सुप्रिया सुळे, शरद पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Supriya Sule on Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला आज 60 वर्षे पूर्ण झाली. शरद पवार यांनी राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणातच मोठी भूमिका निभावली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री म्हणून अनेक जबाबदाऱ्या लिलया पार पाडल्या. पवार हे अनेकांचा राजकीय गुरू आहेत. त्यांच्या शिस्तप्रिय आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाचे कौतुक अनेक जण करतात. अनेक राजकीय नेते त्यांचे चाहते आहेत. त्यांनी देशाच्या राजकारणातच नाही तर समाज कारणात, कृषी, सहकार, सांस्कृतिक, क्रीडासह अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या या चढत्या आलेखाचा साक्षीदार राज्याचा आणि देशाचा इतिहास आहे. त्यांच्या या कारकीर्दीविषयी अनेक जण भरभरून बोलतात. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी वडिलांच्या या संसदीय कारकीर्दीच्या हीरक महोत्सवाबद्दल भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी एक्सवर त्यांच्या हँडलवरून खास पोस्ट लिहिली आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?
शरद पवार यांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. 1967 मध्ये सुरु झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे असे खासदार सुळे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ, हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो, हीच सदिच्छा. अशी पोस्ट सुळे यांनी लिहिली आहे.
आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत… pic.twitter.com/rLkURdFVqV
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026
तरुण मुख्यमंत्री ते कृषीमंत्री, मोठा राजकीय प्रवास
12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवार यांचा जन्म झाला. 1956 साली त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंब्यासाठी विद्यार्थी मेळावा घेतला होता. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी संघटनेत काम केले. एका भाषणा दरम्यान यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना हेरले. त्यांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. पुढे ते राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1966 मध्ये त्यांना युनोस्कोची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी युरोपियन देशांना भेट दिली.
त्यानंतर 1967 मध्ये ते बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा लढले आणि जिंकले. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. 1972 आणि 1978 मध्ये त्यांचा विजय झाला. पुढे वसंतदादा पाटील यांचे सरकार त्यांनी पाडले. 18 जुलै 1978 साली शरद पवार पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते राज्याचे सर्वात तरूण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींच्या काळात त्यांचे सरकार बरखास्त झाले.
1984 साली शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. पण ते केंद्रात गेले नाही. 1985 साली विधानसभा निवडणूक जिंकले. पुढे 1987 मध्ये राजीव गांधीं यांच्या उपस्थित ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले. त्याचवेळी त्यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. तर 1990 मध्ये भाजप शिवसेनेने कडवे आव्हान देऊनही त्यांनी अपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार तयार केले. 4 मार्च 1990 रोजी पवार हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार हे संरक्षणमंत्री झाले. पुढे सुधाकरराव नाईक यांच्या राजीनाम्यानंतर 1993 मध्ये त्यांनी चौथ्यांचा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण हे पद औटघटकेचे ठरेल. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आले. 1996 मध्ये ते बारामतीतून लोकसभेसाठी निवडून गेले. 1997 मध्ये त्यांनी सीताराम केसरी यांच्याविरोधात काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली. पण ते हरले. दोन वर्षांनी सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्दावर त्यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 2004 मध्ये ते देशाचे कृषीमंत्री झाले. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले आणि तेव्हापासून ते राज्यसभेवर आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



