
Riteish Deshmukh Speech: लोकसभेला जे वारं होतं, तेच वारं आताही आहे, असे म्हणत अभिनेते रितेश देशमुख यांनी आपले लहान भाऊ धीरज विलासराव देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीण येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याचे सांगितले पण लातूरमधील मुलांनाच रोजगार नाही. रोजगार देण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण लोकांकडे रोजगार नाही. पिकांना भाव नाही. येत्या २० तारखेला मतदारांनी मतदान करताना या मुद्द्यांचा विचार करावा, असे आवाहन रितेश देशमुख यांनी केले. तसेच भाजपाकडून होत असलेल्या धर्माच्या प्रचारावरही रितेश देशमुख यांनी जोरदार टीका केली.
भगवान श्रीकृष्णाचा दाखला देऊन रितेश देशमुख म्हणाले, “कर्म हाच धर्म आहे. काम करत राहणे म्हणजे कर्म करणे आणि कर्म म्हणजेच धर्म. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्यालाच धर्म करणे म्हणतात. पण जो काम करत नाही त्याला गरज पडते धर्माची. सगळे म्हणतात की धर्म धोक्यात आहे, प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्म बचाव, धर्माला वाचवा, असं म्हटलं जातंय. आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. खरं म्हणजे ते (राजकीय पक्ष) धर्माला प्रार्थना करतात की, आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. काही गरज नाही अशा भुलथापांना बळी पडायची.”
|
|
रितेश देशमुख मतदारांना आवाहन करताना म्हणाले, जे धर्माची गोष्ट करतात, त्यांना सांगा धर्माचं आम्ही बघून घेतो, आधी आमच्या कामाचं बोला. आमच्या पिक-पाण्याला काय भाव देणार, आमच्या आई-बहिणी सुरक्षित आहेत की नाही, हे सांगा. २० नोव्हेंबरनंतर धीरज देशमुख यांच्याकडे फार मोठी जबाबदारी येणार आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याकडे काम करण्याची धमक आहे. यावेळी सरकार महाविकास आघाडीचंच येणार, याबद्दल मला शंका नाही.
भाजपाकडून बटेंगे तो कटेंगेची घोषणा
भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला असून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत हा चर्चेतला मुद्दा करण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “एक है तो सेफ है”, अशी घोषणा दिली. आज राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातील पहिल्या पानांवर या घोषणेची जाहिरात देण्यात आली आहे. भाजपाच्या या घोषणेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसकडून ‘जुडेंगे तो जितेंगे’ ही घोषणा दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची ही घोषणा लोकसभा निवडणुकीत लोकप्रिय ठरली होती.
भाजपाच्या या घोषणेवर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टीका केली आहे. “सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका समोर आली आहे. अर्थात ते जातीयवादी आहेतच, पण या घोषणेनं ते अधोरेखित केले. निवडणुका येतात आणि जातात. पण दोन धर्मांमध्ये किंवा दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणी करता कामा नये. पण त्याचं भान भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांना नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



