
Pune News : पुणे तिथे काय उणे? ही म्हण अगदी खरी आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गुंडांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. कधी कोणाची हत्या तर कधी कुठेतरी तोडफोडीच्या घटना सतत समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून पुणे शहरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही आठवड्यांपूर्वी गुन्हेगारांना इशारा दिला होता – “सात पिढ्यांना लक्षात राहील, अशी अद्दल घडवू.” मात्र प्रत्यक्षात मागील दीड महिन्याच्या काळात शहरात जो गुन्हेगारीचा उद्रेक झाला आहे, त्यावरून या इशाऱ्याचे प्रतिबिंब रस्त्यांवर कुठेच दिसून येत नाही. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर उजेडातही कोयत्यांचे हल्ले, वाहनांची तोडफोड, घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी पुणेकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
पुण्यातील विविध भागांमध्ये या घटना इतक्या वाढल्या आहेत की, कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग आणि कोयता गँगसारख्या टोळ्यांची वाढती दहशत हे सर्वात चिंताजनक चित्र उभं करत आहे. शहरातील प्रमुख भागांमध्ये सलग रात्रींमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी, हडपसर, भवानी पेठ, धनकवडी, कात्रज या परिसरांमध्ये दररोज नवे गुन्हे घडताना दिसत आहेत. काही घटनांमध्ये थेट हवेत गोळीबार झाला, कोयत्याने वार करण्यात आले आणि तलवारी घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली.
गेल्या दीड वर्षांत पुण्यात 124 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या असून त्यातील 35 टक्के आरोपी अल्पवयीन आहेत. वर्षभरात ८९ प्रकरणे नोंद झाली असून, चालू वर्षातही ३५ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एमआयटी कॉलेज परिसर, हडपसर, कोंढवा आणि सदाशिव पेठ या ठिकाणी सातत्याने तोडफोड आणि हल्ल्याचे प्रकार घडले. काही घटनांमध्ये राजकीय नेत्यांचे नातेवाईक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचंही निष्पन्न झालं.
|
|
शहरात केवळ वाहन तोडफोडच नव्हे, तर चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील साडेचार वर्षांत तब्बल ४० कोटी २२ लाख रुपयांची वाहने चोरीला गेली, त्यापैकी केवळ १६ कोटींचीच वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं. घरफोड्यांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे – ७३ कोटींहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून केवळ १३ कोटींचा मुद्देमाल परत मिळवण्यात आला.
सामान्य पुणेकर या गुन्हेगारीचा थेट भुर्दंड सहन करत आहे. रात्रीचं पोलिसिंग अपुरं पडतंय, गुन्हेगारांची अरेरावी वाढतेय, आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी ते खुलेआम रस्त्यावर दहशत माजवत आहेत. 'भयमुक्त गणेशोत्सव'च्या ग्वाही दिल्या जात असल्या, तरी पुणेकरांच्या मनातील असुरक्षिततेचं सावट घनदाट होत चाललं आहे. पोलिसांनी काही प्रमाणात अटक व कारवाई केली असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप आणि ठोस नियंत्रण यंत्रणेअभावी या घटनांना रोखता येत नाहीये. परिणामी, ‘पुणेकर भयमुक्त कधी होणार?’ हा सवाल दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.
दीड वर्षात १२४ घटनांची नोंद
शहरात वाहन तोडफोडीच्या दीड वर्षात तब्बल १२४ घटना घडल्या असून, त्यामध्ये गेल्या वर्षी (२०२४) ८९ घटना घडलेल्या आहेत. त्यातील ८१ गुन्हे उघड असून, २५५ आरोपी आहेत. तर अल्पवयीन ८७ मुलांचा सहभाग होता. तर चालू वर्षात ३५ घटनांत ८२ आरोपीपैकी ५० मुले अल्पवयीन आहेत.
-
२८ जून: चतुः शृंगी पोलिसांच्या हद्दीत विधाते वस्ती येथे १५ जणांचा धुडगूस.
-
२८ जून : सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे चौघांनी राडा घालून १५ वाहनांची तोडफोड केली.
-
३ जुलै : पूना कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून १० ते १५ जणांनी राडा घालून, एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली.
-
५ जुलै : वानवडीत मध्यरात्री दोन गट भिडले. दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण.
-
१२ जुलै : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावर हल्लाही केला.
-
२० जुलै : भवानी पेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा.
-
२३ जुलै धनकवडी परिसरात गाड्यांची तोडफोड दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड
-
4 ऑगस्ट किटकटवाडी या ठिकाणी गोळीबारानी पैठणी गाड्यांची तोडफोड
-
5 ऑगस्ट दोन वाहन एकमेकांना वाचण्यावरून वाद; तरुणांकडून हवेत गोळीबार
-
5 ऑगस्ट हडपसर भागात गाड्यांची तोडफोड, कोयते आणि तलवारीने वार
-
6 ऑगस्ट पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ भागात कोयत्याने वार गाड्यांची तोडफोड, राजकीय नेत्याच्या जावयाने गाड्यांची तोडफोड केली प्रकार
-
7 ऑगस्ट एमआयटी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांचा राडा
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



