जिंतूर-जालना महामार्गावर बुधवारी मध्यरात्रीनंतर काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. गंगाखेड येथून उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या 6 मित्रांच्या एर्टिगा कारला अकोली नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार पुलाच्या सिमेंट बीमला इतक्या जोरात धडकली की त्यामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गंगाखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ऐन प्रवासाच्या सुरुवातीलाच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील ६ मित्र एर्टिगा कारने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर दर्शनासाठी निघाले होते. बुधवारी पहाटे १२.१५ वाजता जिंतूर शहराजवळील अकोली नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर भरधाव कार पुलाच्या सिमेंट बीमला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात मृत्यू झालेले चारही तरुण २६ ते २८ वयोगटातील होते.
मृतांची नावे आली समोर
या भीषण अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले चारही तरुण गंगाखेड परिसरातील आहेत. ऐन उमेदीच्या वयात काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात रोहन संजय राठोड (२८), बालाजी आश्रोबा ओटी (२६), अभिजीत शिंगाडे (२७) आणि बालाजी घोरपडे (२८) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मित्र उज्जैन येथे महादेवाच्या दर्शनासाठी जात असताना जिंतूरजवळ त्यांच्यावर हा काळाचा घाला आला.
या अपघातात गणेश गोपाळ रोकडे आणि अन्य एक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
पुढील तपास सुरू
या अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारचा चक्काचूर झाला होता. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. यावेळी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली. या अपघाताच्या प्राथमिक तपासात चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




