
Riteish Deshmukh Speech: लोकसभेला जे वारं होतं, तेच वारं आताही आहे, असे म्हणत अभिनेते रितेश देशमुख यांनी आपले लहान भाऊ धीरज विलासराव देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीण येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याचे सांगितले पण लातूरमधील मुलांनाच रोजगार नाही. रोजगार देण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण लोकांकडे रोजगार नाही. पिकांना भाव नाही. येत्या २० तारखेला मतदारांनी मतदान करताना या मुद्द्यांचा विचार करावा, असे आवाहन रितेश देशमुख यांनी केले. तसेच भाजपाकडून होत असलेल्या धर्माच्या प्रचारावरही रितेश देशमुख यांनी जोरदार टीका केली.
भगवान श्रीकृष्णाचा दाखला देऊन रितेश देशमुख म्हणाले, “कर्म हाच धर्म आहे. काम करत राहणे म्हणजे कर्म करणे आणि कर्म म्हणजेच धर्म. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्यालाच धर्म करणे म्हणतात. पण जो काम करत नाही त्याला गरज पडते धर्माची. सगळे म्हणतात की धर्म धोक्यात आहे, प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्म बचाव, धर्माला वाचवा, असं म्हटलं जातंय. आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. खरं म्हणजे ते (राजकीय पक्ष) धर्माला प्रार्थना करतात की, आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. काही गरज नाही अशा भुलथापांना बळी पडायची.”
|
|
रितेश देशमुख मतदारांना आवाहन करताना म्हणाले, जे धर्माची गोष्ट करतात, त्यांना सांगा धर्माचं आम्ही बघून घेतो, आधी आमच्या कामाचं बोला. आमच्या पिक-पाण्याला काय भाव देणार, आमच्या आई-बहिणी सुरक्षित आहेत की नाही, हे सांगा. २० नोव्हेंबरनंतर धीरज देशमुख यांच्याकडे फार मोठी जबाबदारी येणार आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याकडे काम करण्याची धमक आहे. यावेळी सरकार महाविकास आघाडीचंच येणार, याबद्दल मला शंका नाही.
भाजपाकडून बटेंगे तो कटेंगेची घोषणा
भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला असून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत हा चर्चेतला मुद्दा करण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक है तो सेफ है”, अशी घोषणा दिली. आज राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातील पहिल्या पानांवर या घोषणेची जाहिरात देण्यात आली आहे. भाजपाच्या या घोषणेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसकडून ‘जुडेंगे तो जितेंगे’ ही घोषणा दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची ही घोषणा लोकसभा निवडणुकीत लोकप्रिय ठरली होती.
भाजपाच्या या घोषणेवर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली आहे. “सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका समोर आली आहे. अर्थात ते जातीयवादी आहेतच, पण या घोषणेनं ते अधोरेखित केले. निवडणुका येतात आणि जातात. पण दोन धर्मांमध्ये किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणी करता कामा नये. पण त्याचं भान भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांना नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



