
Pune : अंगसुळे येथील विजय मारुती शेडगे (वय २४) या तरुणाचा ताडी पिऊन मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवारी (ता.२५) घडली असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला. सर्व महिला एकत्र येऊन आक्रमक होत दारु व ताडी बंदच्या घोषणा देत अवैद्य दारु व ताडी विक्री करणाऱ्यांची दुकाने फोडून बनावट ताडीची केंद्र व दारुच्या बाटल्या फोडल्या. पोलिसांना वारंवार अर्ज करुनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने गावातील ताडी व दारु विक्री बंद केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
यावेळी गावातील सुष्मा राऊत, वंदना राऊत, नंदा शेडगे, रंजना राऊत, सुभद्रा राऊत, वैशाली राऊत, संजना दळवी, कुंदा राऊत, मंगल राऊत, सुमन राऊत, शांताबाई राऊत, सुमन राऊत, सुष्मा तावरे, सोपान राऊत, धोडीबा राऊत, आनंद राऊत, शिवाजी कंक, यशवंत कंक, बबन भगत, विठ्ठल सणस, अक्षय झुनगारे, भाऊसाहेब परखांदे, शशीकांत किरवे, रामचंद्र राऊत यासह गावातील तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
|
Pavana Dam : पिंपरी चिंचवड, मावळवर पाणी टंचाईचे सावट; पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा |
अंगसुळे येथे मागील ५० वर्षापासून ताडी विक्री सुरु असून आतापर्यत सांगवीसह अंगसुळे गावातील चारजण मृत्यूमुखी पडले आहेत. देशी व विदेशी दारु, गांजा विक्री तीन ठिकाणी होत असून एका ठिकाणी ताडी विक्री होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कारी, अंगसुळे, सांगवी, कंकवाडी व भावेखल येथील तरुण येथे येतात व बनावट ताडी पिऊन तरुण व्यसनाधीन होत असून घरात भांडणतंटे वाढत आहेत. गावातील तरुण मरण पावल्यामुळे महिला आक्रमक होऊन ताडी व दारु विकणाऱ्यांच्या घरात घुसून अवैद्य ताडी व देशी विदेशी दारुच्या बाटल्या बाहेर काढून दारु बंदीची घोषणा देत बाटल्या फोडल्या आणि निषेध व्यक्त केला. यावेळी महिलांचा रुद्रावतार पाहायला मिळाला असून महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.
अंगसुळे येथे ताडी उत्पादन करण्याचा परवाना आहे. मात्र ताडी विक्री करायला परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात ताडी विक्री केली जात आहे. तर अवैद्य विनापरवाना देशी विदेशी दारु विक्री होत असुन याकडे उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलीस कानाडोळा करत आहेत. आर्थिक व्यवहारातून पोलिस कारवाई करत नसल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखवले. अंगसूळे येथील अवैध धंदयामुळे कारी, सांगवी भिडे, भावेखल, अंगसुळे गावातील नागरिकांनी अवैद्य ताडी विकली जात व अवैद्य दारु केली जात आहे. तसेच आंबवडे खोर्यातील व वाई तालुक्यातील तळीराम येथून ताडी नेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं. अवैध धंद्याबाबत भोर पोलिसांना वेळोवेळी अर्ज करुनही पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. आजूबाजूच्या नागरिकांना दारु पिणाऱ्या लोकांचा नाहक त्रास सहन करवा लागतो. तर दारुच्या बाटल्या व फुगे याचे प्लास्टिक खाऊन जनावरे मरत असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले.
भोर तालुक्यात अंगसुळे, नांदगाव, निगुडघर, वाकांबे येथे मोठ्या प्रमाणात ताडी व बनावट दारु विक्री सुरु आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व भोर पोलीस दुर्लक्ष करत आहेत.यामुळे अवैद्य धंद्यात दिवसेंदिवस वाढ होत असून याचा मोठा परीणाम होय असून हे धंदे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावातील महिलांनी दिला आहे.
आमदार शंकर मांडेकर यांनी आढावा बैठकीत अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना देऊनही अवैध धंदे सर्रासपणे सुरु असून तरुणांचा जीव जात असल्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याचं दिसून येत आहे. आर्थिक व्यवहारातून या अवैध धंद्यांना अभय मिळत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



