
Sports News : जागतिक कीर्तीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगाटनेही पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. विनेशने म्हटलं आहे की, मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करणार आहे. विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. माझी अशी अवस्था करणाऱ्या ताकदवान व्यक्तीचे खूप खूप आभार असंही विनेशने तिच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकून बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह नवे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तर बजरंग पुनिया याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यापाठोपाठ गुंगा पहलवान अशी ओळख असलेल्या विरेंद्र सिंह यानेदेखील पद्मश्री परत करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता विनेशने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.
|
|
विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सगळं करण्यास भाग पडलं आहे. हे आम्हाला का करावं लागतंय ते संपूर्ण देशाला माहिती आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात. ही बाब नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्या घरची लेक विनेश फोगाट आहे, मी गेल्या वर्षभरापासून ज्या अवस्थेत आहे, तेच सांगण्यासाठी तुम्हाला पत्र लिहित आहे.
“कुस्ती खेळणाऱ्या आपल्या तरुणींनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही भोगलंय. आमचा जीव गुदमरतोय. साक्षीने आता कुस्तीतून संन्यास घेतला आहे. तर आमचं शोषण करणारा सगळ्यांना सांगत फिरतोय की त्याचा कसा दबदबा आहे. त्याने याबाबत उद्धटपणे घोषणाबाजीदेखील केली.”
“मोदीजी, तुम्ही तुमच्या आयुष्यातली केवळ पाच मिनिटं काढून त्या माणसाने गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांसमोर केलेली वक्तव्ये ऐका, तुम्हाला कळेल की त्याने काय केलं आहे. तो महिला कुस्तीपटूंना ‘मंथरा’ म्हणाला. महिला कुस्तीपटूंशी चुकीच्या पद्धतीने वागल्याची कबुली त्याने टीव्ही पत्रकारांसमोर दिली आहे. आम्हाला अपमानित करण्याची एकही संधी त्याने कधी सोडली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे त्याने आतापर्यंत अनेक महिला कुस्तीपटूंना मागे हटण्यास भाग पाडलं. हे खूप क्लेशदायक आहे.”
माझी आतल्या आत घुसमट होतेय
“जे काही घडलं ते विसरण्याचा मी प्रयत्न केला. परंतु, ते तितकं सोपं नाही. मोदीजी मी तुम्हाला भेटले तेव्हा सर्व काही तुमच्या कानावर घातलं होतं. आम्ही वर्षभरापासून रस्त्यावर आंदोलन करतोय. कोणीच आमची दखल घेत नाहीये. आमचे पुरस्कार आणि पदकांची १५ रुपये एवढी किंमत केली जात आहे. परंतु, आम्हाला आमची ती पदकं जिवापाड प्रिय आहेत. आम्ही जेव्हा ती पदकं जिंकली तेव्हा सर्व देशवासियांना आमचा अभिमान वाटला होता. परंतु, आता आमच्या न्यायासाठी आवाज उठवतोय तर आम्हाला देशद्रोही ठरवलं जातंय.”
“बजरंगने कोणत्या परिस्थितीत पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला ते मला माहीत नाही. परंतु, त्याचा तो फोटो पाहून माझी आतल्या आत खूप घुसमट होतेय. त्यामुळे आता मला माझ्या पुरस्कारांचा तिरस्कार वाटू लागला आहे. मला जेव्हा हे पुरस्कार मिळाले तेव्हा माझ्या आईने मिठाई वाटली होती, तसेच माझ्या काकी आणि मावशांना सांगितलं की, विनेशची बातमी टीव्हीवर दाखवणार आहेत, ती बघा. परंतु, आता जर माझी काकी, मावशा टीव्हीवर आमची ही परिस्थिती पाहत असतील तर त्यांना काय वाटत असेल, त्या माझ्या आईला काय म्हणत असतील. याचा विचार करून मला भिती वाटते.”
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



