शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री 2 वाजता तुम्ही एखाद्या पबमध्ये काही तास नाच-गाणे करून थकून घरी परतता. घरी पोहोचल्यावर तुम्हाला दिसते की मुख्य दरवाजा अजूनही उघडा आहे. आत शिरताना तुम्ही पुटपुटता - “बेजबाबदार! ’ पण ही खरी गोष्ट ही नसते. खरी गोष्ट ही की तुमच्या वडिलांनी हॉलच्या खिडकीतून तुम्हाला तुमच्या मित्राच्या बाईकवरून किंवा टॅक्सीतून उतरताना पाहिले होते. त्यांना रात्री 2 वाजता तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची नव्हती. पण संध्याकाळी 8 वाजता जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडला होतात, तेव्हापासूनच त्यांच्या नजरा दरवाजावर लागल्या होत्या. ते आपल्या लाडक्या मुलीच्या परतण्याची वाट पाहत होते. जेव्हा तुम्ही शेवटी सुखरूप घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो दिलाशाचा एक शांत सुस्कारा होता. त्यांनी देवाचे आभार मानले आणि झोपायला गेले. पण ते अजून झोपलेले नाहीत. कदाचित ते वाट पाहत आहेत की तुम्ही त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावाल आणि म्हणाल - “सॉरी डॅड, मला उशीर झाला.” पण याऐवजी तुम्ही तुमच्या खोलीचा दरवाजा बंद करता आणि रविवारच्या दुपारपर्यंत झोपून राहता. वडील सकाळी ६ वाजताच उठून शनिवार-रविवारची महत्त्वाची कामे उरकण्यात लागलेले असतात. अनेक कुटुंबांमध्ये शनिवार-रविवार काहीसे असेच जातात. मुलांना वाटते की आई-वडील त्यांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ करत आहेत. आई-वडिलांना वाटते की मुले त्यांची काळजी समजूनच घेत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये प्रेम, रागाच्या थरांखाली कुठेतरी दबून जाते. मला नुकतेच भोपाळमध्ये आयोजित एका इंडक्शन कार्यक्रमादरम्यान जाणवले की आई-वडील आणि मुलांमधील हे अंतर किती वाढलेय. मी तिथे मुलांना विचारले की ज्यांना असे वाटते की त्यांचे आई-वडील, विशेषतः वडिलांसोबत त्यांचे नाते दुरावले आहे, त्यांनी हात वर करावेत. मला अपेक्षा होती की काही हात वर येतील. पण शेकडो हात एकाच वेळी वर आले. ते दृश्य विसरणे कठीण होते. ही अशी मुले नव्हती, ज्यांनी आपल्या वडिलांवर प्रेम करणे बंद केले होते. ही मुले फक्त त्या वयात पोहोचली होती, जिथे आई-वडिलांचा प्रत्येक सल्ला त्यांना ढवळाढवळ वाटू लागतो. तर किशोरावस्थेतील स्वैराचाराचे प्रत्येक कृत्य आई-वडिलांना धोक्यासारखे दिसू लागते. 12 ते 1६ वर्ष वयोगटातील मुलांचे आपल्या आई-वडिलांशी भांडणे स्वाभाविक आहे. हा मोठे होण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यांना स्वातंत्र्य हवे असते, खासगीपणा हवा असतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार हवा असतो. तर आई-वडिलांनी अजूनही त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली असते. मी काही वह्यांमध्ये लिहिलेले पाहिले - “आय हेट माय फादर. ’ कदाचित त्या लहान मुलाने असा विचार केला नसेल की जर त्याच्या वडिलांनी नकळत हे शब्द वाचले तर त्यांच्यावर काय बेतेल. ज्या आई-वडिलांनी मुलांसाठी अनेक वर्षे आपल्या सुख-सुविधा, पैसा, झोप आणि अनेकदा आपल्या स्वप्नांनाही मागे ठेवले असेल, त्यांच्यासाठी असे शब्द एखाद्या घावापेक्षाही खोल जखम देऊ शकतात. ते कदाचित स्वतःलाच विचारतील की आपल्या मुलासाठी एवढे करूनही तो माझ्याबद्दल असाच विचार करतो का? म्हणूनच मुलांनी आपला राग व्यक्त करताना थोडे सावध राहिले पाहिजे. राग तात्पुरता असतो, पण लिहिलेले शब्द कायमस्वरूपी आठवण बनू शकतात. आई-वडिलांसोबत आपले नाते जपण्याच्या महत्त्वावर मुलांशी बोलताना मला हे सत्य पुन्हा एकदा दिसले. माझ्यासमोर ती मुले होती, जी आता आपले कॅम्पस जीवन सुरू करणार होती आणि स्वातंत्र्याच्या एका अगदी नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी तयार होती. पण त्यांच्या मागे ते आई-वडील उभे होते, ज्यांनी त्यांना इथपर्यंत पोहोचवले होते. बोलता-बोलता माझी नजर अशा किमान 50 जणांवर पडली, जे गुपचूप आपले अश्रू पुसत होते. अनेक वर्षे त्यांनी आपल्या मुलांचा हात धरून ठेवला होता. आता त्यांना त्यांचा हात सोडून देण्यास सांगितले जात होते. कदाचित त्या अश्रूंनी ते सर्व काही सांगून टाकले, जे मुलांना अजूनपर्यंत समजले नव्हते. फंडा असा आहे की, गरज पडल्यास आपल्या आई-वडिलांशी भांडून घ्या. त्यांच्याशी असहमती दर्शवा. आपले स्वातंत्र्यही मागा. पण जेव्हा राग उतरेल, तेव्हा परत जा आणि त्यांना सॉरी म्हणा. कारण रात्री 2 वाजता उघड्या दरवाजाच्या मागे तुमची वाट पाहणारे लोक तुमचे शत्रू नाहीत. ते तेच आहेत, जे तुम्ही सुखरूप घरी परतावे म्हणून प्रार्थना करतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


