मुंबई: नेपाळमध्ये आलेल्या अचानक आणि विनाशकारी पुरात महाराष्ट्रातील पर्यटकांचा संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कितीतरी मेसेज पाठवले तरी केवळ एकच 'टिक' (Single Tick) येतेय, फोन बंद असेल की चार्ज झालेला नसेल, नेटवर्क नसेल का, काहीच कळत नाहीये, अशा अनेक चिंताग्रस्त प्रश्नांच्या भोवऱ्यात सध्या बेपत्ता असलेल्या प्रवाशांचे कुटुंबीय सापडले आहेत. मुंबई व ठाण्याच्या परिसरातील नागरिकांचा समावेश असलेला हा ग्रुप एका टूर ऑपरेटरच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेला होता, मात्र प्रलयकारी पूर आणि दरडी कोसळल्यामुळे संपूर्ण संपर्क तुटला आहे.
ठाण्यातील जोशी दामपत्याशी संपर्क नाही
ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणारे समीर जोशी आणि त्यांची पत्नी अपर्णा जोशी हे दोघेही यात्रेनिमित्त नेपाळला गेले होते. कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून फिरण्याची आवड असणारे हे कपल आपल्या पहिल्याच मोठ्या दोन आठवड्यांच्या परदेश व धार्मिक प्रवासासाठी गेले होते. प्रवासादरम्यान त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, नेपाळ-चीन सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या पुरातून आणि आपत्तीमुळे त्यांच्याशी असलेला संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे नातेवाईक सतत टीव्ही चॅनेल बदलत, वेगवेगळ्या वेबसाइट्स तपासत आणि फोनकडे डोळे लावून आपल्या लाडक्या जोडीदारांची वाट पाहत आहेत.
कुटुंबीयांची आणि आप्तांची अस्वस्थता
फक्त जोशी कुटुंबीयच नव्हे, तर या ग्रुपमधील इतर बेपत्ता नागरिकांच्या घरीही अशीच दहशतीची आणि चिंतेची स्थिती आहे. ठाण्याचे सतीश पाटणकर व त्यांच्या पत्नी रेखा पाटणकर, तसेच रजनीश नातू आणि अन्य सहप्रवासी यांच्या घरीही नातेवाईक हवालदिल झाले आहेत. अनेकांची मुले व नातेवाईक परदेशात किंवा इतर शहरांत असल्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक संपर्काच्या आधारे माहिती मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. सोशल मीडियावर या जोडप्यांचे फोटो शेअर करून त्यांच्याबद्दल काही माहिती किंवा सुगावा लागल्यास त्वरित कळवण्याचे आर्त आवाहन कुटुंबीयांकडून केले जात आहे.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व पर्यटकांचा गट नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी आणि तिमुरे परिसरातील इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून कैलास मानसरोवर यात्रेच्या अंतिम टप्प्यात होता. ते सीमामार्ग ओलांडून पुढे केरिंगच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असतानाच अचानक महापूर आणि भूस्खलनाचा प्रचंड लढा या भागात धडकला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये रसुवागढीचा सीमा परिसर आणि अनेक रस्ते पूर्णपणे उद्धव्वस्त झाले आहेत. दोन्ही देशांच्या प्रशासनाकडून मदतकार्य आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू असली, तरी दळणवळण यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्यामुळे नेमकी माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचे डोळे नेपाळमधील मदतकार्याकडे आणि सुटकेच्या बातम्यांकडे लागले आहेत.
शहर
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
महाराष्ट्र
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
























Subscribe to my channel



