पुणे: जिल्ह्यातील बारामती येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नंबर १ आणि युनिट नंबर २ चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सभासदांशी संवाद साधताना अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका मांडली. चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरू करताना राज्याचे नेते अजित पवार यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, असे सांगत त्यांनी मागील हंगाम केवळ अजितदादा आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्यामुळेच यशस्वीपणे पार पडल्याचे स्पष्ट केले. सध्या कारखाना काही प्रमाणात आर्थिक अडचणीत असला, तरी मुख्यमंत्री, सुनेत्रावहिनी आणि दत्तामामा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना पृथ्वीराज जाचक पुढे म्हणाले की, पैशाअभावी किंवा आर्थिक अडचणींमुळे सभासदांचा हा अत्यंत महत्त्वाचा 'छत्रपती' कारखाना कधीही बंद पडू दिला जाणार नाही. गरज भासल्यास प्रसंगी मी स्वतःला विकेन, पण माझ्या कारखान्याला बंद पडू देणार नाही, अशी भावनिक साद त्यांनी उपस्थितांना घातली. जिल्ह्यात सर्वात आधी आपल्या कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन होत असून, ऊस तोडणीसाठी ऍडव्हान्स देणारा हा पहिला कारखाना असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या गळीत हंगामात तब्बल १२.५९ लाख टन ऊस गाळपाचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सलग आठ वर्षे १२ लाखांहून अधिक टन गाळपाचे हे सत्र पूर्ण झाल्यास कारखाना पूर्णपणे कर्जातून आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभासदांनी आपल्या शेतातील उसाचे टिपलू किंवा ऊस इतरत्र बाहेर जाऊ देऊ नये, आपल्या पूर्वजांनी उभे केलेले हे वैभव टिकवून ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन त्यांनी केले. "वजन चोख आणि रोख पैसे" हे आपल्या कारखान्याचे मुख्य वैशिष्ट्य असून, गाळपास येणारा ऊस आणि बाहेर जाणारी साखर एकाच वजनकाट्यावर मोजणारा हा एकमेव कारखाना आहे, असे त्यांनी सांगितले. लहानपणापासून वडिलांना कारखान्यात पाहिल्यामुळे पदाची किंवा पैशाची लालसा नसून सहकार संस्था टिकवणे आणि ती सुरळीत चालवणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे जाचक यांनी शेवटी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी माहिती दिली तर सूत्रसंचालन युवराज रणवरे यांनी केले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांच्यासह अनेक संचालक, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.
शहर
- मुंबई: गणपती दर्शनाहून परतताना अभिनेते सलमान खानची संतापजनक कृती; चाहत्याच्या पायावरून कार गेल्याने अभिनेत्याने चालकालाच लगावली थापड
- मुंबई: महापालिकेचा मोठा पर्यावरणपूरक निर्णय; गणपती विसर्जन झाल्यानंतर मुलूंडमध्ये पीओपीच्या मूर्तींवर केली जाणार पूर्णप्रक्रिया
- मुंबई: लंडनवरून परतताना विमान, स्वागत आणि प्रचंड धावपळ; घरी पोहोचल्यावर लक्षात आलं एकनाथ शिंदेंचा मोबाईल विमानातच विसरल्याची धक्कादायक घटना!
- मुंबई: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! टिटवाळा मेगाब्लॉकमुळे कल्याण-कसारा लोकल सेवा बंद, ४ गाड्या रद्द
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- मुंबई: गणपती दर्शनाहून परतताना अभिनेते सलमान खानची संतापजनक कृती; चाहत्याच्या पायावरून कार गेल्याने अभिनेत्याने चालकालाच लगावली थापड
- रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील तळगाव येथे बेकायदेशीर दारू बॉटलिंग रॅकेटचा पर्दाफाश; कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!


























Subscribe to my channel




