
Yavatmal : राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीतील नुकसानीपोटी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. मात्र हि मदत कमी असून तुटपुंजी मदत नकोय, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही; असे म्हणत शेतकऱ्याने ६ हजार ९०० रूपयांचा धनादेश तहसीलदार मार्फत सरकारला परत केला आहे.
यंदाच्या खरिपात राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे राज्य सरकारने ऐकतीस हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील अल्पभूधारक शेतकरी रमाकांत दत्तात्रय कोल्हे यांच्या खात्यात १८ हजार ५०० रूपये जमा होण्याऐवजी ६ हजार ९०० रूपये जमा झाले आहेत.
धनादेश स्वरूपात रक्कम केली परत
त्यामुळे मला तुटपुंजी सरकारची मदत नकोय म्हणून जमा झालेली रक्कम तहसीलदार मार्फत सरकारला धनादेशद्वारे परत केली. शेतकरी रमाकांत कोल्हे यांनी धनादेश सोबत सरकारला एक निवेदन देखील दिले. त्यात शेतकऱ्याने लिहिलं की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जेव्हा जाहिर केली. तेव्हा आम्हाला हिम्मत आली. कोणीतरी आमच्या मागे आहे, असं वाटलं. मात्र जमा झालेल्या रक्कमेचा मोबाईलवर मेसेज आला आणि मेसेज बघुन अंतःकरणातून दुःखी झालो.
शब्द पाळता येत नसेल, तर शब्द देऊ नका
सरकारने जाहीर केलेली हेक्टरी आठरा हजार पाचशे रूपये मिळण्याऐवजी केवळ सहा हजार नऊशे एवढी तुटपुंजी रक्कम झाली. यामुळे मुख्यमंत्री देणगी जमा करत आहे. मला दिलेली नुकसान भरपाईची तुटपुंजी रक्कम सरकारला आणि सरकारमधील मंत्र्यांना चांगल्या कामासाठी कामी येईल. म्हणुन मी रक्कम परत करतोय. दिलेला शब्द पाळता येत नसेल, तर शब्द देऊ नका. एक दिवाळी साजरी केली नाही तर मी मरणार नाही; असाही आमच्या वाट्याला कायम संघर्ष आलाय. अशा स्वरूपाचं निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले.
मदतीची घोषणा, अद्याप परिपत्रक नाही
मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा करून तीन दिवस झाले आहे. मात्र अजूनपर्यंत नव्याने परिपत्रक GR आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा गैरसमज झाल्याने त्यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली सहा हजार ९०० रुपयाची मदत सरकारला धनादेश द्वारे परत केली. शेतकऱ्यांनी थोडे दिवस वाट बघावे असं स्थानिक प्रशासनाने सांगितल आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



