प्रियदर्शन यांचा कॉलम:आपली ओळख भूगोलापुरती ‎मर्यादित ठेवणे योग्य नाही‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎पंजाबी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून‎देणाऱ्यांमध्ये दिलजित दोसांझ यांचे नाव अग्रक्रमाने‎घेतले जाते. गायनासोबतच अभिनय क्षेत्रातही त्यांनी‎आपली वेगळी छाप पाडली . अनेक सामाजिक आणि‎राजकीय विषयांवर ते स्पष्टपणे भूमिका मांडतात. 2020‎मध्ये कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनालाही‎त्यांनी पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वी कॅनडातील‎एका कार्यक्रमात त्यांनी खलिस्तान समर्थक झेंडे‎फडकवणाऱ्यांना फटकारले आणि सभागृहाबाहेर‎जाण्यास सांगितले. यानंतर त्यांना धमक्याही मिळाल्या. ‎‎कदाचित याच लोकप्रियतेमुळे व सामाजिक भानामुळे ‎‎‘जागो पंजाब’ या संघटनेने त्यांना राजकारणात येऊन ‎‎निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. मात्र, दोसांझ‎यांनी हे नाकारत आपले काम केवळ मनोरंजन करणे ‎‎असल्याचे सांगितले.‎ मात्र, दिलजीत दोसांझ यांनी इच्छा व्यक्त केली असती‎तरी ते निवडणूक लढवू शकले असते का? असे‎सांगितले जाते की, 2022 मध्ये त्यांनी अमेरिकेचे ‎‎नागरिकत्व स्वीकारले. आता ते अमेरिकन नागरिक‎म्हणूनच प्रवास करतात. म्हणजेच ते आता भारतीय‎नागरिक राहिलेले नाहीत आणि निवडणूक लढवू शकत‎नाहीत. पण भारताचे नागरिकत्व सोडल्यामुळे दिलजीत‎दोसांझ कमी भारतीय ठरतात का? ते आजही आपल्या‎परिचयात भारतीयच आहेत- कदाचित अनेक‎भारतीयांपेक्षाही जास्त. दोसांझ यांचे हे प्रकरण अक्षय‎कुमार यांची आठवण करून देते. अनेक वर्षे ते कॅनडाचे‎नागरिक होते. एका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान त्यांनी‎मतदान का केले नाही असा प्रश्न टीव्ही वाहिन्यांनी‎उपस्थित केला होता. तेव्हा ते भारतात मतदान करू‎शकत नसल्याची बाब समोर आली. नंतर त्यांनी पुन्हा‎भारतीय नागरिकत्व स्वीकारले. अशी अनेक उदाहरणे‎असू शकतात. त्यातूनच हा प्रश्न निर्माण होतो की,‎जगातील अनेक देशांप्रमाणे भारतातही आता दुहेरी‎नागरिकत्वावर विचार होऊ नये का? म्हणजे एखादा‎भारतीय कॅनडा किंवा अमेरिकेचे नागरिकत्व‎स्वीकारूनही भारतीय नागरिक राहू शकणार नाही का?‎अशी कायदेशीर व्यवस्था असायला नको का? सध्या‎जगभरात साडेतीन कोटींपेक्षा अधिक भारतीय विविध‎देशांत स्थायिक झालेले आहेत. दरवर्षी सुमारे 25 लाख‎लोक देश सोडत आहेत. शिक्षण, रोजगार किंवा अधिक‎चांगल्या संधींच्या शोधात हे लोक परदेशात जातात.‎यातील मोठ्या संख्येने लोक भारतावर प्रेम करतात‎आणि येथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतात.‎पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्या परदेश‎दौऱ्यांदरम्यान भारतीय समुदायाकडून दिसणारा उत्साह‎हेच दर्शवतो की, त्यांच्या मनात आजही एक भारत‎आहे. इंग्लंड, शारजाह किंवा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या‎क्रिकेट सामन्यांमध्ये गालावर तिरंगा रंगवून, हातात‎तिरंगा घेऊन ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणा देणारे लोक हे‎भारतातून गेलेले आहेत. पण आपल्या मनातला भारत‎सोबत घेऊन ते गेले आहेत. भारतात दुहेरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎नागरिकत्वाची व्यवस्था अस्तित्वात आली, तर अनेक‎जण आपली भारतीय ओळख आणि नागरिकत्व‎टिकवून ठेवू इच्छितील. आजच्या जागतिकीकरणाच्या‎काळात आपली सीमा आकुंचित ठेवणे आणि ओळख‎केवळ भूगोलापुरती मर्यादित ठेवणे योग्य वाटत नाही.‎ ‘अमेरिका फर्स्ट’ किंवा ‘मागा’सारख्या राजकीय‎घोषणांद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका राष्ट्राच्या‎लोकशाहीच्या समावेशकतेला धक्का दिला. त्याच‎प्रकारे भारतातही काही अतिउत्साही लोक तेच करताना‎दिसतात. भारताने आपल्या भूगोलाच्या बाहेरही‎नागरिकत्वाचा विस्तार करणे योग्य ठरेल. दुसऱ्या देशांचे‎नागरिकत्व घेतल्यामुळे भारतीय ओळखीपासून दूर‎गेलेल्या लोकांनाही भारतीय राहण्याची संधी मिळाली‎पाहिजे. नकळतपणे भारतीय नागरिकत्व आकुंचित‎करण्याचे प्रयत्न टाळले पाहिजेत. त्यामुळे देश अधिक‎मजबूतच होईल, कमकुवत नाही.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ भारताने आपल्या भूगोलाच्या बाहेरही‎नागरिकत्वाचा विस्तार करणे योग्य ठरेल.‎दुसऱ्या देशांचे नागरिकत्व घेतल्यामुळे‎भारतीय ओळखीपासून वंचित‎राहणाऱ्यांनाही भारतीय राहण्याची संधी‎मिळायला हवी.‎

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *