
Sandip Deshpande on Mira Bhayandar MNS Morcha : मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून आज मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे. अमराठी व्यापाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून आजचा मोर्चा काढण्यात येणार आहे. पण या मोर्चाआधीच मनसेचे संदीप देशपांडे आणि शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मोर्चा काढू नये त्यामुळे पोलिसांकडून मनसे नेत्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. पण मनसे मोर्चावर ठाम असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी दिली जाते, पण मराठी माणसाला मोर्चाची परवानगी दिली जात नाही, असे संदीप देशपांडे यांनी टीका केली. संदीप देशपांडे यांनी मीरा भाईंदर प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. मराठी आणि अमराठी असा वाद लावला जातोय, असा आरोपही यावेळी त्यांनी केली.
मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची दडपशाहीच आहे. एकीकडे व्यापाऱ्यांना पोलिासांनी खुली सुट द्यायची आणि मराठी माणसाला आत टाकायचं. सरकारला याचे परिणाम भागावे लागतील, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी देशपांडे यांनी केला आहे. अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मीरा भाईंदर मोर्चा होणार की नाही? याबाबत मनसैनिकांच्या मनात संभ्रम होता. पण संदीप देशपांडे यांनी कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चा होईलच, असे स्पष्ट केले.
अविनाश जाधव यांच्यासह आमच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघणारच. आज होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल. मराठी माणसाच्या नेतृत्वात आजचा मोर्चा निघेल. मोर्चा मराठी माणसासाठी होता, त्यामुळे हा मोर्चा मराठी माणूस काढेल. सामान्य मराठी माणूस मोर्चाचे नेतृत्व करेल. मराठी माणासांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय. काहीही झाले तरी आजचा मीरा भाईंदरमधील मोर्चा निघणारच, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, मराठीचा अपमान केल्यामुळे मीरा भाईंदरमध्ये ती घटना घडली. आम्ही काही कुणालाही मराठी येत नाही म्हणून मारत नाही. आमचा हिंदीला कोणताही विरोध नाही. पण मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
भाजपचे नेते प्रक्षोभक विधाने करतात, त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायच्या आहेत. पण आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. आम्ही असल्या कोणत्याही घाणेरड्या वृत्तीला बळी पडणार नाही. महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद निर्माण करण्याचे भाजपकडून षडयंत्र रचले जात आहे. त्याला आम्ही बळी पडणार नाही. बिहार निवडणुकीत फायदा व्हावा, त्यामुळे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुबेसारख्या लोकांना महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत आहे. बिहारमध्ये बसून महाराष्ट्राबद्दल बोलणार आहे. महाराष्ट्रातील वातावरण खराब व्हावे, याचं भाजपचे षडयंत्र आहे. भाजपने आतापर्यंत दंगली घडवूनच निवडणुका जिंकल्या आहेत. मराठी-अमाराठी वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकारने कारवाई करावी. दुबेसारख्यांनाही सरकारने सांगायला हवे.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट

























Subscribe to my channel




