टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026) मध्ये जे धक्कादायक दृश्य दिसलं आहे, एका आठवड्यापूर्वी याचा विचार कोणीच केला नसेल. माजी विजेते आणि जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या, संघाला ग्रुप स्टेजमधील त्यांचे सर्व 4 सामने खेळण्यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियाचा प्रवास आधीच संपला आहे. याचा सुपर 8 फेरीवर मोठा परिणाम झाला आहे, तिथे झिम्बाब्वेने आता ऑस्ट्रेलियाचं स्थान घेतलं आहे, ते टीम इंडियाच्याच गटात असतील. झिम्बाब्वेच्या प्रवेशामुळे टीम इंडिया कधी, कुठे आणि कोणत्या संघांशी सामना करेल हे स्पष्ट झाले आहे.
सोमवार, 16 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. परिणामी, ऑस्ट्रेलियन संघाचे भवितव्य झिम्बाब्वे-आयर्लंड सामन्यावर अवलंबून होते. मात्र, मंगळवारी, 17 फेब्रुवारी रोजी पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. सुपर 8 साठी 8 संघांना आधीच मानांकन देण्यात आले होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाला ग्रुप 1 मध्ये X2 सीडिंग देण्यात आलं होतं. पण आता ऑस्ट्रेलियाऐवजी झिम्बाब्वेने या गटात प्रवेश केला आहे.
सुपर-8 मध्ये कोणत्या ग्रुपमध्ये कोणता संघ ?
झिम्बाब्वेने सुपर-8 मध्ये प्रवेश केल्याने या फेरीत प्रवेश करणाऱ्या सात संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत आणि झिम्बाब्वे व्यतिरिक्त, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला आहे. आता, पाकिस्तान आणि अमेरिका यांची अंतिम स्थानासाठी स्पर्धा आहे. आज, 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पाकिस्तान-नामिबिया सामन्याद्वारे हे फायनल होईल. पण या सात टीमच्या आगमनाने कोणता संघ कोणत्या गटात असेल हे स्पष्ट झाले आहे. आधीच ठरलेल्या सीडिंगनुसार, भारतीय संघाला ग्रुप 1 मध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत येथे दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे आहेत. इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांनी आधीच ग्रुप 2 साठी पात्रता मिळवली आहे, तर पाकिस्तान किंवा अमेरिका यापैकी एका संघाचा समावेश असेल.
सुपर-8 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल
ग्रुप 1 मधील चार संघ अंतिम झाले आहेत, त्यामुळे टीम इंडियाचे वेळापत्रक आता स्पष्ट झाले आहे. सुपर 8 फेरी ही, शनिवार 21 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे, परंतु टीम इंडियाचा या फेरीत रविवार, 22 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू होईल.
सुपर-8 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल असं असेल –
22 फेब्रुवारी – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – संध्याकाळू 7:00 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
26 फेब्रुवारी- भारत विरुद्ध झिम्बाब्वे- चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम – संध्याकाळी 7 पासून
1 मार्च- भारत विरुद्ध वेस्टइंडीज- कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियम – संध्याकाळी 7 वाजल्यापासून सामना पार पडणार आहे.
शहर
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
महाराष्ट्र
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




