Tarique Rahman Bangladesh New Prime Minister: तारिक रहमान यांचा पक्ष BNP ने बांगलादेशातील 13 व्या सार्वजनिक निवडणुकीत महाविजय मिळवला. तारिक रहमान हे जियाऊर रहमान आणि खालिदा जिया यांचा मुलगा आहे. त्यांचे कुटुंब हे बांगलादेशातील सर्वात प्रभावशाली आहे. खालिदा जिया यांच्या मृत्यूनंतर रहमान हे BNP पक्षाचे प्रमुख झाले. त्यांनी पहिल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. अर्थात त्यांच्या या विजयाला संशयाची दाट झालर सुद्धा आहे. शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यानंतर यंत्रणा आणि कट्टरतावाद्यांचा रहमान यांना पाठिंबा होता हे काही लपून राहिले नाही. तारिक रहमान यांना गेल्या 17 वर्षांपासून परदेशात रहावे लागले. ते त्यांच्या वतनाला मुकले होते. पण पुन्हा एकदा सरकारची सूत्रं त्यांच्या हाती आली आहे. आता ते बांगलादेशाला दुसरा पाकिस्तान करतात की नवीन उंचीवर नेतात हे येणारा काळच ठरवेल.
तारिक यांचा जीवनप्रवास
तारिक रहमान यांना बांगलादेशाच्या राजकारणात तारिक जिया या नावाने ओळखले जाते. त्यांच्या आईचा प्रभाव त्यातून स्पष्ट दिसतो. त्यांचे कुटुंब हे सक्रिय राजकारणात पूर्वीपासूनच होते. ते जियाउर रहमान आणि खालिदा जिया यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 1967 मध्ये झाला होता. त्यावेळी बांगलादेश हा पूर्व पाकिस्तान होता. 1971 च्या मुक्तीवाहिनीच्या संघर्षात मुक्ती संग्रामात बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी तारिक केवळ चार वर्षांचे होते. त्यांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आले होते. नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळेच त्यांचा पक्ष बीएनपी त्यांना युद्धातील सर्वात कमी वयाचा बंदिवान म्हणून त्यांचे कौतुक करतात.
त्यांचे वडील जियाउर रहमान हे लष्कराचे कमांडर होते. 1975 मध्ये त्यांनी तख्तापालट केला आणि सत्तेवर मजबूत पकड मिळवली. या घटनेमुळे बांगलादेशाच्या राजकारणात खालिदा जिया आणि शेख हसीना यांच्या कुटुंबात राजकीय वैर झाले. या घटनेला बेगमची लढाई म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशावर शेख हसीना यांची एकहाती सत्ता होती. पण आता त्यांना भारतात शरण यावे लागलेले आहे.
जेव्हा तारिक रहमान हे केवळ 15 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील जियाउर रहमान यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आईच्या छत्रछायेत ते मोठे झाले. खालिदा जिया या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. दोन्ही बेगममध्ये राजकीय द्वंद सुरूच होते. 23 व्या वर्षापर्यंत तारिक यांनी ढाका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय विषयावर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
2007अटक आणि 2008 मध्ये सोडला देश
2007 मध्ये तारिक रहमान यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला. त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. राजकारणात सक्रिय राहणार नाही आणि देश सोडणार या अटींवर त्यांची सुटका झाल्याचे मानले जाते. त्यांची सुटका झाल्यानंतर ते 2008 मध्ये लंडनाला गेले. आईच्या निधनानंतर इकडं शेख हसीना विरोधात विद्यार्थी आंदोलनाचं निमित्त करून त्यांना सत्तेतून दूर करण्यात आले. शेख हसीनांना देश सोडून पळ काढावा लागला. एक वर्षांपासून या देशात हंगामी सरकार कार्यरत होते. आता झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे बीएनपीचा विजय झाला. तर तारिक रहमान नवीन पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतील.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

