डेंग्यूचा ताप उतरला म्हणजे धोका पूर्णपणे टळला, असा समज करून घेणे रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. उलटपक्षी, ताप उतरल्यानंतरचे पुढील ४८ तास डेंग्यू रुग्णांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे आणि धोकादायक असतात, असा महत्त्वपूर्ण इशारा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे. याच काळात रुग्andची प्रकृती अचानक खालावण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य वेळी आवश्यक तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाचे महत्त्वाचे सविस्तर मुद्दे व मार्गदर्शक सूचना:
-
केवळ प्लेटलेट्स नव्हे, एकूण प्रकृती महत्त्वाची: डेंग्यूच्या आजारात केवळ प्लेटलेट्सची संख्या पाहून रुग्णाची गुरुत्व किंवा गंभीरता ठरवता येत नाही. काही रुग्णांची प्लेटलेट्स कमी असूनही त्यांची प्रकृती स्थिर राहू शकते, तर काहींमध्ये प्लेटलेट्स तुलनेने जास्त असूनही गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब, रक्तस्रावाची लक्षणे, उलट्या, पोटदुखी, अशक्तपणा आणि इतर वैद्यकीय निकषांचा एकत्रित विचार करून उपचार करणे आवश्यक आहे.
-
उशिरा उपचार आणि इतर आजार: अनेक रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. काहींना यकृत, मूत्रपिंड, हृदय किंवा मेंदूशी संबंधित अन्य गंभीर आजारही असू शकतात. त्यामुळे डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणून प्रत्येक मृत्यूचे कारण डेंग्यूच आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
-
डेंग्यूची धोक्याची लक्षणे: तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, नाक किंवा हिरड्यांतून रक्तस्राव होणे, उलटी किंवा शौचातून रक्त जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिअशक्तपणा किंवा अस्वस्थता, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे, ही लक्षणे आढळल्यास विलंब न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही वेदनाशामक (Painkiller) औषधे घेऊ नयेत, कारण अशा औषधांमुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.
-
रुग्णालये आणि नागरिकांनी घ्यायची दक्षता: डेंग्यूचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याला मच्छरदाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून इतर डासांमार्फत संसर्गाचा प्रसार रोखता येईल. तसेच, घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे आणि डासांपासून संरक्षण करणारी साधने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




