मुंबई: नेपाळमध्ये आलेल्या अचानक आणि विनाशकारी पुरात महाराष्ट्रातील पर्यटकांचा संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कितीतरी मेसेज पाठवले तरी केवळ एकच 'टिक' (Single Tick) येतेय, फोन बंद असेल की चार्ज झालेला नसेल, नेटवर्क नसेल का, काहीच कळत नाहीये, अशा अनेक चिंताग्रस्त प्रश्नांच्या भोवऱ्यात सध्या बेपत्ता असलेल्या प्रवाशांचे कुटुंबीय सापडले आहेत. मुंबई व ठाण्याच्या परिसरातील नागरिकांचा समावेश असलेला हा ग्रुप एका टूर ऑपरेटरच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेला होता, मात्र प्रलयकारी पूर आणि दरडी कोसळल्यामुळे संपूर्ण संपर्क तुटला आहे.
ठाण्यातील जोशी दामपत्याशी संपर्क नाही
ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणारे समीर जोशी आणि त्यांची पत्नी अपर्णा जोशी हे दोघेही यात्रेनिमित्त नेपाळला गेले होते. कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून फिरण्याची आवड असणारे हे कपल आपल्या पहिल्याच मोठ्या दोन आठवड्यांच्या परदेश व धार्मिक प्रवासासाठी गेले होते. प्रवासादरम्यान त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, नेपाळ-चीन सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या पुरातून आणि आपत्तीमुळे त्यांच्याशी असलेला संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे नातेवाईक सतत टीव्ही चॅनेल बदलत, वेगवेगळ्या वेबसाइट्स तपासत आणि फोनकडे डोळे लावून आपल्या लाडक्या जोडीदारांची वाट पाहत आहेत.
कुटुंबीयांची आणि आप्तांची अस्वस्थता
फक्त जोशी कुटुंबीयच नव्हे, तर या ग्रुपमधील इतर बेपत्ता नागरिकांच्या घरीही अशीच दहशतीची आणि चिंतेची स्थिती आहे. ठाण्याचे सतीश पाटणकर व त्यांच्या पत्नी रेखा पाटणकर, तसेच रजनीश नातू आणि अन्य सहप्रवासी यांच्या घरीही नातेवाईक हवालदिल झाले आहेत. अनेकांची मुले व नातेवाईक परदेशात किंवा इतर शहरांत असल्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक संपर्काच्या आधारे माहिती मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. सोशल मीडियावर या जोडप्यांचे फोटो शेअर करून त्यांच्याबद्दल काही माहिती किंवा सुगावा लागल्यास त्वरित कळवण्याचे आर्त आवाहन कुटुंबीयांकडून केले जात आहे.
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व पर्यटकांचा गट नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी आणि तिमुरे परिसरातील इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून कैलास मानसरोवर यात्रेच्या अंतिम टप्प्यात होता. ते सीमामार्ग ओलांडून पुढे केरिंगच्या दिशेने जाण्याच्या तयारीत असतानाच अचानक महापूर आणि भूस्खलनाचा प्रचंड लढा या भागात धडकला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये रसुवागढीचा सीमा परिसर आणि अनेक रस्ते पूर्णपणे उद्धव्वस्त झाले आहेत. दोन्ही देशांच्या प्रशासनाकडून मदतकार्य आणि बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू असली, तरी दळणवळण यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्यामुळे नेमकी माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचे डोळे नेपाळमधील मदतकार्याकडे आणि सुटकेच्या बातम्यांकडे लागले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावरील उंब्रजच्या पुलावर चालत्या उभ्या टेंपोला अचानक भीषण आग; नागरिक व पोलिसांच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!


























Subscribe to my channel




