Tarique Rahman Bangladesh New Prime Minister: तारिक रहमान यांचा पक्ष BNP ने बांगलादेशातील 13 व्या सार्वजनिक निवडणुकीत महाविजय मिळवला. तारिक रहमान हे जियाऊर रहमान आणि खालिदा जिया यांचा मुलगा आहे. त्यांचे कुटुंब हे बांगलादेशातील सर्वात प्रभावशाली आहे. खालिदा जिया यांच्या मृत्यूनंतर रहमान हे BNP पक्षाचे प्रमुख झाले. त्यांनी पहिल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. अर्थात त्यांच्या या विजयाला संशयाची दाट झालर सुद्धा आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यानंतर यंत्रणा आणि कट्टरतावाद्यांचा रहमान यांना पाठिंबा होता हे काही लपून राहिले नाही. तारिक रहमान यांना गेल्या 17 वर्षांपासून परदेशात रहावे लागले. ते त्यांच्या वतनाला मुकले होते. पण पुन्हा एकदा सरकारची सूत्रं त्यांच्या हाती आली आहे. आता ते बांगलादेशाला दुसरा पाकिस्तान करतात की नवीन उंचीवर नेतात हे येणारा काळच ठरवेल.
तारिक यांचा जीवनप्रवास
तारिक रहमान यांना बांगलादेशाच्या राजकारणात तारिक जिया या नावाने ओळखले जाते. त्यांच्या आईचा प्रभाव त्यातून स्पष्ट दिसतो. त्यांचे कुटुंब हे सक्रिय राजकारणात पूर्वीपासूनच होते. ते जियाउर रहमान आणि खालिदा जिया यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 1967 मध्ये झाला होता. त्यावेळी बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान होता. 1971 च्या मुक्तीवाहिनीच्या संघर्षात मुक्ती संग्रामात बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी तारिक केवळ चार वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आले होते. नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळेच त्यांचा पक्ष बीएनपी त्यांना युद्धातील सर्वात कमी वयाचा बंदिवान म्हणून त्यांचे कौतुक करतात.
त्यांचे वडील जियाउर रहमान हे लष्कराचे कमांडर होते. 1975 मध्ये त्यांनी तख्तापालट केला आणि सत्तेवर मजबूत पकड मिळवली. या घटनेमुळे बांगलादेशाच्या राजकारणात खालिदा जिया आणि शेख हसीना यांच्या कुटुंबात राजकीय वैर झाले. या घटनेला बेगमची लढाई म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशावर शेख हसीना यांची एकहाती सत्ता होती. पण आता त्यांना भारतात शरण यावे लागलेले आहे.
जेव्हा तारिक रहमान हे केवळ 15 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील जियाउर रहमान यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आईच्या छत्रछायेत ते मोठे झाले. खालिदा जिया या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. दोन्ही बेगममध्ये राजकीय द्वंद सुरूच होते. 23 व्या वर्षापर्यंत तारिक यांनी ढाका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय विषयावर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
2007अटक आणि 2008 मध्ये सोडला देश
2007 मध्ये तारिक रहमान यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला. त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. राजकारणात सक्रिय राहणार नाही आणि देश सोडणार या अटींवर त्यांची सुटका झाल्याचे मानले जाते. त्यांची सुटका झाल्यानंतर ते 2008 मध्ये लंडनाला गेले. आईच्या निधनानंतर इकडं शेख हसीना विरोधात विद्यार्थी आंदोलनाचं निमित्त करून त्यांना सत्तेतून दूर करण्यात आले. शेख हसीनांना देश सोडून पळ काढावा लागला. एक वर्षांपासून या देशात हंगामी सरकार कार्यरत होते. आता झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बीएनपीचा विजय झाला. तर तारिक रहमान नवीन पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतील.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



