
Pune News : पुणे तिथे काय उणे? ही म्हण अगदी खरी आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गुंडांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. कधी कोणाची हत्या तर कधी कुठेतरी तोडफोडीच्या घटना सतत समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून पुणे शहरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही आठवड्यांपूर्वी गुन्हेगारांना इशारा दिला होता – “सात पिढ्यांना लक्षात राहील, अशी अद्दल घडवू.” मात्र प्रत्यक्षात मागील दीड महिन्याच्या काळात शहरात जो गुन्हेगारीचा उद्रेक झाला आहे, त्यावरून या इशाऱ्याचे प्रतिबिंब रस्त्यांवर कुठेच दिसून येत नाही. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर उजेडातही कोयत्यांचे हल्ले, वाहनांची तोडफोड, घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी पुणेकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
पुण्यातील विविध भागांमध्ये या घटना इतक्या वाढल्या आहेत की, कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग आणि कोयता गँगसारख्या टोळ्यांची वाढती दहशत हे सर्वात चिंताजनक चित्र उभं करत आहे. शहरातील प्रमुख भागांमध्ये सलग रात्रींमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी, हडपसर, भवानी पेठ, धनकवडी, कात्रज या परिसरांमध्ये दररोज नवे गुन्हे घडताना दिसत आहेत. काही घटनांमध्ये थेट हवेत गोळीबार झाला, कोयत्याने वार करण्यात आले आणि तलवारी घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली.
गेल्या दीड वर्षांत पुण्यात 124 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या असून त्यातील 35 टक्के आरोपी अल्पवयीन आहेत. वर्षभरात ८९ प्रकरणे नोंद झाली असून, चालू वर्षातही ३५ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एमआयटी कॉलेज परिसर, हडपसर, कोंढवा आणि सदाशिव पेठ या ठिकाणी सातत्याने तोडफोड आणि हल्ल्याचे प्रकार घडले. काही घटनांमध्ये राजकीय नेत्यांचे नातेवाईक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचंही निष्पन्न झालं.
|
|
शहरात केवळ वाहन तोडफोडच नव्हे, तर चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील साडेचार वर्षांत तब्बल ४० कोटी २२ लाख रुपयांची वाहने चोरीला गेली, त्यापैकी केवळ १६ कोटींचीच वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं. घरफोड्यांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे – ७३ कोटींहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून केवळ १३ कोटींचा मुद्देमाल परत मिळवण्यात आला.
सामान्य पुणेकर या गुन्हेगारीचा थेट भुर्दंड सहन करत आहे. रात्रीचं पोलिसिंग अपुरं पडतंय, गुन्हेगारांची अरेरावी वाढतेय, आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी ते खुलेआम रस्त्यावर दहशत माजवत आहेत. 'भयमुक्त गणेशोत्सव'च्या ग्वाही दिल्या जात असल्या, तरी पुणेकरांच्या मनातील असुरक्षिततेचं सावट घनदाट होत चाललं आहे. पोलिसांनी काही प्रमाणात अटक व कारवाई केली असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप आणि ठोस नियंत्रण यंत्रणेअभावी या घटनांना रोखता येत नाहीये. परिणामी, ‘पुणेकर भयमुक्त कधी होणार?’ हा सवाल दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.
दीड वर्षात १२४ घटनांची नोंद
शहरात वाहन तोडफोडीच्या दीड वर्षात तब्बल १२४ घटना घडल्या असून, त्यामध्ये गेल्या वर्षी (२०२४) ८९ घटना घडलेल्या आहेत. त्यातील ८१ गुन्हे उघड असून, २५५ आरोपी आहेत. तर अल्पवयीन ८७ मुलांचा सहभाग होता. तर चालू वर्षात ३५ घटनांत ८२ आरोपीपैकी ५० मुले अल्पवयीन आहेत.
-
२८ जून: चतुः शृंगी पोलिसांच्या हद्दीत विधाते वस्ती येथे १५ जणांचा धुडगूस.
-
२८ जून : सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे चौघांनी राडा घालून १५ वाहनांची तोडफोड केली.
-
३ जुलै : पूना कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून १० ते १५ जणांनी राडा घालून, एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली.
-
५ जुलै : वानवडीत मध्यरात्री दोन गट भिडले. दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण.
-
१२ जुलै : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावर हल्लाही केला.
-
२० जुलै : भवानी पेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा.
-
२३ जुलै धनकवडी परिसरात गाड्यांची तोडफोड दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड
-
4 ऑगस्ट किटकटवाडी या ठिकाणी गोळीबारानी पैठणी गाड्यांची तोडफोड
-
5 ऑगस्ट दोन वाहन एकमेकांना वाचण्यावरून वाद; तरुणांकडून हवेत गोळीबार
-
5 ऑगस्ट हडपसर भागात गाड्यांची तोडफोड, कोयते आणि तलवारीने वार
-
6 ऑगस्ट पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ भागात कोयत्याने वार गाड्यांची तोडफोड, राजकीय नेत्याच्या जावयाने गाड्यांची तोडफोड केली प्रकार
-
7 ऑगस्ट एमआयटी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांचा राडा
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



