
Pune : अंगसुळे येथील विजय मारुती शेडगे (वय २४) या तरुणाचा ताडी पिऊन मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवारी (ता.२५) घडली असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला. सर्व महिला एकत्र येऊन आक्रमक होत दारु व ताडी बंदच्या घोषणा देत अवैद्य दारु व ताडी विक्री करणाऱ्यांची दुकाने फोडून बनावट ताडीची केंद्र व दारुच्या बाटल्या फोडल्या. पोलिसांना वारंवार अर्ज करुनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावातील ताडी व दारु विक्री बंद केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
यावेळी गावातील सुष्मा राऊत, वंदना राऊत, नंदा शेडगे, रंजना राऊत, सुभद्रा राऊत, वैशाली राऊत, संजना दळवी, कुंदा राऊत, मंगल राऊत, सुमन राऊत, शांताबाई राऊत, सुमन राऊत, सुष्मा तावरे, सोपान राऊत, धोडीबा राऊत, आनंद राऊत, शिवाजी कंक, यशवंत कंक, बबन भगत, विठ्ठल सणस, अक्षय झुनगारे, भाऊसाहेब परखांदे, शशीकांत किरवे, रामचंद्र राऊत यासह गावातील तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
|
Pavana Dam : पिंपरी चिंचवड, मावळवर पाणी टंचाईचे सावट; पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा |
अंगसुळे येथे मागील ५० वर्षापासून ताडी विक्री सुरु असून आतापर्यत सांगवीसह अंगसुळे गावातील चारजण मृत्यूमुखी पडले आहेत. देशी व विदेशी दारु, गांजा विक्री तीन ठिकाणी होत असून एका ठिकाणी ताडी विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारी, अंगसुळे, सांगवी, कंकवाडी व भावेखल येथील तरुण येथे येतात व बनावट ताडी पिऊन तरुण व्यसनाधीन होत असून घरात भांडणतंटे वाढत आहेत. गावातील तरुण मरण पावल्यामुळे महिला आक्रमक होऊन ताडी व दारु विकणाऱ्यांच्या घरात घुसून अवैद्य ताडी व देशी विदेशी दारुच्या बाटल्या बाहेर काढून दारु बंदीची घोषणा देत बाटल्या फोडल्या आणि निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला असून महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
अंगसुळे येथे ताडी उत्पादन करण्याचा परवाना आहे. मात्र ताडी विक्री करायला परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात ताडी विक्री केली जात आहे. तर अवैद्य विनापरवाना देशी विदेशी दारु विक्री होत असुन याकडे उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलीस कानाडोळा करत आहेत. आर्थिक व्यवहारातून पोलिस कारवाई करत नसल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले. अंगसूळे येथील अवैध धंदयामुळे कारी, सांगवी भिडे, भावेखल, अंगसुळे गावातील नागरिकांनी अवैद्य ताडी विकली जात व अवैद्य दारु केली जात आहे. तसेच आंबवडे खोर्यातील व वाई तालुक्यातील तळीराम येथून ताडी नेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं. अवैध धंद्याबाबत भोर पोलिसांना वेळोवेळी अर्ज करुनही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. आजूबाजूच्या नागरिकांना दारु पिणाऱ्या लोकांचा नाहक त्रास सहन करवा लागतो. तर दारुच्या बाटल्या व फुगे याचे प्लास्टिक खाऊन जनावरे मरत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले.
भोर तालुक्यात अंगसुळे, नांदगाव, निगुडघर, वाकांबे येथे मोठ्या प्रमाणात ताडी व बनावट दारु विक्री सुरु आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलीस दुर्लक्ष करत आहेत.यामुळे अवैद्य धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत असून याचा मोठा परीणाम होय असून हे धंदे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील महिलांनी दिला आहे.
आमदार शंकर मांडेकर यांनी आढावा बैठकीत अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना देऊनही अवैध धंदे सर्रासपणे सुरु असून तरुणांचा जीव जात असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याचं दिसून येत आहे. आर्थिक व्यवहारातून या अवैध धंद्यांना अभय मिळत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



