमच्या भागीदारीचा महत्त्वाचा पाया ‎‎आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग,‎प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे आणि‎डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये जग मोठ्या‎तांत्रिक बदलाच्या उंबरठ्यावर आहे. भारताची नवोन्मेष‎क्षमता आणि कुशल मनुष्यबळ तसेच इटलीची प्रगत‎औद्योगिक शक्ती या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक नैसर्गिक‎आणि रणनीतिक बनवते. दोन्ही देशांतील विद्यापीठे आणि‎संशोधन संस्थांमधील वाढते सहकार्यही याला बळ देणार‎आहे. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा‎(डीपीआय) आधीच ग्लोबल साउथमधील अनेक‎देशांसाठी आकर्षणाचा विषय बनली आहे. विशेषतः‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎एआयचा समाज आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा‎प्रभाव पडत आहे. एआयचा विकास जबाबदार आणि‎मानवकेंद्रित पद्धतीने व्हावा, यासाठी भारत आणि इटली‎दीर्घकाळापासून सहकार्य करत आहेत. दोन्ही देश‎एआयला सर्वसमावेशक विकासाचे प्रभावी साधन‎मानतात, विशेषतः ग्लोबल साउथ देशांसाठी.‎ डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि बहुभाषिक‎तंत्रज्ञानाच्या मदतीने एआय सामाजिक व डिजिटल दरी‎कमी करू शकतो. भारताची ‘मानवकेंद्रित तंत्रज्ञान’‎संकल्पना आणि इटलीची ‘एल्गोर-एथिक्स’ संकल्पना‎यांवर आधारित भागीदारीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता सामाजिक‎सक्षमीकरणाचे साधन ठरेल, याची खात्री केली जाईल.‎सुरक्षित डिजिटल सहकार्य, क्षमता विकास आणि मजबूत‎सायबर पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वोत्तम‎कार्यपद्धतींच्या आदानप्रदानातून आम्ही खुले, विश्वासार्ह‎आणि समान डिजिटल वातावरण निर्माण करू इच्छितो.‎तंत्रज्ञानाने मानवाची जागा घेऊ नये किंवा त्याचे मूलभूत‎अधिकार कमकुवत करू नयेत, हा आमचा स्पष्ट‎दृष्टिकोन आहे. तसेच, एआयचा वापर जनमत प्रभावित‎करण्यासाठी किंवा लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप‎करण्यासाठी होऊ नये.‎ राष्ट्रांच्या समृद्धीसाठी सुरक्षा आणि स्थैर्य अत्यावश्यक‎आहेत. त्यामुळे भारत आणि इटली संरक्षण, सुरक्षा आणि‎रणनीतिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत‎करू इच्छितात. महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेसोबतच‎दहशतवाद, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळे, अंमली‎पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि मानवी तस्करी‎यांसारख्या आव्हानांविरोधात लढण्यासाठी हे सहकार्य‎महत्त्वाचे ठरणार आहे.‎ भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ ही संकल्पना आपल्या‎कृतींना दिशा देणाऱ्या जबाबदारीची भावना दर्शवते. तसेच‎‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आजच्या परस्परांशी‎जोडलेल्या डिजिटल युगात अधिक महत्त्वाची वाटते. हे‎मूल्य इटलीच्या पुनर्जागरणकालीन मानवतावादी‎परंपरेशीही सुसंगत आहेत. यामुळे लोककेंद्रित दृष्टिकोन‎ठेवत भारत-इटली भागीदारीला अधिक मजबूत,‎आधुनिक आणि भविष्याभिमुख आधार देणे हेच आमचे‎सामायिक उद्दिष्ट आहे.‎ इटलीची डिझाइन क्षमता, उत्पादन‎कौशल्य आणि जागतिक दर्जाचे‎सुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान भारताच्या वेगवान‎आर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,‎मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता,‎नवकल्पना तसेच 100 हून अधिक‎युनिकॉर्न आणि 2 लाख स्टार्ट-अप्सच्या‎उद्योजकीय परिसंस्थेशी जोडून प्रभावी‎समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *