
Pune : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अगरवाल दाम्पत्य धनाढ्य आहे. त्यांना जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होतील. आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्या यावा, अशी विनंती तपास अधिकारी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सोमवारी न्यायालयात केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी जामीन अर्जावरील यु्क्तिवाद पूर्ण केला. ॲड. हिरे यांनी आरोपींच्या जामीन अर्जास विरोध केला.
आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी धनाढ्य आहेत.
अपघातानंतर मुलाच्या रक्तनमुन्या बदल करण्यासाठी त्यांनी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना अश्फाक इनामदाकर, अमर गायकवाड यांच्यामार्फत पैसे दिले. डाॅ. तावरेला त्यांनी मोठी रक्कम देऊ केली होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणात सहा साक्षीदार आहे. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते साक्षीदारांना धमकावतील. अगरवाल दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यास ते नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणे परदेशात पसार होण्याची शक्यता आहे, असे सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात सांगितले.
|
Pune : जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा : बायपासला परस्पर मान्यता ‘पीडब्ल्यूडी’चा प्रताप |
अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील विशाल, आई शिवानी यांचे डीएनए चाचणी अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याचे अहवालातून दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. बचाव पक्षाकडून ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. सुधीर शहा, ॲड. ऋषीकेश गानू, ॲड. प्रसाद कुलकर्णी, ॲड. सत्यम निंबाळकर काम पाहत आहेत.
अगरवालच्या मित्राने दिले पैसे
विशाल अगरवालचा बांधकाम व्यावसायीक मित्र आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवृत्त अधिकाऱ्याने डॉ. अजय तावरेशी ओळख काढली होती. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला. अगरवालच्या सांगण्यावरून त्याचा मित्र राजू याने चालकाकडे अमर गायकवाड आणि अश्फाक मकानदार यांना देण्यासाठी चार लाख रुपये दिले होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात दिली. या गुन्ह्यात ससूनमधील एका अधिकाऱ्याने जबाब दिला. अपघाताचे वृत्त दूरचित्रवाहिनीवर पाहिल्यानंतर अधिकाऱ्याने मुलाच्या रक्त तपासणीचे अहवाल मागविले होते. अहवाल संशयास्पद वाटल्याने संबंधित अधिकाऱ्याने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती, असे हिरे यांनी युक्तिवादात नमूद केले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



