नागपूर: एमआयडीसीतील गजबजलेल्या चौकात सायंकाळी अचानक एकच गोंधळ उडाला. आठ ते दहा जणांचे टोळके दोन युवकांवर अचानक तुटून पडले आणि भररस्त्यात त्यांना बेदम मारहाण करू लागले. या थरारक घटनेदरम्यान टोळक्यातील एका आरोपीने कंबरेला खोचलेली संशयास्पद वस्तू बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न केला. ते पाहून मारहाण सहन करणाऱ्या युवकांच्याच नव्हे, तर घटनास्थळी उभ्या असलेल्या नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला. मात्र, समोरच सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच आरोपीच्या साथीदाराने त्याला रोखले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. चौकात वाढणारी गर्दी पाहून आरोपींनी त्या जखमी युवकांना बळजबरीने एका ऑटोत कोंबले आणि वेगाने तिथून पसार झाले. या घटनेमुळे काहीतरी भयंकर घडणार याची कल्पना आल्याने अनेकजण प्रचंड शहारले होते.
मात्र, एका 'अज्ञात हिरो'ने अत्यंत सजग नागरिकाचे कर्तव्य पार पाडले आणि काही वेळेतच चोहोबाजूने पोलिसांच्या गाड्या घटनास्थळांकडे धावल्या. हे पोलिसांचे चित्रपटाला शोभेल असे सिनेस्टाइल धाडस पाहून आरोपी त्या जखमी तरुणांना तिथेच सोडून पळून गेले. एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा हा घटनाक्रम शुक्रवारी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणांची नावे अभय आणि राजा अशी आहेत. महिनाभरापूर्वी एका कुख्यात गुन्हेगारासोबत या दोघांचे भांडण झाले होते, ज्याची खुन्नस मनात ठेवून आज या गुन्हेगाराच्या टोळीने एमआयडीसीतील चौकात त्यांना घेरले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सलग पावसामुळे आधीच वातावरण अंधारलेले होते, त्यात या थरारक घटनेने वातावरण आणखीनच गंभीर झाले.
अनेक आरोपी दारूच्या नशेत धिंगाणा घाजत असल्याने त्यांची देहबोली पाहून ते या दोघांसोबत काहीही करू शकतील, अशी भीती गर्दीतील अनेकांना वाटत होती. मात्र, त्यांना रोखण्याचे धाडस कुणीच दाखवले नाही. दरम्यान, घटनास्थळी सीसीटीव्ही असल्याने आणि गर्दी वाढत असल्याने आरोपींनी या दोन्ही तरुणांना उचलून ऑटोत कोंबले. काही आरोपी ऑटोत बसले तर काही इतर वाहनांनी सुसाट वेगाने शांतीनगरातील एका भंगाराच्या गोदामाकडे निघून गेले. मोठा गुन्हा घडणार असल्याची कुणकुण लागताच गर्दीतील एका सजग नागरिकाने तातडीने पोलिसांना याची गोपनीय माहिती दिली.
ही माहिती वरिष्ठांच्या कानावर जाताच अतिरिक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल, झोन १ चे डीसीपी ऋषिकेश सिंगारेड्डी आदी अधिकारी लगेच ॲक्शन मोडवर आले. त्यांनी कंट्रोल रूमच्या माध्यमातून एमआयडीसी तसेच आजूबाजूच्या ठाण्यातील पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे कडक आदेश दिले. एकाच वेळी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन खणखणल्याने पोलिसांची अनेक वाहने त्या भंगाराच्या गोदामाकडे सुसाट धावली. पोलिसांचा हा मोठा फौजफाटा आणि 'सिनेस्टाइल ॲक्शन' पाहून गुन्हेगारांचे ते टोळके भयभीत झाले आणि तिथून सटकले.
या प्रकरणाची नोंद पोलिसांकडे झाली असली, तरी जखमी तरुण पोलिस ठाण्यात पोहोचले असता त्यांना रात्रीपर्यंत ताटकळत बसवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत अधिकृत गुन्हा दाखल झाला नव्हता. मारहाण आणि अपहरणाचा हा संतापजनक प्रकार एका स्थानिक भंगारवाल्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषींवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा





























Subscribe to my channel



