होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली आहे आणि जागतिकपुरवठा साखळी विस्कळीत झाली . अशा परिस्थितीतपंतप्रधानांनी केलेले संयमाचे आवाहन ही केवळतात्पुरती सूचना नाही. ती ऊर्जा सुरक्षेचा भारतीयांच्यादैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत असल्याची जाणीवकरून देणारी बाब आहे. नागरिकांना सार्वजनिकवाहतुकीचा वापर करण्याचा, इंधन बचत,मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य देण्याचा आणिअनावश्यक परदेश दौरे टाळण्याचा सल्ला दिला जातआहे. यावरून स्पष्ट होते की, जगातील एका अरुंदसमुद्री मार्गातील अडथळ्याचा परिणाम भारतातील कुटुंबांचा अर्थसंकल्प, उद्योगांचा खर्च, वाहतूकव्यवस्थेवर व परकीय चलन साठ्यावरही होत आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आहे आणि देशातील ऊर्जा मागणी सातत्याने वाढणार आहे. मात्र, आपण अजूनहीजीवाश्म इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणातअवलंबून आहोत. भारत गरजेपैकी 85 टक्क्यांहूनअधिक कच्चे तेल व सुमारे 50 टक्के गॅस आयातकरतो. सध्याच्या संकटापूर्वीही जीवाश्म इंधनआयातीवरील देशाचा खर्च 180 अब्ज डॉलर इतकाहोता. त्यामुळे स्वस्त, विश्वासार्ह, देशांतर्गत उपलब्धस्वच्छ ऊर्जा व्यवस्था उभारणे हे भारताचे प्रमुख ध्येयअसले पाहिजे.
या दिशेने भारताने आधीच महत्त्वाची प्रगती केली आहे.गैर-जीवाश्म इंधन क्षेत्रातील देशाची स्थापित क्षमता 283गिगावॅटच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये 150 गिगावॅटहूनअधिक सौर ऊर्जा आणि 56 गिगावॅट पवन ऊर्जासमाविष्ट आहे. 2030 ची मुदत येण्यापूर्वीच भारतानेएकूण स्थापित वीज क्षमतेपैकी 50 टक्के हिस्सागैर-जीवाश्म स्रोतांतून मिळवण्याचे लक्ष्य गाठले आहे.देशातील 2.8 कोटी घरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून10 कोटींहून अधिक कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाक इंधनउपलब्ध झाले आहे. हे बदल मोठ्या परिवर्तनाचे संकेतआहेत. ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक समीकरणेदेखीलवेगाने बदलत आहेत. भारतात सौर ऊर्जा आता वीजनिर्मितीच्या सर्वांत स्वस्त स्रोतांपैकी एक बनली आहे.ग्रीन अमोनियाच्या लिलावांमध्येही आंतरराष्ट्रीयपातळीपेक्षा कमी दर समोर आले आहेत. यावरूनस्वच्छ तंत्रज्ञान भारताच्या ऊर्जा अर्थव्यवस्थेतमजबूतपणे रुजत असल्याचे दिसते. मात्र, पुढचा टप्पाअधिक महत्त्वाकांक्षी असायला हवा. 2030 पर्यंत 500गिगावॅट गैर-जीवाश्म ऊर्जेचे लक्ष्य गाठण्यापलीकडेविचार करण्याची गरज आहे. 2025 मध्ये चीनने एकावर्षात 400 गिगावॅटहून अधिक अक्षय ऊर्जा क्षमतावाढवली, तर भारत फक्त 56 गिगावॅटची भर घालूशकला. हवामानाच्या दृष्टीने भारताला अनुकूलता आहे.त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचा विचार करता भारताने 1500गिगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमतेचे ध्येय ठेवावे. हे लक्ष्यमहत्त्वाकांक्षी असले, तरी अशक्य नाही. पाच वर्षांतसाध्य करण्याचा निर्धार असावा. ही महत्त्वाकांक्षानसेल, तर डेटा सेंटर्स चालवणे आणि कृत्रिमबुद्धिमत्तेच्या पुढील लाटेत नेतृत्व करणे भारतासाठीकठीण होईल. केवळ उत्पादन क्षमता वाढवून हे साध्यहोणार नाही. जर ग्रीड उभारणीमध्ये आपण मागे पडलो,तर 1500 गिगावॅटचे स्वच्छ ऊर्जा जाळे उभे राहूशकणार नाही. ऊर्जा उत्पादन, वीज वहन व्यवस्था,ग्रीड स्थिरता आणि मागणीआधारित तत्परता यांचासमन्वय आवश्यक आहे. अक्षय ऊर्जेच्या दृष्टीने समृद्धभागांमध्ये ट्रान्समिशन नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवरकरावा लागेल. या प्रक्रियेत डिजिटायझेशनची भूमिकानिर्णायक ठरेल. ऊर्जा साठवणूक तितकीच महत्त्वाचीआहे. त्याद्वारे खंडित स्वरूपात मिळणारी अक्षय ऊर्जाचोवीस तास उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह विजेमध्येरूपांतरित होऊ शकते. त्यामुळे अक्षय ऊर्जेशी संबंधितप्रत्येक मोठ्या टेंडरमध्ये विश्वासार्ह आणि तात्काळउपलब्ध वीज पुरवठ्याच्या अटी असायला हव्यात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ऊर्जा क्षेत्रातील भारताची पुढची झेपकेवळ क्षमता वाढवून ठरणार नाही, तरअक्षय ऊर्जेला विश्वासार्ह, स्वस्त वसुरक्षित बनवणारी यंत्रणा उभारण्यावरअवलंबून असेल. सध्याच्या संकटानेभारतासमोर एक मोठी संधी उभी केली.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
महाराष्ट्र
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
- उत्तर प्रदेशात 'सैराट'सारखा थरार! परीक्षा केंद्राबाहेर पडलेल्या पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पतीची साल्याकडून हत्या
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


