होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली आहे आणि जागतिकपुरवठा साखळी विस्कळीत झाली . अशा परिस्थितीतपंतप्रधानांनी केलेले संयमाचे आवाहन ही केवळतात्पुरती सूचना नाही. ती ऊर्जा सुरक्षेचा भारतीयांच्यादैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत असल्याची जाणीवकरून देणारी बाब आहे. नागरिकांना सार्वजनिकवाहतुकीचा वापर करण्याचा, इंधन बचत,मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य देण्याचा आणिअनावश्यक परदेश दौरे टाळण्याचा सल्ला दिला जातआहे. यावरून स्पष्ट होते की, जगातील एका अरुंदसमुद्री मार्गातील अडथळ्याचा परिणाम भारतातील कुटुंबांचा अर्थसंकल्प, उद्योगांचा खर्च, वाहतूकव्यवस्थेवर व परकीय चलन साठ्यावरही होत आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आहे आणि देशातील ऊर्जा मागणी सातत्याने वाढणार आहे. मात्र, आपण अजूनहीजीवाश्म इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणातअवलंबून आहोत. भारत गरजेपैकी 85 टक्क्यांहूनअधिक कच्चे तेल व सुमारे 50 टक्के गॅस आयातकरतो. सध्याच्या संकटापूर्वीही जीवाश्म इंधनआयातीवरील देशाचा खर्च 180 अब्ज डॉलर इतकाहोता. त्यामुळे स्वस्त, विश्वासार्ह, देशांतर्गत उपलब्धस्वच्छ ऊर्जा व्यवस्था उभारणे हे भारताचे प्रमुख ध्येयअसले पाहिजे.
या दिशेने भारताने आधीच महत्त्वाची प्रगती केली आहे.गैर-जीवाश्म इंधन क्षेत्रातील देशाची स्थापित क्षमता 283गिगावॅटच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये 150 गिगावॅटहूनअधिक सौर ऊर्जा आणि 56 गिगावॅट पवन ऊर्जासमाविष्ट आहे. 2030 ची मुदत येण्यापूर्वीच भारतानेएकूण स्थापित वीज क्षमतेपैकी 50 टक्के हिस्सागैर-जीवाश्म स्रोतांतून मिळवण्याचे लक्ष्य गाठले आहे.देशातील 2.8 कोटी घरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून10 कोटींहून अधिक कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाक इंधनउपलब्ध झाले आहे. हे बदल मोठ्या परिवर्तनाचे संकेतआहेत. ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक समीकरणेदेखीलवेगाने बदलत आहेत. भारतात सौर ऊर्जा आता वीजनिर्मितीच्या सर्वांत स्वस्त स्रोतांपैकी एक बनली आहे.ग्रीन अमोनियाच्या लिलावांमध्येही आंतरराष्ट्रीयपातळीपेक्षा कमी दर समोर आले आहेत. यावरूनस्वच्छ तंत्रज्ञान भारताच्या ऊर्जा अर्थव्यवस्थेतमजबूतपणे रुजत असल्याचे दिसते. मात्र, पुढचा टप्पाअधिक महत्त्वाकांक्षी असायला हवा. 2030 पर्यंत 500गिगावॅट गैर-जीवाश्म ऊर्जेचे लक्ष्य गाठण्यापलीकडेविचार करण्याची गरज आहे. 2025 मध्ये चीनने एकावर्षात 400 गिगावॅटहून अधिक अक्षय ऊर्जा क्षमतावाढवली, तर भारत फक्त 56 गिगावॅटची भर घालूशकला. हवामानाच्या दृष्टीने भारताला अनुकूलता आहे.त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचा विचार करता भारताने 1500गिगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमतेचे ध्येय ठेवावे. हे लक्ष्यमहत्त्वाकांक्षी असले, तरी अशक्य नाही. पाच वर्षांतसाध्य करण्याचा निर्धार असावा. ही महत्त्वाकांक्षानसेल, तर डेटा सेंटर्स चालवणे आणि कृत्रिमबुद्धिमत्तेच्या पुढील लाटेत नेतृत्व करणे भारतासाठीकठीण होईल. केवळ उत्पादन क्षमता वाढवून हे साध्यहोणार नाही. जर ग्रीड उभारणीमध्ये आपण मागे पडलो,तर 1500 गिगावॅटचे स्वच्छ ऊर्जा जाळे उभे राहूशकणार नाही. ऊर्जा उत्पादन, वीज वहन व्यवस्था,ग्रीड स्थिरता आणि मागणीआधारित तत्परता यांचासमन्वय आवश्यक आहे. अक्षय ऊर्जेच्या दृष्टीने समृद्धभागांमध्ये ट्रान्समिशन नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवरकरावा लागेल. या प्रक्रियेत डिजिटायझेशनची भूमिकानिर्णायक ठरेल. ऊर्जा साठवणूक तितकीच महत्त्वाचीआहे. त्याद्वारे खंडित स्वरूपात मिळणारी अक्षय ऊर्जाचोवीस तास उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह विजेमध्येरूपांतरित होऊ शकते. त्यामुळे अक्षय ऊर्जेशी संबंधितप्रत्येक मोठ्या टेंडरमध्ये विश्वासार्ह आणि तात्काळउपलब्ध वीज पुरवठ्याच्या अटी असायला हव्यात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ऊर्जा क्षेत्रातील भारताची पुढची झेपकेवळ क्षमता वाढवून ठरणार नाही, तरअक्षय ऊर्जेला विश्वासार्ह, स्वस्त वसुरक्षित बनवणारी यंत्रणा उभारण्यावरअवलंबून असेल. सध्याच्या संकटानेभारतासमोर एक मोठी संधी उभी केली.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



