मुंबईकरांची अत्यंत महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची ‘लाईफलाइन’ मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर विनातिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. एप्रिल ते जुलै २०२६ या केवळ चार महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी पथकांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल १५ लाख ४६ हजार (१५.४६ लाख) विनातिकीट व अनियमित प्रवाशांना रंगेहाथ पकडले आहे. या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वे प्रवासाचे भाडे आणि दंड मिळून एकूण १२१ कोटी ३१ लाख रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दंडाच्या रकमेत तब्बल ४० टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या वर्षीच्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत राबवलेल्या व्यापक तपास मोहिमांमुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ च्या याच समान कालावधीत मध्य रेल्वेने १४ लाख ४२ हजार प्रकरणांतून ८६ कोटी ७३ लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, यंदा प्रवाशांच्या वाढत्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी आणि तिकीट काढूनच प्रवास करण्याची सवय लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पथकांची संख्या आणि तपासणीच्या फेऱ्या वाढवल्या, ज्यामुळे कारवायांच्या संख्येत आणि दंडात्मक वसुलीत विक्रमी वाढ झाली आहे.
या सर्व व्यापक कारवायांमध्ये मुंबई मुख्यालयाच्या विशेष पथकांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली असून, केवळ मुख्यालयाच्या पथकांनी ७७ हजार प्रकरणांतून तब्बल ७ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये सर्वाधिक कारवाई आणि दंडाची वसुली ही ‘मुंबई विभागात’ झाली असून, मुंबई विभागाने सर्वाधिक ७ लाख ४० हजार प्रकरणांतून तब्बल ४९ कोटी ५० लाख रुपयांचा दंड वसूल करून आघाडी घेतली आहे.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना रांगेत उभे न राहता झटपट तिकीट काढता यावे यासाठी अनारक्षित तिकिटांसाठी खिडक्या, स्वयंचलित तिकीट वेंडिंग मशीन (ATVM), आणि ‘युटीएस ऑन मोबाईल’ (UTS on Mobile) ॲपची सुविधा सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असतानाही अनेक प्रवासी विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे धाडस करत असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रवाशांमुळे नियमित व कायदेशीर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रामाणिक प्रवाशांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागतो. प्रवाशांची ही बेशीम आणि अनियमितता रोखण्यासाठी मध्य रेल्वेने आगामी काळातही अशाच प्रकारच्या कठोर आणि अचानक तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




